शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रशासनाचे ‘घर चलो अभियान’

By admin | Updated: February 11, 2017 00:08 IST

रेल्वे प्रशासनाने चालकांच्या कुटुंबियांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ‘घर चलो अभियान’ या नव्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

कुटुंबीयांसोबत सुरक्षा संवाद : चालकांचे प्रश्न, समस्या जाणून घेणारअमरावती : रेल्वे प्रशासनाने चालकांच्या कुटुंबियांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ‘घर चलो अभियान’ या नव्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. सामाजिक जाणीवेतून सुरु करण्यात झालेल्या या उपक्रमाद्वारे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी चालकांच्या कुटुंबियासोबत सुरक्षा संवाद साधणार आहे. रेल्वे चालविणे सोपे नाही. हजारो प्रवाशांना सुरक्षितस्थळी पोहचविताना चालकांची एकाग्रता महत्वाची आहे. त्यामुळे रेल्वे चालक कर्तव्यावर असताना त्यांना ताण- तणाव, कुटुंबाची चिंता सतावू नये, यासाठी वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कुटुंबियासोबत सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक समस्या, प्रश्नांची जाण करुन घेणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने हा उपक्रम सुरु केला असून पुणे, मुंबईनंतर अमरावती, अकोला, बडनेरा, नागपूर आदी ््रमुख रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या चालकांच्या कुटुंबियोसाबत अधिकारी सुरक्षा संवाद साधणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात ताण- तणाव, वाद- विवाद होत राहतात. त्यामुळे चालक कर्तव्यावर असताना त्यांना कुटुंबियांची चिंता सतावणार नाही, घरचे वातावरण आनंदी राहावे, ही दखल सुरक्षा संवादातून घेतली जाणार आहे. रेल्वे चालकांच्या हाती अनेकांचे आयुष्य राहते. एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर प्रवाशांना नेताना चालकांची एकाग्रता कायम राहावी. तसेच त्यांच्या मनात समस्यांनी घर करु नये, हे सुरक्षा संवाद मागील हेतू असल्याचे दिसून येते. चालक कर्तव्यावर असताना त्यांचे मन आनंदी कसे राहील, हे सुरक्षा संवादातून अधिकारी त्यांच्या कुटुंबियांना आवाहन करणार आहे.गत महिन्यात रेल्वेचे अपघात झाल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. (प्रतिनिधी)अपघात रोखण्यासाठी चालकांना मार्गदर्शन मध्य रेल्वे विभागाने चालकांच्या कुटुंबियांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ‘घर चलो अभियान’ सुरु केले आहे. या माध्यमातून चालक पती-पत्नी, मुलाबाळांसोबत संवाद साधताना अधिकारी कौटुंबिक बाबीदेखील नमूद करणार आहेत. मात्र, चालकांनी रेल्वे अपघात कसे रोखावे, यासाठी प्रशासन त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.