शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

करजगावात पावसाने रबीचे नुकसान

By admin | Updated: March 15, 2015 00:36 IST

निसर्गापुढे मनुष्य हतबल आहे. याचा अनुभव यावर्षी प्रकर्षाने येत आहे. बळीराजाचे उभे पीक हातून गेले. या नापिकीमुळे शेतकरी होरपळून निघाला आहे.

प्रमोद राऊत करजगावनिसर्गापुढे मनुष्य हतबल आहे. याचा अनुभव यावर्षी प्रकर्षाने येत आहे. बळीराजाचे उभे पीक हातून गेले. या नापिकीमुळे शेतकरी होरपळून निघाला आहे. चांदूरबाजार तालुक्यात कापूस हे मुख्य पीक. परंतु गंभीर रोगाने त्याचा नायनाट केला. पर्यायाने कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. यामुळे बळीराजा कमालीचा हवालदिल झाला. कापसाच्या हंगामावर शेतमजुरी अवलंबून असते. प्रामुख्याने कापूस वेचण्याची कामे मजुरांकडून करवून घेतली जातात. पण कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने मजुरांना मजुरी मिळणे अशक्य झाले आहे. यावरून या परिसरातील नापिकीची दाहकता लक्षात येते. घरात धान्य नाही, शेतात काम नाही. यामुळे शेतमजुराची अवस्था बिकट झाली आहे. शेतीच्या हंगामात जमा केलेले धान्य मजुरी नसल्यामुळे खाण्यात आले. पण भविष्यात कसे जगणार या विचारचक्रात तो गुंतला आहे. रोजगाराच्या कामाला सुरूवात झाली असली तरी तो गावापासून दूर जाण्यास तयार नाही. गावात काम नाही, घरात धान्य नाही. यामुळे ग्रामीण भागात वस्तू गहाण ठेवण्याचे प्रकार सुरू केल्याने त्यांचे घरातील चुली किती दिवस पेटणार, हाच खरा प्रश्न आहे. यंदा खरीप हंगामातही पाहीजे त्या प्रमाणात उत्पन्न झाले नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आता रबी हंगामावरही निसर्ग कोपल्याने वाईट अवस्था आहे.बाजारपेठेत मंदीकापूस व संत्रा नसल्याने बाजारपेठेत मंदीचे सावट आले आहे. मालाला उठाव नसल्याने व्यापारी वर्गसुद्धा नापिकीच्या फटक्याने गारद झाला आहे. परिसरातील गरीब शेतमजुरांची मुले अक्षरश: घरदार सोडून कामाच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. पण तेथेही त्यांना काम मिळत नसल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. जेथे व्यापाऱ्यांची दैनावस्था झाली तेथे त्यांना रोजगार कोण देणार, हा खरा प्रश्न आहे. शेतकरी यावर्षी नापिकीने पूर्णत: कर्जबाजारी झाला आहे. तो वर्षभर दुकानदाराकडून कपडे, किराणा, कृषीविषयक साहित्य उसनवारीने घेत असतो. त्याची परतफेड कशी करावी ही चिंता त्याला सदासर्वकाळ सतावत आहे. त्यामुळे अनेकांवर अल्पभावात जमिनी विकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. मात्र विक्रीस काढलेल्या जमिनीला खरेदीदार मिळत नसल्याने चहूकडून बळीराजाची कोंडी होत आहे.जनावरांची विक्रीयंदा शेती पिकली नसल्यामुळे वैरणाची समस्या निर्माण झाली. जंगलातही चाऱ्याची पाहिजे त्या प्रमाणात उगवन नसल्यामुळे पशुपालकांनी आपली जनावरे विक्रीला काढली आहे. नापिकीच्या फटक्याने ते आता कोठून जनावरांच्या वैरणाची सोय लावणार, कुटार, कडबा यांचे भाव आकाशाला भिडल्याने जनावरांचे पालन करणे कठीण झाले आहे.