शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

पेढी नदीचे होणार पुनरूज्जीवन

By admin | Updated: June 4, 2014 23:20 IST

संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी वलगावच्या विकास आराखड्यांतर्गत मंजूर निधीतून पेढी नदीच्या पुनरूज्जीवन कार्याला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे. ४0 कोटींच्या या विकास आराखड्यांतर्गत प्राप्त

अमरावती : संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी वलगावच्या विकास आराखड्यांतर्गत मंजूर निधीतून पेढी नदीच्या पुनरूज्जीवन कार्याला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे. ४0 कोटींच्या या विकास आराखड्यांतर्गत प्राप्त ४ कोटींच्या निधीतून पेढी नदीचे खोलीकरण तसेच संभाव्य पूरहानी टाळण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाणार आहेत. आ. यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने नदी पुनरूज्जीवनाचा जिल्ह्यातील हा पहिला प्रकल्प मार्गी लागला आहे.३७८६.८४ लक्ष रूपयांच्या या विकास आराखड्यास राज्य शासनाने २२ ऑक्टोबर २0१२ रोजी मान्यता दिली आहे. विकास आराखड्यास मंजूर ५ कोटींच्या अर्थसंकल्पित निधीपैकी शासनाकडून बीडीएसवर ४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून पेढी नदीला पूर प्रतिबंधक निधीचे बांधकाम, घाटाची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या बांधांची दुरूस्ती आदी कामे केली जाणार आहेत.पावसाळ्यात पेढी नदीला आलेल्या पुरामुळे आसपासच्या गावांची होत असलेली प्रचंड हानी लक्षात घेता पूर प्रतिबंधक भिंतीचे बांधकाम करणे अत्यावश्यक झाले होते. पेढी नदी ही जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी आहे. परंतु सततच्या पुरामुळे नदीच्या प्रवाहाची दिशा बदलली आहे. त्यामुळे पुराचे पाणी गावात अस्ताव्यस्त पसरते. या पाण्यामुळे वलगाव व आसपासच्या छोट्या-छोट्या खेड्यातील नागरिकांना सतत धोका संभवतो. हा धोका कायमचा टाळण्यासाठी गाळ काढून नदीपात्राचे खोलीकरण करण्यात येईल. नदीचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी विशेष उपाययोजनांचे प्रावधान आहे. नदीतील पाणी हे परिसरातील नागरिकांसाठी जीवघेणे न ठरता ते जीवनदायी ठरावे, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.