शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अभियांत्रिकी पेपरच्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:29 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्तपासणी मूल्यांकनात त्रुटी असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने सोमवारी तब्बल सहा तास ठिय्या दिला.

ठळक मुद्देउत्तरपत्रिकेवर गैरहजेरीने विद्यार्थी गोंधळले : युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्तपासणी मूल्यांकनात त्रुटी असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने सोमवारी तब्बल सहा तास ठिय्या दिला. कुलगुरूंच्या दालनाकडे आगेकूच करताना कुलसचिवांसोबत त्यांचा शाब्दिक वाददेखील झाला. कुलगुरूंना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.युवा स्वाभिमान पार्टीचे शहर उपाध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाच्या गलथान कारभाराविरुद्ध एल्गार पुकारला. आंदोलक विद्यार्थ्यांनी थेट कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या दालनाकडे जाण्याचा प्रयत्न करीत असता, कुलसचिव अजय देशमुख यांनी त्यांना रोखले. कुलगुरू दालनात नाही; त्यांचे दालन उघडता येणार नाही, अशी नियमावली त्यांनी सांगितली. मात्र, आम्ही कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या मांडूच, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यानंतर कुलसचिवांच्या आदेशानुसार सुरक्षा यंत्रणेने प्रशासकीय इमारतीचे प्रमुख प्रवेशद्वार बंद केले. विद्यार्थ्यांनी या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला. कालांतराने कुलगुरू चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि कुलसचिव अजय देशमुख या विद्यापीठाच्या प्रमुख तिन्ही शिलेदारांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी, प्रश्न जाणून घेतले. यासंदर्भात २५ आॅगस्टपूर्वी पडताळणी करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासित करण्यात आले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडविल्यानंतरही उत्तरपत्रिकेवर ‘नॉट अटेम्ट’ असे नमूद आहे. परीक्षेस हजर असूनही महाविद्यालयांच्या चुकीमुळे त्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थिती दर्शविली आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याकरिता ‘कॅरीआॅन’ जाहीर करून त्यांना न्याय प्रदान करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.शुभम भांडे, दीक्षा सिरसाठ, सुफियान काझी, दर्शन वानखडे, शुभम कलाने, कार्तिक शेवतकर, अमृता वाटाणे, शिवानी माने, प्रफुल्ल फरकडे, शाम मापारी, राहुल आळे, अभिलेख सुखदान, प्रणय तलवारे, अधीक्षा लव्हाळे, अभिनव कडू, श्याम कडू, अमृता धांडे, अजय खासबागे, आनंद दांडगे, विवेक सोनोने, प्रथमेश भाकरे, पीयूष कोटरांगे, अक्षय डवरे, ऋषीकेश पोहरे, शुभम काळमेघ आदींनी आपल्या व्यथा मांडल्या.अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेतल्या. २५ आॅगस्टपूर्वी पडताळणी केली जाईल. आंदोलकांनी निवेदन दिले. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.- राजेश जयपूरकरप्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :universityविद्यापीठ