शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

रेल्वे गेटकीपरला मारहाण, पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:19 IST

नजीकच्या रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरून जयपूर सिंकदराबाद एक्स्प्रेस गाडी जात असताना गेटकिपरने रेल्वे गेट बंद केले. दरम्यान रेल्वे गेट का बंद करता असे म्हणून एका कारमधील पाच जणांनी गेटकिपरलाच मारहाण केली. तरही समोरून येणाऱ्या रेल्वेला थांबवून हजारो लोकांचे प्राण वाचविल्याची घटना दुपारी ४.३० वाजता घडली. यासंदर्भात वरूड पोलीसांनी पाचही युवकांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देमद्यपींचा धिंगाणा : सर्तकतेमुळे रेल्वे थांबल्याने अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : नजीकच्या रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरून जयपूर सिंकदराबाद एक्स्प्रेस गाडी जात असताना गेटकिपरने रेल्वे गेट बंद केले. दरम्यान रेल्वे गेट का बंद करता असे म्हणून एका कारमधील पाच जणांनी गेटकिपरलाच मारहाण केली. तरही समोरून येणाऱ्या रेल्वेला थांबवून हजारो लोकांचे प्राण वाचविल्याची घटना दुपारी ४.३० वाजता घडली. यासंदर्भात वरूड पोलीसांनी पाचही युवकांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.माहितीनुसार, धीरज प्रभाकर बरडे (३०, रा. धापेवाडा ता. सावनेर), ज्ञानेश्वर बबनराव पानपते ३२ रा. ब्रम्हपुरी, मंगेश अजाबराव उईके ३५ रा. कळमेश्वर, धमेंद्र पंजाबराव लोणकर (२७ रा. सांवगी), विशाल पुरुषोत्तम गोतमारे (२७, रा. घोराड ता. कळमेश्वर जि. नागपूर) अशी आरोपींची, तर प्रमोद कपले (३०, रा. वरुड) असे जखमी कर्मचाºयाचे नाव आहे. रेल्वे गाडी येणार म्हणून रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे गेट बंद होत असताना नागपूरकडे जाणारी कार क्र.एम.एच ३१ डीसी ४५८६ ने आरोपी वरूडहून येत होते. रेल्वे गेट का बंद केले म्हणून रेल्वेलाईनवर गाडी उभी केली. तेव्हा या गेटकिपरने गाडी काढा म्हणून हटकले असता, या युवकांनी दारूच्या बॉटलने आणि लोखंडी रॉडने गेटकिपर प्रमोद कपले यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तेथे उपस्थित नागरिकांनी पोलिसांना सूचना केली. पळून जाणाºया आरोपीच्या गाडीचा पाठलाग करून पोलीस आणि नागरिकांंनी चारचाकी वाहन पकडले. यासंदर्भात वरूड पोलिसांनी पाचही मद्यपी युवकावर शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल केले.कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने अनर्थ टळलारोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवर गेटकिपरने गेटबंद केल्याने पाच टवाळखोरांनी युवकांनी गेटकिपरला रॉड आणि दारुच्या बॉटलने मारहाण करून गंभीर जखमी केले. हा प्रकार होऊनसुद्धा दुर्घटना होऊ नये म्हणून कशीबशी सुटका करु़न रेल्वेचालकाला सुचना दिली आणि रेल्वे थांबविली. यामुळे मोठा अनर्र्थ टळून हजारो प्रवाशांसह नागरिकांचे तसेच आरोेपींचेसुध्दा प्राण वाचले.