शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

रबी पीक विम्याचे मिळणार ३ कोटी २२ लाख

By admin | Updated: January 26, 2016 00:12 IST

रबी हंगाम सन २०१४-१५ मध्ये पीक विमा योजना राबविण्यात आली होती.

 हंगाम २०१४-१५ : २ हजार ६२० शेतकरी होणार लाभान्वित अमरावती : रबी हंगाम सन २०१४-१५ मध्ये पीक विमा योजना राबविण्यात आली होती. यामध्ये ३ हजार २५५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून ४ हजार ६२४ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यापैकी २ हजार ६२० शेतकऱ्यांना ३ कोटी २२ लाख ७३ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूूर करण्यात येणार आहे. अवेळी पाऊस, तापमान व आर्द्रता या हवामान घटकांच्या धोक्यापासून शेतीपिकांना संरक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत ही योजना जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील ३ हजार २५५ शेतकऱ्यांनी १३ लाख ९६ हजारांचा भरणा करुन ६ कोटी ९४ हजार रुपयांची विमा रक्कम संरक्षित केली. या आठवड्यात विमा कंपनीकडून २ हजार ६२० शेतकऱ्यांना ३ कोटी २२ लाख ७३ हजारांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ३ शेतकऱ्यांना ४ हजार रूपये मिळणार आहे. भातकुली तालुक्यात २८३ शेतकऱ्यांनी विमा काढला. यापैकी ५ शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळतील. चांदूररेल्वे तालुक्यात ४३ शेतकऱ्यांना ४० हजार रुपयांचा लाभ मिळेल. मोर्शी तालुक्यात ३ शेतकऱ्यांना ८ हजार, वरुड तालुक्यात ११ शेतकऱ्यांना ८ हजार, अचलपूर तालुक्यात २ शेतकऱ्यांना २ हजार, चिखलदरा तालुक्यात ५ शेतकऱ्यांना ५ हजार रुपये व अंजनगांव तालुक्यात १०६ शेतकऱ्यांनी विमा काढला होता यापैकी ३८ शेतकऱ्यांना १ लाख १९ हजार रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला. चार तालुक्यांना भोपळा नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ८३ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. मात्र, एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही. धामणगाव तालुक्यात ९१ शेतकरी, चांदूरबाजार तालुक्यात १४ शेतकरी व धारणी तालुक्यात एका शेतकऱ्याने विमा काढला होता. परंतु या तालुक्याला पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. दर्यापूर तालुक्यास ३ कोटी २० लाख खारपाणपट्टा असलेल्या दर्यापूर तालुक्यात हरभरा पिकाचे सर्वाधिक क्षेत्र होते. या तालुक्यात २ हजार ५१० शेतकऱ्यांनी ३ हजार ८७६ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यासाठी ११ लाख ५९ हजारांचा हफ्ता भरुन ५ कोटी ६३ लाख ९३ हजाराची रकम संरक्षित केली. यापैकी सर्वच शेतकऱ्यांना ३ कोटी २० लाख ८४ हजारांची नुकसान भरपाई मिळणार आहे.