शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत बोगस कर्मचाऱ्यांची शोधमोहीम

By admin | Updated: March 8, 2016 00:14 IST

रेल्वे प्रशासनात बनावट कागदपत्रे सादर करून अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील जागा काबीज करणाऱ्या बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

टास्क फोर्स गठित : मुंबई विभागांतर्गत कागदपत्रे तपासणारअमरावती : रेल्वे प्रशासनात बनावट कागदपत्रे सादर करून अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील जागा काबीज करणाऱ्या बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता टास्क फोर्स गठित करण्यात आला. ही चमू मुंबई विभागांतर्गत बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासणार आहे.रेल्वे प्रशासनात बनावट कागदपत्रे सादर करून बोगस अधिकारी, कर्मचारी कार्यरत असल्याची तक्रार थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे देण्यात आली आहे. बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भरणा हा केवळ मुंबई विभागापुरताच नसून तो देशभरात पसरला असल्याचे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने म्हटले आहे. विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील बनावट कागदपत्रे सादर करुन मोक्याचा जागा बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. रेल्वेत बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीशी बडे अधिकारी असल्यामुळे बोगस कर्मचाऱ्यांचे शुद्धिकरण होत नाही, असे तक्रारीत नमूद आहे. रेल्वेत ज्यांना नोकऱ्या मिळणे अपेक्षित होते, त्यांच्या जागी बनावट कागदपत्रे सादर करून अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून रेल्वेत बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांना फावत आहे. मात्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बोगस अधिकारी, कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू करण्याचे निर्देश मध्य रेल्वे मुंबई विभागाचे महाप्रबंधकांना दिले आहे. मुंबई विभागातील पुणे, सोलापूर, भुसावळ, मुंबई व नागपूर या विभागांतर्गत येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची जात पडताडणीचे कागदपत्रे तपासणी करण्यासाठी टॉस्क फोर्स गठित करण्यात आले आहे. पाचही विभागासाठी स्वतंत्र पथक आहे. अमरावती व बडनेरा रेल्वेस्थानकावरसुद्धा मोठ्या प्रमाणात बोगस अधिकारी, कर्मचारी कार्यरत असल्याची तक्रार यापूर्वीच भुसावळ रेल्वे विभागाचे प्रबंधक गुप्ता यांच्याकडे देण्यात आली आहे.जात पडताळणी विभागाचा कारभार कासवगतीनेअनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करुन नोकरी बळकाविण्याची अनेक प्रकरणे रेल्वेत उघडकीस आली आहेत. मात्र, या प्रकरणांविषयी जात पडताळणी विभागात तक्रारी दाखल असताना निर्धारित वेळेत निकाल लागत नसल्याचा आक्षेप आहे. एकट्या अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील १९ बनावट कागदपत्रांची प्रकरणे प्रलंबित आहेत. जात पडताळणी विभागाचा कारभार कासवगतीने सुरु असल्याचा आरोप आहे.रेल्वेत बनावट कागदपत्रे सादर करुन नोकरी बळकाविणाऱ्या बोगस अधिकारी, कर्र्मचाऱ्याविरुद्धचा लढा सुरु आहे. घटनाबाह्यरित्या नियुक्त अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी न्यायालयीन आणि प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. टास्क फोर्स गठित झाल्यामुळे आशा पल्लवीत झाल्या आहेत.- नंदराज मघाडे, रेल्वे कर्मचारी, बडनेरा