शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

रबी पीककर्ज वाटप; बँकांचा असहकार

By admin | Updated: January 3, 2015 22:52 IST

खरीप हंगामातील नापिकीने हवालदिल शेतकऱ्यांना रबी पेरणीसाठी पीककर्ज वाटपात बँकांनी हात आखडता घेतला आहे. २० डिसेंबर २०१४ पर्यंत शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने

सहकारी बँकेचा भोपळा : उद्दिष्ट्यपूर्तीलाच ‘खो’, शेतकरी आर्थिक संकटात गजानन मोहोड - अमरावतीखरीप हंगामातील नापिकीने हवालदिल शेतकऱ्यांना रबी पेरणीसाठी पीककर्ज वाटपात बँकांनी हात आखडता घेतला आहे. २० डिसेंबर २०१४ पर्यंत शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने एकाही शेतकऱ्याला पीक कर्ज दिलेले नाही. तर राष्ट्रीयीकृत बँकांनी देखील रबी पीक कर्जाच्या उद्दिष्ट्यपूर्तीला ‘खो’ दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. पीक कर्जाच्या उद्दिष्टासाठी निर्धारित जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी रबीसाठी केवळ ७ टक्केच कर्जवाटप केले आहे. यंदाच्या रबी हंगामासाठी जिल्ह्याला ३५० कोटी ८२ लक्ष रूपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु २० डिसेंबर २०१४ पर्यंत राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी २ हजार ४२६ शेतकरी सभासदांना केवळ ४३ कोटी १८ लाख रूपयांच्या पीककर्जाचे वाटप केले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकाही शेतकरी सभासदाला रबी पिकासाठी कर्ज दिले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. हे कर्जवाटप ‘टार्गेट’च्या केवळ ७ टक्के इतकेच आहे. तुलनेत खरीप पीककर्ज वाटप उद्दिष्टाच्या ७१ टक्के करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती शेतकरी सहकारी बँकेने ५८,४८५ शेतकऱ्यांना ४३४ कोटी ९३ लक्ष ८७ हजारांचे पीककर्ज वाटप केले. हे वाटप उद्दिष्टाच्या ९१ टक्के इतके आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी ६१ हजार २७८ शेतकऱ्यांना ६७८ कोटी ३३ लक्ष रूपयांचे कर्जवाटप केले. हे वाटप उद्दिष्टाच्या ६३ टक्के आहे.तर जिल्ह्यातील ग्रामीण बँकांनी ८०० शेतकऱ्यांना ७ कोटी १२ लाख रूपयांचे कर्जवाटप केले. हे कर्जवाटप उद्दिष्टयाच्या ९२ टक्के होते. यंदा पीककर्ज वाटप करण्यात न आल्याने शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे.