शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नांदगावपेठेत दोन गटात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:44 IST

नांदगाव पेठ स्थित बन्नेखा चौकातील विशिष्ट समुदायातील धार्मिक स्थळासमोरून जाणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडाला मारहाण झाल्याची घटना घडल्याने रविवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हाणामारीत चार वऱ्हाडी जखमी झाले. याप्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी सोमवारी दोन्ही गटांच्या आठ जणांना अटक केली. या घटनेच्या अनुषंगाने नांदगाव पेठ बंद ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देलग्न वऱ्हाडाला मारहाण : पोलीस बंदोबस्तानंतर तणावपूर्ण शांतता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव पेठ स्थित बन्नेखा चौकातील विशिष्ट समुदायातील धार्मिक स्थळासमोरून जाणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडाला मारहाण झाल्याची घटना घडल्याने रविवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हाणामारीत चार वऱ्हाडी जखमी झाले. याप्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी सोमवारी दोन्ही गटांच्या आठ जणांना अटक केली. या घटनेच्या अनुषंगाने नांदगाव पेठ बंद ठेवण्यात आले होते.नांदगाव पेठ येथील रहिवासी प्रकाश भोपळे यांनी पोलिसांकडे रविवारी उशिरा रात्री तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, त्यांचे चुलतभाऊ आशिष रामदास भोपळे यांचे सोमवारी चांदूरबाजार येथे लग्न होते. यानिमित्त रविवारी सायंकाळी ७ वाजता वरात काढली. ती वाजत-गाजत बारीपुरा चौकातून रात्री ८.४५ वाजता बन्नेखा चौकातील विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळासमोरून जात असताना शारूख बशीरखाँ पठाण हा हाती भाला घेऊन आला. त्याचा भाल्याचा वार प्रकाश भोपळे यांनी अडविल्याने ते जखमी झाले. यादरम्यान वाद उफाळून आल्यावर शारूखसह सलमान बशीरखाँ पठाण, सादीक, सकीम व अन्य १० ते १२ जणांनी वरातीमधील नितीन राऊत, अनिकेत बाळस्कर, प्रज्वल भोपळे, कविता भोपळे, बेबी अंबाडकर, नंदा टारपे, शालिनी भोपळे, सविता भोपळे (रा.यावलपुरा) यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशिष्ट समुदायातील जमावाने वऱ्हाडींवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला. या घटनेनंतर रात्री ९ वाजता संतप्त वऱ्हाडी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात धडकले आणि प्रचंड घोषणाबाजी करीत आरोपींवर कारवाईची मागणी केली. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.विशिष्ट समुदायातील जमावाने दिलेल्या तक्रारीनुसार, वरात बन्नेखा चौकातून जात असताना प्रार्थना सुरू होती. यामुळे वऱ्हाडी मंडळीला बँड वाजविण्यास मनाई केल्याने वाद उफाळून आला.दोन्ही गटांतील आठ जणांना अटकनांदगाव पेठेत या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस अधिकाºयांना योग्य निर्देश दिले. सोमवारी गावात तणावपूर्ण शांतता होती. त्यामुळे पोलिसांचा मोठा ताफा नांदगाव पेठेत तैनात आहे. पोलिसांनी वºहाडी मंडळीच्या तक्रारीवरून विशिष्ट समुदायातील नागरिकांवर गुन्हे नोंदविले असून, चार जणांना अटक केली. विशिष्ट समुदायातील नागरिकांच्या तक्रारीवरून चार वºहाडी व बँड पथकातील दोघांना अटक करण्यात आली. याशिवाय सरकारतर्फे तक्रार नोंदविण्यात आली आहे.नांदगावपेठेतील घटनेत परस्परविरोधी तक्रारीशिवाय सरकारतर्फे तक्रार नोंदविण्यात आली आहे. सद्यस्थितीत दोन्ही गटांतील चार जणांना अटक केली आहे. अशाप्रकारे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जाईल.- दत्तात्रय मंडलिकपोलीस आयुक्त.