शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महाराष्ट्र संघ निवडीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: September 29, 2016 00:17 IST

राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा थाटात पार पडल्यानंतर बुधवारी महाराष्ट्र संघासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली.

पुण्यातील खेळाडूला डावलले : पालकांचा स्पष्ट आरोप अमरावती : राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा थाटात पार पडल्यानंतर बुधवारी महाराष्ट्र संघासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. मात्र, निवड समितीने पुणे संघातील एका खेळाडुूला मुद्दामच डावलल्याचा आरोप खेळाडूच्या पालकांनी केल्याने गोंधळ उडाला होता. पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना व जिल्हा हौशी बास्केटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २८ सप्टेंबर दरम्यान पाचदिवसीय बास्केटबॉल स्पर्धा पार पडल्या. यामध्ये राज्यभरातील ८०० खेळाडूंनी भाग घेतला. मंगळवारी स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला.याकार्यक्रमात विजेता, उपविजेत्यांसह तृतीय क्रमाक पटकावणाऱ्या संघांना ट्रॉफी व बक्षिस वितरीत करण्यात आले. बुधवारी विविध वयोगटनिहाय खेळाडूंची चाचणी घेऊन महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार होता. निवड समितीने खेळाडूंची चाचणी घेऊन निवड केल्यानंतर पुणे संघातील एका खेळाडूच्या कोच व पालकांनी निवड समितीच्या पारदर्शकतेवरच आक्षेप घेतला. अन्य विजेता संघातील तीन खेळाडंूची निवड करण्यात आली. मात्र, पुणे संघातील केवळ दोन खेळाडूंची निवड केल्याने निवड समितीने सूर्यवंशी नामक खेळाडूला हेतुपुरस्सरपणे डावलल्याचा आरोप पालकांद्वारे करण्यात आला. प्रशिक्षकासह खेळाडूच्या आई-वडिलांनी उपसंचालक प्रतिभा देशमुख यांचे कक्ष गाठून न्यायाची मागणी केल्याने गोंधळ उडाला होता. आई-वडिलांच्या लेखी तक्रारीवरून पुढील कारवाईसंदर्भात दिशा ठरविण्यात येईल, अशा सूचना उपसंचालकांनी दिल्यात. त्यानुसार खेळाडूच्या वडिलांनी निवड समितीवर आक्षेप नोंदविणारी तक्रार दिली असून याप्रकरणाकडे लक्ष लागले आहे.