शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

बाजार समितीत राडा; तीन तास काम बंद

By admin | Updated: March 12, 2016 00:05 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत्याकडून हमालास पट्ट्याने मारहाण झाल्याप्रकरणी हमाल, मापारी ...

अडत्यांकडून हमालास पट्ट्याने मारहाण : पोलिसात परस्परविरोधी तक्रार, दोन दिवसांनंतर होणार कारवाईअमरावती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत्याकडून हमालास पट्ट्याने मारहाण झाल्याप्रकरणी हमाल, मापारी संघटनांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. परिणामी बाजार समितीचे कामकाज तीन तास ठप्प झाले. अखेर दोन दिवसांनंतर मारहाण करणाऱ्या अडत्यावर ठोस कारवाई केली जाणार, या प्रशासनाच्या आश्वासनानंतर हमालांनी पुकारलेले कामबंद आंदोलन शेतकरी हितासाठी मागे घेण्यात आले. याप्रकरणी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या आहेत.रावसाहेब लोभाजी दळवी (५५ रा. संतोषीनगर, अमरावती) हे बाजार समितीत ओमप्रकाश मुंदडा या अडत्याकडे हमालीचे काम करतात. नेहमीप्रमाणे रावसाहेब दळवी हे शेतीमाल घेऊन आलेले वाहन उभे करून त्यातील माल काढण्याची तयारी करीत होते. मधस्थी करणाऱ्यासही फटकाअडते गोविंद टवानी हे रावसाहेब दळवी यांना पट्ट्याने मारहाण करीत असल्याचे बघून मधस्थी करण्यास गेलेले शकील शाह खलीद शाह या हमालासदेखील पट्ट्याचा तोंडावर मार बसला, हे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. शकील शाह यांच्या तोंडावर मार लागल्याचे दिसून आले.पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखलकृषी उत्पन्न बाजार समितीत हमालास पट्ट्याने मारहाण झाल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसात परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. रावसाहेब दळवी यांना पट्ट्याने मारहाण केल्याप्रकरणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. तसेच गोविंद टवानी व बाळू वानखडे या अडत्यानेदेखील हमालांनी हुकने वार केल्याची तक्रार दिली आहे. तक्रारीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी भादंविच्या कलम १६० अन्वये गुन्हे दाखल केले आहे.बाजार समिती सभापती मुंबईला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे हे वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र बाजार समितीत अडते, हमालांमध्ये झालेल्या वादावर ते मुंबईहून लक्ष ठेवून होते. त्यामुळे हा वाद विकोपाला जाऊ नये, यासाठी उपसभापतींसह काही संचालकांना त्यांनी बाजार समितीत पाठवून तोडगा काढण्यासाठी पाठविले होते, अशी माहिती आहे.हमालास मारहाणीची घटना निंदनीय आहे. मात्र शेतकरी हितासाठी बाजार समितीचे कामकाज बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सभापती परत येताच संबंधित अडत्यांवर दोन दिवसांत कारवाई केली जाईल.- बंडू वानखडे, संचालक, बाजार समितीव्यापारी आणि हमालांच्या आपसी समझोत्याने तोडगा निघाला आहे. यापुढे असा प्रकार होणार नाही, याबाबत समज देण्यात आली आहे. बाजार समितीचे कामकाज नियमित सुरू झाले आहे.- सतीश अट्टल,संचालक, बाजार समिती