शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

जलयुक्त शिवारला ‘कृषी’चा ‘दे धक्का’

By admin | Updated: March 29, 2017 00:19 IST

दुष्काळावर मात करुन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवावा व याद्वारे शेतकरी आत्महत्याचे दृष्टचक्र नष्ट व्हावे, ....

१६४६ कामांना मान्यता : ८४१ शासकीय कामे रखडलीअमरावती : दुष्काळावर मात करुन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवावा व याद्वारे शेतकरी आत्महत्याचे दृष्टचक्र नष्ट व्हावे, या उद्देशाने शासनाचे महत्त्वाकांक्षी उपक्रम जलयुक्त शिवारमध्ये इतर विभागाच्या तुलनेत झुकतेमाप दिले जाते. मात्र नियोजनाअभावी यंदा जलशिवारची वाट लागली आहे. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फक्त ८०५ कामेच पूर्ण झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल आहे.जलयुक्त शिवार अभियानासाठी सन २०१६-१७ करिता जिल्ह्यात १२ प्रकारच्या यंत्रणाद्वारा ३७२५ अंदाजपत्रके तयार करण्यात आली. यामध्ये एकट्या कृषी विभागाचे २११५ अंदाजपत्रके होते. यापैकी १६४६ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ७५ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये ७६१ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. यापैकी ५७ कामे मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होती, तर ८०५ कामे पूर्ण झालेली आहेत. म्हणजेच ८४१ कामे अद्यापही रखडली असल्याचा धक्कादायक अहवाल आहे. विशेष म्हणजे प्रशासकीय मान्यता असलेल्या कामांना ११ कोटी ३५ लाख ४५ हजारांची प्रशासकीय मान्यताप्राप्त आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात प्रशासकीय मान्यतेच्या ४३ कामांवर १५.०७ लाख, भातकुली ३७३ कामे २४२.४१ लाख, तिवसा २०२ कामे १६६.७६ लाख, चांदूररेल्वे ६३ कामे २९.९९ लाख, नांदगाव १७.०९ लाख, धामणगाव १०० कामे ६३.१७ लाख, मोर्शी १३४ कामे १६३.७८ लाख, वरूड ६२ कामे २९.३२ लाख, दर्यापूर ३१५ कामे ११४.८३ लाख, अंजनगाव १७८ कामे ७५.६९ लाख, अचलपूर २१० कामे ११०.२७ लाख, चांदूरबाजार ९१ कामे ३९.२० लाख, धारणी ४३ कामे २२.८१ लाख व चिखलदरा तालुक्यात ५३ कामांना ४५.०६ लाखाची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. चार दिवसावर मार्च एंडींग आला असल्याने करोडोंचा निधी अखर्चिक राहण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)