शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

रेल्वे गेटकीपरला मारहाण, पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:19 IST

नजीकच्या रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरून जयपूर सिंकदराबाद एक्स्प्रेस गाडी जात असताना गेटकिपरने रेल्वे गेट बंद केले. दरम्यान रेल्वे गेट का बंद करता असे म्हणून एका कारमधील पाच जणांनी गेटकिपरलाच मारहाण केली. तरही समोरून येणाऱ्या रेल्वेला थांबवून हजारो लोकांचे प्राण वाचविल्याची घटना दुपारी ४.३० वाजता घडली. यासंदर्भात वरूड पोलीसांनी पाचही युवकांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देमद्यपींचा धिंगाणा : सर्तकतेमुळे रेल्वे थांबल्याने अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : नजीकच्या रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरून जयपूर सिंकदराबाद एक्स्प्रेस गाडी जात असताना गेटकिपरने रेल्वे गेट बंद केले. दरम्यान रेल्वे गेट का बंद करता असे म्हणून एका कारमधील पाच जणांनी गेटकिपरलाच मारहाण केली. तरही समोरून येणाऱ्या रेल्वेला थांबवून हजारो लोकांचे प्राण वाचविल्याची घटना दुपारी ४.३० वाजता घडली. यासंदर्भात वरूड पोलीसांनी पाचही युवकांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.माहितीनुसार, धीरज प्रभाकर बरडे (३०, रा. धापेवाडा ता. सावनेर), ज्ञानेश्वर बबनराव पानपते ३२ रा. ब्रम्हपुरी, मंगेश अजाबराव उईके ३५ रा. कळमेश्वर, धमेंद्र पंजाबराव लोणकर (२७ रा. सांवगी), विशाल पुरुषोत्तम गोतमारे (२७, रा. घोराड ता. कळमेश्वर जि. नागपूर) अशी आरोपींची, तर प्रमोद कपले (३०, रा. वरुड) असे जखमी कर्मचाºयाचे नाव आहे. रेल्वे गाडी येणार म्हणून रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे गेट बंद होत असताना नागपूरकडे जाणारी कार क्र.एम.एच ३१ डीसी ४५८६ ने आरोपी वरूडहून येत होते. रेल्वे गेट का बंद केले म्हणून रेल्वेलाईनवर गाडी उभी केली. तेव्हा या गेटकिपरने गाडी काढा म्हणून हटकले असता, या युवकांनी दारूच्या बॉटलने आणि लोखंडी रॉडने गेटकिपर प्रमोद कपले यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तेथे उपस्थित नागरिकांनी पोलिसांना सूचना केली. पळून जाणाºया आरोपीच्या गाडीचा पाठलाग करून पोलीस आणि नागरिकांंनी चारचाकी वाहन पकडले. यासंदर्भात वरूड पोलिसांनी पाचही मद्यपी युवकावर शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल केले.कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने अनर्थ टळलारोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवर गेटकिपरने गेटबंद केल्याने पाच टवाळखोरांनी युवकांनी गेटकिपरला रॉड आणि दारुच्या बॉटलने मारहाण करून गंभीर जखमी केले. हा प्रकार होऊनसुद्धा दुर्घटना होऊ नये म्हणून कशीबशी सुटका करु़न रेल्वेचालकाला सुचना दिली आणि रेल्वे थांबविली. यामुळे मोठा अनर्र्थ टळून हजारो प्रवाशांसह नागरिकांचे तसेच आरोेपींचेसुध्दा प्राण वाचले.