शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

रबी पीक विम्याचे मिळणार ३ कोटी २२ लाख

By admin | Updated: January 26, 2016 00:12 IST

रबी हंगाम सन २०१४-१५ मध्ये पीक विमा योजना राबविण्यात आली होती.

 हंगाम २०१४-१५ : २ हजार ६२० शेतकरी होणार लाभान्वित अमरावती : रबी हंगाम सन २०१४-१५ मध्ये पीक विमा योजना राबविण्यात आली होती. यामध्ये ३ हजार २५५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून ४ हजार ६२४ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यापैकी २ हजार ६२० शेतकऱ्यांना ३ कोटी २२ लाख ७३ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूूर करण्यात येणार आहे. अवेळी पाऊस, तापमान व आर्द्रता या हवामान घटकांच्या धोक्यापासून शेतीपिकांना संरक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत ही योजना जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील ३ हजार २५५ शेतकऱ्यांनी १३ लाख ९६ हजारांचा भरणा करुन ६ कोटी ९४ हजार रुपयांची विमा रक्कम संरक्षित केली. या आठवड्यात विमा कंपनीकडून २ हजार ६२० शेतकऱ्यांना ३ कोटी २२ लाख ७३ हजारांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ३ शेतकऱ्यांना ४ हजार रूपये मिळणार आहे. भातकुली तालुक्यात २८३ शेतकऱ्यांनी विमा काढला. यापैकी ५ शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळतील. चांदूररेल्वे तालुक्यात ४३ शेतकऱ्यांना ४० हजार रुपयांचा लाभ मिळेल. मोर्शी तालुक्यात ३ शेतकऱ्यांना ८ हजार, वरुड तालुक्यात ११ शेतकऱ्यांना ८ हजार, अचलपूर तालुक्यात २ शेतकऱ्यांना २ हजार, चिखलदरा तालुक्यात ५ शेतकऱ्यांना ५ हजार रुपये व अंजनगांव तालुक्यात १०६ शेतकऱ्यांनी विमा काढला होता यापैकी ३८ शेतकऱ्यांना १ लाख १९ हजार रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला. चार तालुक्यांना भोपळा नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ८३ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. मात्र, एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही. धामणगाव तालुक्यात ९१ शेतकरी, चांदूरबाजार तालुक्यात १४ शेतकरी व धारणी तालुक्यात एका शेतकऱ्याने विमा काढला होता. परंतु या तालुक्याला पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. दर्यापूर तालुक्यास ३ कोटी २० लाख खारपाणपट्टा असलेल्या दर्यापूर तालुक्यात हरभरा पिकाचे सर्वाधिक क्षेत्र होते. या तालुक्यात २ हजार ५१० शेतकऱ्यांनी ३ हजार ८७६ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यासाठी ११ लाख ५९ हजारांचा हफ्ता भरुन ५ कोटी ६३ लाख ९३ हजाराची रकम संरक्षित केली. यापैकी सर्वच शेतकऱ्यांना ३ कोटी २० लाख ८४ हजारांची नुकसान भरपाई मिळणार आहे.