शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रबी पीक विम्याचे मिळणार ३ कोटी २२ लाख

By admin | Updated: January 26, 2016 00:12 IST

रबी हंगाम सन २०१४-१५ मध्ये पीक विमा योजना राबविण्यात आली होती.

 हंगाम २०१४-१५ : २ हजार ६२० शेतकरी होणार लाभान्वित अमरावती : रबी हंगाम सन २०१४-१५ मध्ये पीक विमा योजना राबविण्यात आली होती. यामध्ये ३ हजार २५५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून ४ हजार ६२४ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यापैकी २ हजार ६२० शेतकऱ्यांना ३ कोटी २२ लाख ७३ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूूर करण्यात येणार आहे. अवेळी पाऊस, तापमान व आर्द्रता या हवामान घटकांच्या धोक्यापासून शेतीपिकांना संरक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत ही योजना जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील ३ हजार २५५ शेतकऱ्यांनी १३ लाख ९६ हजारांचा भरणा करुन ६ कोटी ९४ हजार रुपयांची विमा रक्कम संरक्षित केली. या आठवड्यात विमा कंपनीकडून २ हजार ६२० शेतकऱ्यांना ३ कोटी २२ लाख ७३ हजारांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ३ शेतकऱ्यांना ४ हजार रूपये मिळणार आहे. भातकुली तालुक्यात २८३ शेतकऱ्यांनी विमा काढला. यापैकी ५ शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळतील. चांदूररेल्वे तालुक्यात ४३ शेतकऱ्यांना ४० हजार रुपयांचा लाभ मिळेल. मोर्शी तालुक्यात ३ शेतकऱ्यांना ८ हजार, वरुड तालुक्यात ११ शेतकऱ्यांना ८ हजार, अचलपूर तालुक्यात २ शेतकऱ्यांना २ हजार, चिखलदरा तालुक्यात ५ शेतकऱ्यांना ५ हजार रुपये व अंजनगांव तालुक्यात १०६ शेतकऱ्यांनी विमा काढला होता यापैकी ३८ शेतकऱ्यांना १ लाख १९ हजार रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला. चार तालुक्यांना भोपळा नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ८३ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. मात्र, एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही. धामणगाव तालुक्यात ९१ शेतकरी, चांदूरबाजार तालुक्यात १४ शेतकरी व धारणी तालुक्यात एका शेतकऱ्याने विमा काढला होता. परंतु या तालुक्याला पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. दर्यापूर तालुक्यास ३ कोटी २० लाख खारपाणपट्टा असलेल्या दर्यापूर तालुक्यात हरभरा पिकाचे सर्वाधिक क्षेत्र होते. या तालुक्यात २ हजार ५१० शेतकऱ्यांनी ३ हजार ८७६ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यासाठी ११ लाख ५९ हजारांचा हफ्ता भरुन ५ कोटी ६३ लाख ९३ हजाराची रकम संरक्षित केली. यापैकी सर्वच शेतकऱ्यांना ३ कोटी २० लाख ८४ हजारांची नुकसान भरपाई मिळणार आहे.