शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

रेल्वे खलाशाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:29 IST

रेल्वे विभागात खलाशी पदावर कार्यरत असणाऱ्या तरुणाचा रेल्वेच्याच धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. अनूप उपेंद्र श्रीवास (३०,रा.खंडेलवालनगर) असे मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्देशोककळा : सातुर्णा स्थित अंबा मगलम्मागील रेल्वे रुळावर घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे विभागात खलाशी पदावर कार्यरत असणाऱ्या तरुणाचा रेल्वेच्याच धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. अनूप उपेंद्र श्रीवास (३०,रा.खंडेलवालनगर) असे मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.अनूप श्रीवास पत्नी व तीन महिन्यांच्या मुलासह साईनगरस्थित खंडेलवाल नगरात राहत होता. अमरावती रेल्वेस्थानक येथे तो खलाशी पदावर कार्यरत होता. रविवारी रात्री अनूप हा महावीर नगरात दुर्गाेत्सव मंडळाच्या महाप्रसाद कार्यक्रमाकरिता गेला होता. कार्यक्रम आटोपून तो ड्युटीवर जाण्यासाठी रात्री उशिरा निघाला. दरम्यान अनूप हा सातुर्णाजवळील अंबा मंगलम् कार्यालयामागील रेल्वे रुळ ओलांडून सातुर्णा स्टॉपवर येत होते. दरम्यानच रेल्वे रुळ ओलांडताना अमरावतीहून बडनेराकडे जाणाऱ्या रेल्वेचा धक्का अनूपला लागला. अनूप घटनास्थळीच मृतावस्थेत पडून होता. याची माहिती रात्री १ वाजता राजापेठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात नेले.सोमवारी सकाळी अनूपच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचे पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.कुटुंबीयांचा आक्रोशअनूप हा आनंदी व सुस्वभावी असल्यामुळे त्याचे चाहते व मित्र मंडळीत तो आवडता होता. अनुप हा एकुलता एक असल्यामुळे कुटुंबीयांचा आधारवड होता. आई-वडिल, पत्नी एक तीन महिन्याचा मुलगा व तीन ते चार वर्षांची मुलगी असा अनूपचा परिवार आहे.अनूपच्या मृत्यूमुळे श्रीवास कुटुंबीयांवर दुखाचे डोंगर कोसळले असून, अंत्यविधीवेळी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. सोमवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.