शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

रेल्वे खलाशाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:29 IST

रेल्वे विभागात खलाशी पदावर कार्यरत असणाऱ्या तरुणाचा रेल्वेच्याच धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. अनूप उपेंद्र श्रीवास (३०,रा.खंडेलवालनगर) असे मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्देशोककळा : सातुर्णा स्थित अंबा मगलम्मागील रेल्वे रुळावर घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे विभागात खलाशी पदावर कार्यरत असणाऱ्या तरुणाचा रेल्वेच्याच धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. अनूप उपेंद्र श्रीवास (३०,रा.खंडेलवालनगर) असे मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.अनूप श्रीवास पत्नी व तीन महिन्यांच्या मुलासह साईनगरस्थित खंडेलवाल नगरात राहत होता. अमरावती रेल्वेस्थानक येथे तो खलाशी पदावर कार्यरत होता. रविवारी रात्री अनूप हा महावीर नगरात दुर्गाेत्सव मंडळाच्या महाप्रसाद कार्यक्रमाकरिता गेला होता. कार्यक्रम आटोपून तो ड्युटीवर जाण्यासाठी रात्री उशिरा निघाला. दरम्यान अनूप हा सातुर्णाजवळील अंबा मंगलम् कार्यालयामागील रेल्वे रुळ ओलांडून सातुर्णा स्टॉपवर येत होते. दरम्यानच रेल्वे रुळ ओलांडताना अमरावतीहून बडनेराकडे जाणाऱ्या रेल्वेचा धक्का अनूपला लागला. अनूप घटनास्थळीच मृतावस्थेत पडून होता. याची माहिती रात्री १ वाजता राजापेठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात नेले.सोमवारी सकाळी अनूपच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचे पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.कुटुंबीयांचा आक्रोशअनूप हा आनंदी व सुस्वभावी असल्यामुळे त्याचे चाहते व मित्र मंडळीत तो आवडता होता. अनुप हा एकुलता एक असल्यामुळे कुटुंबीयांचा आधारवड होता. आई-वडिल, पत्नी एक तीन महिन्याचा मुलगा व तीन ते चार वर्षांची मुलगी असा अनूपचा परिवार आहे.अनूपच्या मृत्यूमुळे श्रीवास कुटुंबीयांवर दुखाचे डोंगर कोसळले असून, अंत्यविधीवेळी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. सोमवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.