शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

रेल्वेत आरक्षण हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:29 IST

एप्रिल ते जून हे तीन महिने रेल्वे गाड्यांमध्ये हाऊसफुल्ल असल्याचे फलक आरक्षण खिडक्यांवर झळकू लागले आहे. पुणे, मुंबई ‘नो रूम’ असल्याने उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणे आतापासून कठीण झाले आहे.

ठळक मुद्देपुणे, मुंबई ‘नो रूम’ : लग्नप्रसंग, शाळा- महाविद्यालयांच्या सुटीचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एप्रिल ते जून हे तीन महिने रेल्वे गाड्यांमध्ये हाऊसफुल्ल असल्याचे फलक आरक्षण खिडक्यांवर झळकू लागले आहे. पुणे, मुंबई ‘नो रूम’ असल्याने उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणे आतापासून कठीण झाले आहे. जूनअखेरपर्यंत हीच परिस्थिती राहील, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे.हल्ली लग्नप्रसंगाने जोर धरला असून, रेल्वे गाड्यांमध्ये चिक्कार गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच १५ एप्रिलपासून काही शाळा- महाविद्यालयांना सुटी लागत असल्याने पालकांना सहल, पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन केले. मात्र, रेल्वे गाड्यात तीन महिने आरक्षण मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत मौजमजा, पर्यटनस्थळी जायचे असल्यास रेल्वेऐवजी खासगी वाहनांनी प्रवास करण्याचा प्रसंग अनेकांवर उद्भवणार असल्याचे रेल्वे गाड्यांच्या आरक्षण स्थितीवरून लक्षात येते. विशेषत: विदर्भातून पुणे, मुंबई, गोवा, गुजरात, दिल्ली मार्गे ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वे गाड्यांची संख्या जास्त असली तरी उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने ऐनवेळी आरक्षण मिळणे कठीण होते, हे वास्तव आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले अनेक जण उन्हाळ्यांच्या सुटीत नातेवाईक, आप्तेष्टांकडे येऊन काही दिवस घालवितात. मात्र, रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळेनासे झाल्याने मुंबई, पुणे येथून आपल्या गावी येणाऱ्यांना प्रवासाचा पर्याय शोधावा लागेल, असे चित्र आहे. १५ मार्चपासून पुणे, मुंबई मार्गे गाड्यांमध्ये ‘नो रूम’ दर्शविले जात असल्यामुळे आणखी तीन महिने प्रवाशांना या मार्गे ये-जा करताना कसरत करावी लागणार आहे. अमरावती-मुंबई, गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर- पुणे गरीब रथचे पुढील तीन महिने आरक्षण खिडक्यांवर ‘हाऊसफुल्ल’ झळकत आहे. तसेच हावडा- मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, हावडा- मुंबई मेल, हावडा- कुर्ला शालीमार एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येसुद्धा आरक्षण नाही, असे आरक्षण खिडक्यांवर झळकत आहे.समर स्पेशल ८ एप्रिलपासूनमध्य रेल्वे मुंबई विभागाने उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी प्रवाशांची गैरसोय टाळता यावी, यासाठी पुणे, मुंबई व गोवा मार्गे ये-जा करण्यासाठी ८ एप्रिलपासून समर स्पेशल गाड्या सुरू होणार आहेत. मुंबई, नागपूर रेल्वे स्थानकावरून या गाड्या धावणार असून, त्यांचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे.तिकिटांचा काळाबाजार कधी संपणार ?अमरावती किंवा बडनेरा रेल्वे स्थानकावर दरदिवशी तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांची संख्या ही शंभरी ओलांडणारी आहे. तिकिटांच्या काळाबाजारात आरक्षण खिडक्यांवरील कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी हेदेखील सामील असल्याचे सर्वश्रुत आहे. सकाळच्या रेल्वे तिकीट आरक्षणासाठी रात्रीलाच दलालांची माणसे खिडक्यांवर कब्जा करून ठेवतात. त्यामुळे सामान्य प्रवाशांना रेल्वे गाड्यांचे आरक्षण कसे मिळणार, हा संशोधनाचा झाला विषय आहे.