शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत आरक्षण हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:29 IST

एप्रिल ते जून हे तीन महिने रेल्वे गाड्यांमध्ये हाऊसफुल्ल असल्याचे फलक आरक्षण खिडक्यांवर झळकू लागले आहे. पुणे, मुंबई ‘नो रूम’ असल्याने उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणे आतापासून कठीण झाले आहे.

ठळक मुद्देपुणे, मुंबई ‘नो रूम’ : लग्नप्रसंग, शाळा- महाविद्यालयांच्या सुटीचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एप्रिल ते जून हे तीन महिने रेल्वे गाड्यांमध्ये हाऊसफुल्ल असल्याचे फलक आरक्षण खिडक्यांवर झळकू लागले आहे. पुणे, मुंबई ‘नो रूम’ असल्याने उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणे आतापासून कठीण झाले आहे. जूनअखेरपर्यंत हीच परिस्थिती राहील, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे.हल्ली लग्नप्रसंगाने जोर धरला असून, रेल्वे गाड्यांमध्ये चिक्कार गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच १५ एप्रिलपासून काही शाळा- महाविद्यालयांना सुटी लागत असल्याने पालकांना सहल, पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन केले. मात्र, रेल्वे गाड्यात तीन महिने आरक्षण मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत मौजमजा, पर्यटनस्थळी जायचे असल्यास रेल्वेऐवजी खासगी वाहनांनी प्रवास करण्याचा प्रसंग अनेकांवर उद्भवणार असल्याचे रेल्वे गाड्यांच्या आरक्षण स्थितीवरून लक्षात येते. विशेषत: विदर्भातून पुणे, मुंबई, गोवा, गुजरात, दिल्ली मार्गे ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वे गाड्यांची संख्या जास्त असली तरी उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने ऐनवेळी आरक्षण मिळणे कठीण होते, हे वास्तव आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले अनेक जण उन्हाळ्यांच्या सुटीत नातेवाईक, आप्तेष्टांकडे येऊन काही दिवस घालवितात. मात्र, रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळेनासे झाल्याने मुंबई, पुणे येथून आपल्या गावी येणाऱ्यांना प्रवासाचा पर्याय शोधावा लागेल, असे चित्र आहे. १५ मार्चपासून पुणे, मुंबई मार्गे गाड्यांमध्ये ‘नो रूम’ दर्शविले जात असल्यामुळे आणखी तीन महिने प्रवाशांना या मार्गे ये-जा करताना कसरत करावी लागणार आहे. अमरावती-मुंबई, गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर- पुणे गरीब रथचे पुढील तीन महिने आरक्षण खिडक्यांवर ‘हाऊसफुल्ल’ झळकत आहे. तसेच हावडा- मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, हावडा- मुंबई मेल, हावडा- कुर्ला शालीमार एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येसुद्धा आरक्षण नाही, असे आरक्षण खिडक्यांवर झळकत आहे.समर स्पेशल ८ एप्रिलपासूनमध्य रेल्वे मुंबई विभागाने उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी प्रवाशांची गैरसोय टाळता यावी, यासाठी पुणे, मुंबई व गोवा मार्गे ये-जा करण्यासाठी ८ एप्रिलपासून समर स्पेशल गाड्या सुरू होणार आहेत. मुंबई, नागपूर रेल्वे स्थानकावरून या गाड्या धावणार असून, त्यांचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे.तिकिटांचा काळाबाजार कधी संपणार ?अमरावती किंवा बडनेरा रेल्वे स्थानकावर दरदिवशी तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांची संख्या ही शंभरी ओलांडणारी आहे. तिकिटांच्या काळाबाजारात आरक्षण खिडक्यांवरील कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी हेदेखील सामील असल्याचे सर्वश्रुत आहे. सकाळच्या रेल्वे तिकीट आरक्षणासाठी रात्रीलाच दलालांची माणसे खिडक्यांवर कब्जा करून ठेवतात. त्यामुळे सामान्य प्रवाशांना रेल्वे गाड्यांचे आरक्षण कसे मिळणार, हा संशोधनाचा झाला विषय आहे.