शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उडी मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
5
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
6
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
7
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
8
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
9
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
10
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
11
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
12
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
13
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
14
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
15
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
16
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
17
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
18
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
19
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
20
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

अभियांत्रिकी पेपरच्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:29 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्तपासणी मूल्यांकनात त्रुटी असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने सोमवारी तब्बल सहा तास ठिय्या दिला.

ठळक मुद्देउत्तरपत्रिकेवर गैरहजेरीने विद्यार्थी गोंधळले : युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्तपासणी मूल्यांकनात त्रुटी असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने सोमवारी तब्बल सहा तास ठिय्या दिला. कुलगुरूंच्या दालनाकडे आगेकूच करताना कुलसचिवांसोबत त्यांचा शाब्दिक वाददेखील झाला. कुलगुरूंना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.युवा स्वाभिमान पार्टीचे शहर उपाध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाच्या गलथान कारभाराविरुद्ध एल्गार पुकारला. आंदोलक विद्यार्थ्यांनी थेट कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या दालनाकडे जाण्याचा प्रयत्न करीत असता, कुलसचिव अजय देशमुख यांनी त्यांना रोखले. कुलगुरू दालनात नाही; त्यांचे दालन उघडता येणार नाही, अशी नियमावली त्यांनी सांगितली. मात्र, आम्ही कुलगुरूंच्या दालनासमोर ठिय्या मांडूच, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यानंतर कुलसचिवांच्या आदेशानुसार सुरक्षा यंत्रणेने प्रशासकीय इमारतीचे प्रमुख प्रवेशद्वार बंद केले. विद्यार्थ्यांनी या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला. कालांतराने कुलगुरू चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि कुलसचिव अजय देशमुख या विद्यापीठाच्या प्रमुख तिन्ही शिलेदारांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी, प्रश्न जाणून घेतले. यासंदर्भात २५ आॅगस्टपूर्वी पडताळणी करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासित करण्यात आले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडविल्यानंतरही उत्तरपत्रिकेवर ‘नॉट अटेम्ट’ असे नमूद आहे. परीक्षेस हजर असूनही महाविद्यालयांच्या चुकीमुळे त्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थिती दर्शविली आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याकरिता ‘कॅरीआॅन’ जाहीर करून त्यांना न्याय प्रदान करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.शुभम भांडे, दीक्षा सिरसाठ, सुफियान काझी, दर्शन वानखडे, शुभम कलाने, कार्तिक शेवतकर, अमृता वाटाणे, शिवानी माने, प्रफुल्ल फरकडे, शाम मापारी, राहुल आळे, अभिलेख सुखदान, प्रणय तलवारे, अधीक्षा लव्हाळे, अभिनव कडू, श्याम कडू, अमृता धांडे, अजय खासबागे, आनंद दांडगे, विवेक सोनोने, प्रथमेश भाकरे, पीयूष कोटरांगे, अक्षय डवरे, ऋषीकेश पोहरे, शुभम काळमेघ आदींनी आपल्या व्यथा मांडल्या.अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेतल्या. २५ आॅगस्टपूर्वी पडताळणी केली जाईल. आंदोलकांनी निवेदन दिले. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.- राजेश जयपूरकरप्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :universityविद्यापीठ