शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
6
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
7
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
8
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
9
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

रेल्वे प्रशासनाचे ‘घर चलो अभियान’

By admin | Updated: February 11, 2017 00:08 IST

रेल्वे प्रशासनाने चालकांच्या कुटुंबियांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ‘घर चलो अभियान’ या नव्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

कुटुंबीयांसोबत सुरक्षा संवाद : चालकांचे प्रश्न, समस्या जाणून घेणारअमरावती : रेल्वे प्रशासनाने चालकांच्या कुटुंबियांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ‘घर चलो अभियान’ या नव्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. सामाजिक जाणीवेतून सुरु करण्यात झालेल्या या उपक्रमाद्वारे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी चालकांच्या कुटुंबियासोबत सुरक्षा संवाद साधणार आहे. रेल्वे चालविणे सोपे नाही. हजारो प्रवाशांना सुरक्षितस्थळी पोहचविताना चालकांची एकाग्रता महत्वाची आहे. त्यामुळे रेल्वे चालक कर्तव्यावर असताना त्यांना ताण- तणाव, कुटुंबाची चिंता सतावू नये, यासाठी वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कुटुंबियासोबत सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक समस्या, प्रश्नांची जाण करुन घेणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने हा उपक्रम सुरु केला असून पुणे, मुंबईनंतर अमरावती, अकोला, बडनेरा, नागपूर आदी ््रमुख रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या चालकांच्या कुटुंबियोसाबत अधिकारी सुरक्षा संवाद साधणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात ताण- तणाव, वाद- विवाद होत राहतात. त्यामुळे चालक कर्तव्यावर असताना त्यांना कुटुंबियांची चिंता सतावणार नाही, घरचे वातावरण आनंदी राहावे, ही दखल सुरक्षा संवादातून घेतली जाणार आहे. रेल्वे चालकांच्या हाती अनेकांचे आयुष्य राहते. एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर प्रवाशांना नेताना चालकांची एकाग्रता कायम राहावी. तसेच त्यांच्या मनात समस्यांनी घर करु नये, हे सुरक्षा संवाद मागील हेतू असल्याचे दिसून येते. चालक कर्तव्यावर असताना त्यांचे मन आनंदी कसे राहील, हे सुरक्षा संवादातून अधिकारी त्यांच्या कुटुंबियांना आवाहन करणार आहे.गत महिन्यात रेल्वेचे अपघात झाल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. (प्रतिनिधी)अपघात रोखण्यासाठी चालकांना मार्गदर्शन मध्य रेल्वे विभागाने चालकांच्या कुटुंबियांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ‘घर चलो अभियान’ सुरु केले आहे. या माध्यमातून चालक पती-पत्नी, मुलाबाळांसोबत संवाद साधताना अधिकारी कौटुंबिक बाबीदेखील नमूद करणार आहेत. मात्र, चालकांनी रेल्वे अपघात कसे रोखावे, यासाठी प्रशासन त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.