शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

देशाच्या प्रगतीसाठी जातीय सलोखा राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:29 IST

देशात जातीय सलोखा कायम राहावा आणि देशवासीयांच्या आर्थिक, मानसिक व आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग सुकर व्हावा, शांतीतूनच प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन दिल्लीचे मौलाना एजाज अहमद असलम यांनी येथे केले.

ठळक मुद्देमौलाना एजाज अहमद असलम : ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’

आॅनलाईन लोकमतअमरावती : देशात जातीय सलोखा कायम राहावा आणि देशवासीयांच्या आर्थिक, मानसिक व आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग सुकर व्हावा, शांतीतूनच प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन दिल्लीचे मौलाना एजाज अहमद असलम यांनी येथे केले. येथील टाऊनहॉलमध्ये जमात-ए-इस्लामी हिन्दतर्फे आयोजित ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते.मानसिक, आध्यात्मिक समाधान. सर्व जाती-धर्माच्या, सर्व वर्गांच्या तसेच सर्व स्तरातील घटकांमध्ये शांती, सुरक्षितता कायम करणे अर्थात् शांती. ती प्रस्थपित करण्यासाठी समाज व देशातील अस्वस्थता, अराजकता, अध:पतन संपुष्टात आणणे, देशवासीयांमध्ये बंधुत्व, मैत्री, प्रेम, एकमेकांप्रति सन्मान, सर्वांसाठी न्याय, समता, धार्मिक सहिष्णुता वाढीस लावणे तसेच देशवासीयांच्या भौतिक, आध्यात्मिक आणि नैतिक प्रगतीसाठी समाजप्रबोधन करणे, वैचारिक व व्यावहारिक स्वैराचार, दुराचारातून मुक्ती तसेच जीवनात खºया अर्थाने यश संपादन करणे यासंबंधी मौलिक मार्गदर्शन नौशाद उस्मान यांनी केले.समता व न्यायावर आधारित व्यवस्थेच्या निर्मितीसाठी सामाजिक परिवर्तनातून सकारात्मक क्रांतीसाठी झटणाºया उदारवादी जमात-ए-इस्लमी हिंद, महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यभर जनजागरण अभियान राबवीत आहे. ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ असे शीर्षक असलेल्या या अभियानांतर्गत राज्यभरातील ६०० ठिकाणांवर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.सदर सोहळ्याला अमरावती विभागातील मुस्लिम पुरुष आणि महिला उपस्थित होत्या. मुस्लिमेत धर्मातील लोकांची दखलनीय उपस्थिती हे या आयोजनाचे वैश्ष्ठ्यि ठरले. व्यासपीठावर जमात-ए-इस्लामी हिंदचे अमरावती जिल्हाध्यक्ष अहमद मोहसीन शेख उपस्थित होते. काजी लईक अहमद यांनी सुरेख केले. शहर अध्यक्ष रफीक अहमद खान यांनी आभार व्यक्त केले.जनजागरण अभियानात विविध कार्यक्रमजमात-ए-इस्लामी हिन्दच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ या जनजागरण अभियानात अनेक ठिकाणी जाहीर सभा, परिसंवाद, चर्चासत्र, कॉर्नर मीटिंग, पथनाट्य, शाळा व महाविद्यालयांमध्ये बौद्धिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा, प्रदर्शन, सामूहिक भेटी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.