शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

१२६ शाळांमध्ये गुणवत्ता चाचणी

By admin | Updated: January 7, 2015 22:46 IST

तालुक्यातील १२६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी तपासण्याकरिता, लेखन, वाचन व गणित विकास अभियान ५ व ६ जानेवारीला राबविण्यात आले. यात जिल्हा परिषदेच्या

चांदूरबाजार : तालुक्यातील १२६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी तपासण्याकरिता, लेखन, वाचन व गणित विकास अभियान ५ व ६ जानेवारीला राबविण्यात आले. यात जिल्हा परिषदेच्या १२१ व नगरपालिकेच्या ५ शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यात आली. येत्या दोन दिवसांत या संबंधीचा संपूर्ण अहवाल गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर होणार आहे. या अहवालानंतरच प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचे सत्य समोर येणार आहे.शासन प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करतो. तरीही जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळांचा दर्जा अतिशय सुमार आहे. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांची प्राथमिकपणे गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, याची मागणी सातत्याने होत होती. त्याची दखल घेवून शासनाने वाचन, लेखन व गणित विकास कार्यक्रम आखला होता. त्यानुसार ५ जानेवारी व ६ जानेवारीला शाळांमधून हे अभियान राबविण्यात आले आहे.वर्ग २ ते ५ च्या विद्यार्थ्यांकरिता हे गुणवत्ता तपासणी अभियान राबविण्यात आला. त्यासाठी किमान अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. या अभ्यासक्रमाची पुस्तिका आधीच सर्व शाळांना पाठविण्यात आली होती. त्या मार्गदर्शक पुस्तिकेनुसार गुणवत्ता तपासणी अभियान राबविल्या आले आहे. या पुस्तिकेत शिक्षकांना कशा पध्दतीने शिकवावे व विद्यार्थ्यांची चाचणी कशी घ्यावी या बाबतीचे सविस्तर विश्लेषन करण्यात आले आहे. याबाबतीचे प्रशिक्षणही शिक्षकांना आधीच देण्यात आले होते.वेगवेगळ्या वर्गासाठी चाचणीचे स्वरुप ही वेगवेगळे ठेवण्यात आले होते. वर्ग २ च्या विद्यार्थ्यांना सोपी दोन वाक्ये वाचता यावी. सोप्या चार वाक्यांचे वाचन करुन त्यावर आधारीत प्रश्नांची उत्तरे लिहीण्यास सांगण्यात आली. ओळखीचे चित्र पाहून त्याचे नाव लिहिण्या लावणे, अंक २० पर्यंतच्या संख्यांचे वाचन, लेखन, तुलना आणि एक अंकी संख्यांची बेरीज-वजाबाकी देण्यात आली होती. वर्ग तीन मधील विद्यार्थ्यांना चार ते पाच ओळींचा परिच्छेद वाचावयास देण्यात आला. त्यावर आधारित प्रश्नही विचारण्यात आलेत. तसेच चार वाक्यांचे लेखन, दोन अंकी संख्याचे वाचन, लेखन व तुलना यावरुन गुणवत्ता तपासणी करण्यात आली. चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सहा ते आठ ओळींचा परिच्छेद वाचन, सोप्या वाक्याचा मजकुरावरुन त्यावर आधारीत प्रश्नांची उत्तरे लिहीने, चित्राच्या आधारावर दोन ते तीन वाक्य लिहीने, १००० पर्यंतच्या संख्यांचे वाचन व तीन अंकी संख्यांची तुलना व मांडणी यावरुन गुणवत्ता तपासणी करण्यात आली. तसेच वग ५ साठी आठ ओळींचे परिच्छेद वाचन, सोप्या वाक्यांचा मजकुरावर त्यावर आधारीत प्रश्नांची उत्तरे लिहने ठरविण्यात आली आहे. ईरशाद खान, प्रभारी गटशिक्षणाधिकारी पं.स. चांदूरबाजार, शासनाच्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात आले असून लवकरच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्तेवर अहवाल प्राप्त होणार आहे. यात गुण व वक्तेनुसार अ,ब,क, ड अशी चार गटात विभागणी करण्यात येईल. यामध्ये ७५ च्या वरील ब मध्ये ५० ते ७५, क मध्ये ३५ ते ५० व ड मध्ये १५ टक्के च्या खालील विद्यार्थी राहतील. यात क व ड गटातील विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शक पुस्तिकेनुसार त्यांच्या गुणवत्ता स्तर वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्या जाणार आहे.