शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

राफेल घोटाळा, काँग्रेसचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:42 IST

राफेल घोटाळ्यातील भ्रष्टाचाराने मोदी सरकारचे हात बरबटले आहेत. संरक्षण नियमावली गुंडाळून राफेल विमाने खरेदीचा करार झाला आहे. या देशविघातक मुद्यावर जाब विचारण्यासाठी काँग्रेसने सोमवारी मोर्चा काढला. यावेळी वाढती महागाई, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी रेटण्यात आली.

ठळक मुद्देसामान्यांच्या मुद्यांवर उठविला आवाज : जिल्हा कचेरीवर धडकला महामोर्चा, प्रचंड घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राफेल घोटाळ्यातील भ्रष्टाचाराने मोदी सरकारचे हात बरबटले आहेत. संरक्षण नियमावली गुंडाळून राफेल विमाने खरेदीचा करार झाला आहे. या देशविघातक मुद्यावर जाब विचारण्यासाठी काँग्रेसने सोमवारी मोर्चा काढला. यावेळी वाढती महागाई, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी रेटण्यात आली.जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा धडक मोर्चाद्वारे भाजप सरकारचा कडाडून निषेध करण्यात आला. मोर्चास प्रारंभ करण्यापूर्वी स्थानिक ईर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला हारार्पण व अभिवादन करण्यात आले. काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हा निरीक्षक रवींद्र दरेकर, माजी आमदार केवराम काळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी उपाध्यक्ष सतीश हाडोळे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा छाया दंडाळे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकताच काँग्रेस नेते भाजप सरकारविरोधी आक्रमक झाले. राफेल विमान खरेदीत घोटाळा झाला असून, गोपनीयतेच्या नावाने भाजप सरकारने खासगी कंपनीमार्फत करार केला आहे.या आहेत काँग्रेसच्या मागण्याराफेल खरेदीत तब्बल ४५ हजार कोटींचा घोटाळा झाला. त्यामुळे या घोटाळयाची सर्वंकष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. नऊ हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाºया विजय मल्ल्याला विदेशात पळून जाण्यास मदत करणारे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे व उर्वरित शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळावी. बोंडअळी नुकसानभरपाई, तूर, हरभºयाच्या भावाच्या फरकाची रक्कम दसºयापूर्वी मिळावी. दुष्काळ परिस्थितीत ओलितासाठी शेतकºयांना १२ तास सलग वीजपुरवठा करा. मूग, सोयाबीनला हमीभाव देऊन त्वरित खरेदी सुरू करावी. सरकारने नाफे ड व व्ही.सी.एम.मार्फत केलेल्या तूर व हरभºयांची रक्कम द्यावी. वीज दर कमी करावे. बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. पेट्रोल, डिझेल व स्वयपांक गॅसची भाववाढ कमी करावी. पीकविमाधारकांना त्वरित लाभ द्यावा. काँग्रेस सरकारने अल्पसंख्यकांना दिलेले पाच टक्के आरक्षण कायम ठेवावे आणि आदिवासींचे खावटी कर्ज माफ करून नवीन कर्जपुरवठा करावा यासह अन्य मागण्यांकडे काँग्रेसने शासन-प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, यशवंतराव शेरेकर, जिल्हा परिषदेचे सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, गिरीश कराळे, प्रकाश साबळे, अरुण वानखडे, प्रमोद दाळू, संजय मार्डीकर, प्रकाश काळबांडे, भागवत खांडे, बिटू मंगरोळे, दयाराम काळे, महेंद्र गैलवार, मोहन सिंगवी, गणेश आरेकर, नितीन दगडकर, सुरेश निमकर, अर्चना मेश्राम, श्रीराम नेहर, मनोज देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे, अभिजित देवके, आदी सहभागी झाले होते.सिलिंडरची तिरडीजिल्हा काँग्रेसच्या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सिलिंडरची तिरडी यात्रा काढली. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकºयांना पीक नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, इंधन दरवाढ कमी झाले पाहिजे, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, खावटी कर्जमाफी व नवीन कर्ज मिळालेच पाहीजे आदी मागण्यांच्या फलकांनी लक्ष वेधले होते.पोलीस-कार्यकर्तेआमने-सामनेभाजप सरकारच्या विरोधात काढलेला काँग्रेसचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी बॅरिकेड्स आडवे लावून रोखला. येथे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख यांनी उपस्थित पोलिस अधिकाºयांना मोर्चा पुढे जाऊ द्यावा, अशी सूचना केली.कार्यकर्ते चढले जिल्हा कचेरीवरकाँग्रेसचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. काँग्रेसचे नेते मोदी सरकारविरोधात घोषणा देत होते. दरम्यान, युवक काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा कचेरीवर चढले. काँग्रेसचे झेंडे हातात घेवून भाजप सरकार विरोधात नारेबाजी केली. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.भाजप सरकारने केवळ घोषणाबाजी करून जनतेची व शेतकºयांची फसवणूक केली. राफेल घोटळ्याने या सरकारचा खरा चेहरा सामोर आला आहे. शेतकरी व जनेतच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून अन्याय करणारे भाजप सरकारचे धोरण आहे. त्यामुळे या सरकारला धस्रÞडा शिकविण्याची गरज आहे.- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा‘अच्छे दिन’ हे आमिष ठरले. शेतकरी व जनतेला ‘बुरे दिन’ आले आहेत. शेतकºयांच्या मालाला दाम देण्याऐवजी त्यांचीच लूट सुरू आहे. शेतकरी व जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची सरकारने पूर्तता केली नाही. कर्जमाफी, शेतमाल खरेदी, नुकसान भरपाई असे अनेक प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले.- वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव रेल्वेभाजप सरकारची कर्जमाफी फसवी आहे. शेतकºयांना या सरकारने न्याय न देता अन्यायाची मालिका चालविली. सोयाबीनचे अनोनात नुकसान आहे. जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे. महागाई वाढली आहे. असे अनेक प्रश्न सोडविण्यात आले नाहीत. ४५ हजार कोटींचा राफेल घोटाळा या सरकारने केला. त्याबाबत चौकशी व्हावी आणि शेतकरी व जनेतला न्याय या सरकारने द्यावा- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस