शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

विद्यापीठाच्या आॅनलाईन मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: May 1, 2017 00:08 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने कोणतीही पूर्वतयारी न करता सुरू केलेले आॅनलाईन मूल्यांकन आणि त्यानंतर उडालेल्या गोंधळाबाबत राज्य शासनाने नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाची नाराजी : उच्च तंत्र शिक्षण विभागाचेही ताशेरेअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने कोणतीही पूर्वतयारी न करता सुरू केलेले आॅनलाईन मूल्यांकन आणि त्यानंतर उडालेल्या गोंधळाबाबत राज्य शासनाने नाराजी व्यक्त केली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या निकालावरून उच्च व तंत्र शिक्षण विभागानेही ताशेरे ओढल्याची माहिती मिळाली आहे.विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा विषयांचे ‘एण्ड टू एण्ड’ आॅनलाईन कामे बंगळूरू येथील माइंड लॉजिक या एजन्सीकडे सोपविली होती. मात्र विद्यापीठाने कोणतीही तयारी न करता अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमांची परीक्षा आॅनलाईन घेतली. अशातच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत असंख्य चुका असल्याने आॅनलाईन मूल्यांकन वेळेत होऊ शकले नाही. विद्यापीठ कायदानुसार परीक्षा आटोपल्यानंतर ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे नियमावली आहे. परंतु १०० दिवसांचा कालावधी लोटला असताना परीक्षांचे निकाल लागू शकले नाही. निकाल कधी लागणार ही कैफियत घेऊन विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठात धडक दिली. गत महिन्यात विद्यार्थ्यांचे मोर्चे, आंदोलन, कुलगुरुंना घेराव आदी भानगडींनी विद्यापीठाचा कारभार गाजला. अशातही कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी दिवस-रात्र एक करून परीक्षांचे निकाल लावून विद्यार्थ्यांचा आक्रोश कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यापीठाने आॅनलाईन निकाल, मूल्यांकन, परीक्षांची कामे एजन्सीला सोपविताना यातील तांत्रिक अडचणी, समस्या जाणून न घेता ती सर्व कामे एजन्सीला सोपविण्यामागील कारण काय, असा सवाल उपस्थित करीत याविषयी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या प्रश्नावर बोट ठेवले आहे. हा सर्व प्रकार माइंड लॉजीकच्या गोंधळामुळे झाल्याचे कारण विद्यापीठ प्रशासनाने पुढे करून आम्ही योग्य, असे भासविण्याचा अफलातून प्रयत्न चालविला आहे. परंतु राज्य शासनाकडे आॅनलाईन निकालाबाबत सातत्याने मिळत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या एकुणच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)माइंड लॉजिकवर कायदेशीर कारवाईची तयारीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आॅनलाईन निकालात गोंधळ उडाल्याप्रकरणी माइंड लॉजीक या एजन्सीवर कायदेशिर कारवाई करण्याची तयारी चालविली आहे. करारनाम्यानुसार सदर एजन्सीने वेळेच्या आत परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ कामे केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. माइंड लॉजीकवर दंडात्मक आणि कायदेशिर कारवाईसाठी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी तयारी चालविल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.