शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

रेल्वे प्रशासनाचे ‘घर चलो अभियान’

By admin | Updated: February 11, 2017 00:08 IST

रेल्वे प्रशासनाने चालकांच्या कुटुंबियांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ‘घर चलो अभियान’ या नव्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

कुटुंबीयांसोबत सुरक्षा संवाद : चालकांचे प्रश्न, समस्या जाणून घेणारअमरावती : रेल्वे प्रशासनाने चालकांच्या कुटुंबियांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ‘घर चलो अभियान’ या नव्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. सामाजिक जाणीवेतून सुरु करण्यात झालेल्या या उपक्रमाद्वारे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी चालकांच्या कुटुंबियासोबत सुरक्षा संवाद साधणार आहे. रेल्वे चालविणे सोपे नाही. हजारो प्रवाशांना सुरक्षितस्थळी पोहचविताना चालकांची एकाग्रता महत्वाची आहे. त्यामुळे रेल्वे चालक कर्तव्यावर असताना त्यांना ताण- तणाव, कुटुंबाची चिंता सतावू नये, यासाठी वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कुटुंबियासोबत सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक समस्या, प्रश्नांची जाण करुन घेणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने हा उपक्रम सुरु केला असून पुणे, मुंबईनंतर अमरावती, अकोला, बडनेरा, नागपूर आदी ््रमुख रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या चालकांच्या कुटुंबियोसाबत अधिकारी सुरक्षा संवाद साधणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात ताण- तणाव, वाद- विवाद होत राहतात. त्यामुळे चालक कर्तव्यावर असताना त्यांना कुटुंबियांची चिंता सतावणार नाही, घरचे वातावरण आनंदी राहावे, ही दखल सुरक्षा संवादातून घेतली जाणार आहे. रेल्वे चालकांच्या हाती अनेकांचे आयुष्य राहते. एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर प्रवाशांना नेताना चालकांची एकाग्रता कायम राहावी. तसेच त्यांच्या मनात समस्यांनी घर करु नये, हे सुरक्षा संवाद मागील हेतू असल्याचे दिसून येते. चालक कर्तव्यावर असताना त्यांचे मन आनंदी कसे राहील, हे सुरक्षा संवादातून अधिकारी त्यांच्या कुटुंबियांना आवाहन करणार आहे.गत महिन्यात रेल्वेचे अपघात झाल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. (प्रतिनिधी)अपघात रोखण्यासाठी चालकांना मार्गदर्शन मध्य रेल्वे विभागाने चालकांच्या कुटुंबियांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ‘घर चलो अभियान’ सुरु केले आहे. या माध्यमातून चालक पती-पत्नी, मुलाबाळांसोबत संवाद साधताना अधिकारी कौटुंबिक बाबीदेखील नमूद करणार आहेत. मात्र, चालकांनी रेल्वे अपघात कसे रोखावे, यासाठी प्रशासन त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.