शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गेटकीपरला मारहाण, पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:19 IST

नजीकच्या रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरून जयपूर सिंकदराबाद एक्स्प्रेस गाडी जात असताना गेटकिपरने रेल्वे गेट बंद केले. दरम्यान रेल्वे गेट का बंद करता असे म्हणून एका कारमधील पाच जणांनी गेटकिपरलाच मारहाण केली. तरही समोरून येणाऱ्या रेल्वेला थांबवून हजारो लोकांचे प्राण वाचविल्याची घटना दुपारी ४.३० वाजता घडली. यासंदर्भात वरूड पोलीसांनी पाचही युवकांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देमद्यपींचा धिंगाणा : सर्तकतेमुळे रेल्वे थांबल्याने अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : नजीकच्या रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरून जयपूर सिंकदराबाद एक्स्प्रेस गाडी जात असताना गेटकिपरने रेल्वे गेट बंद केले. दरम्यान रेल्वे गेट का बंद करता असे म्हणून एका कारमधील पाच जणांनी गेटकिपरलाच मारहाण केली. तरही समोरून येणाऱ्या रेल्वेला थांबवून हजारो लोकांचे प्राण वाचविल्याची घटना दुपारी ४.३० वाजता घडली. यासंदर्भात वरूड पोलीसांनी पाचही युवकांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.माहितीनुसार, धीरज प्रभाकर बरडे (३०, रा. धापेवाडा ता. सावनेर), ज्ञानेश्वर बबनराव पानपते ३२ रा. ब्रम्हपुरी, मंगेश अजाबराव उईके ३५ रा. कळमेश्वर, धमेंद्र पंजाबराव लोणकर (२७ रा. सांवगी), विशाल पुरुषोत्तम गोतमारे (२७, रा. घोराड ता. कळमेश्वर जि. नागपूर) अशी आरोपींची, तर प्रमोद कपले (३०, रा. वरुड) असे जखमी कर्मचाºयाचे नाव आहे. रेल्वे गाडी येणार म्हणून रोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे गेट बंद होत असताना नागपूरकडे जाणारी कार क्र.एम.एच ३१ डीसी ४५८६ ने आरोपी वरूडहून येत होते. रेल्वे गेट का बंद केले म्हणून रेल्वेलाईनवर गाडी उभी केली. तेव्हा या गेटकिपरने गाडी काढा म्हणून हटकले असता, या युवकांनी दारूच्या बॉटलने आणि लोखंडी रॉडने गेटकिपर प्रमोद कपले यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तेथे उपस्थित नागरिकांनी पोलिसांना सूचना केली. पळून जाणाºया आरोपीच्या गाडीचा पाठलाग करून पोलीस आणि नागरिकांंनी चारचाकी वाहन पकडले. यासंदर्भात वरूड पोलिसांनी पाचही मद्यपी युवकावर शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल केले.कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने अनर्थ टळलारोशनखेडा रेल्वे क्रॉसिंगवर गेटकिपरने गेटबंद केल्याने पाच टवाळखोरांनी युवकांनी गेटकिपरला रॉड आणि दारुच्या बॉटलने मारहाण करून गंभीर जखमी केले. हा प्रकार होऊनसुद्धा दुर्घटना होऊ नये म्हणून कशीबशी सुटका करु़न रेल्वेचालकाला सुचना दिली आणि रेल्वे थांबविली. यामुळे मोठा अनर्र्थ टळून हजारो प्रवाशांसह नागरिकांचे तसेच आरोेपींचेसुध्दा प्राण वाचले.