शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर रेल्वेची शेती

By admin | Updated: May 11, 2017 00:07 IST

नरखेड रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या शेतजमिनीचा वापर प्रकल्पासाठी होत नसून ...

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : शिराळ्यातील शेतकरी त्रस्तलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नरखेड रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या शेतजमिनीचा वापर प्रकल्पासाठी होत नसून रेल्वे कर्मचारी हे स्वत: शेती करण्यासाठी वापर करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात शिराळा येथील प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली आहे.नरखेड रेल्वे मार्गाची निर्मिती व्हावी, यासाठी सन १९९४ मध्ये जिल्हा प्रशासनाने आदेश काढून शिराळा येथील सूपिक जमीन हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अमरावती तालुक्यातील शिराळा येथील ४५ एकर शेतजमिन सरकारी दराने रेल्वे प्रशासनाने ताब्यात घेतली. हा प्रकल्प पुर्णत्वास जावा, यासाठी शेतकऱ्यांनी देखील सूपीक जमीन दिली. मात्र रेल्वे प्रशासनाने प्रकल्पाव्यतिरिक्त जास्त जमीन ताब्यात घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना भूमिहिन व्हावे लागले आहे. मात्र प्रकल्पाव्यतिरिक्त शेतजमिन ताब्यात घेतल्यानंतर उर्वरित जमीन सदर प्रकल्पग्रस्तांना केंद्र सरकारच्या २००३ च्या शासन निर्णयानुसार जमीन वापराचा उद्देश बदल्यास ती मूळ शेतकऱ्यांना परत मिळणे नियमावली आहे. मात्र नरखेड रेल्वे प्रकल्प पूर्ण होऊनही अतिरिक्त असलेल्या शेतजमिनीवर काही रेल्वे कर्मचारी स्वत: शेती करीत असल्याची तक्रार शिराळा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या कैफियतनुसार बडनेरा रेल्वेत गॅगमनपदी कार्यरत कर्मचारी यांचे उत्पन्न कमी असल्याचे कारण सांगून प्रकल्पव्यतिरिक्त शिल्लक जमिनीवर स्वत: शेती करीत आहे. हा प्रकार म्हणजे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा करणारी असल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे. एकिकडे कमी दरात शेतकऱ्यांकडून प्रकल्पाच्या नावे जमीन ताब्यात घ्यायची. शेतकऱ्यांना भूमिहिन करावे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्वत: शेती करावी. यातून रेल्वे प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे? असा सवाल शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला आहे. प्रकल्पग्रस्तांकडून ज्या उद्देशासाठी जमीन ताब्यात घेतलीे, तो उद्देश पूर्ण झाल्यास अतिरिक्त शेतजमीन परत करणे नियमावली असल्याचे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यथा मांडल्या आहेत. प्रशांत ढोरे, संजय बढे, लक्ष्मीनारायण शर्मा, विजय कुकडे, ओमकुमार कुकडे, सचिन काळमेघ, दिनेश पाटील, जिनेश पाटील, सुनील पाटील आदी प्रकलग्रस्त शेतकऱ्यांनी जमीन परत करण्यासाठी मागणी केली आहे.४५ एकर शेतजमिनीवर रेल्वे क र्मचारी करतात शेतीनरखेड रेल्वे प्रकल्पासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या एकुण जमिनीपैकी शिराळा येथील शेतकऱ्यांची ४५ एकर जमीन अतिरिक्त राहिली आहे. मात्र ही जमीन प्रकल्पग्रस्तांना परत न करता ती रेल्वेचे कर्मचारी गॅगमन यांनाच भाडेतत्वावर वहिवाटीसाठी रेल्वे प्रशासनाने दिली आहे. गॅगमनचे उत्पन्न कमी असल्याचा अहवाल रेल्वे प्रशासनाने वरिष्ठाकडे पाठवून अतिरिक्त जमिनीवर गॅगमन यांनाच शेती करण्याची मुभा दिली आहे. या प्रकारामुळे शेतकरी भूमिहिन झाले असून रेल्वेने प्रकल्पग्रस्तांना भाडेतत्वावर शेती करण्यासाठी जमीन द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.शिराळा येथील शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. रेल्वे कर्मचारी शेती करीत असतील तर ते नियमानुसार नाही. यासंदर्भात रेल्वेकडून अहवाल मागविला आहे. चौकशीअंती योग्य ती कार्यवाही केली जाईल.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी, अमरावती.