शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डी प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:09 IST

फोटो पी ०३ बोर्डी चांदूर बाजार : बोर्डी नाला मध्यम प्रकल्प चांदूर बाजार तालुक्यातील १३ व अचलपूर तालुक्यातील तीन ...

फोटो पी ०३ बोर्डी

चांदूर बाजार : बोर्डी नाला मध्यम प्रकल्प चांदूर बाजार तालुक्यातील १३ व अचलपूर तालुक्यातील तीन अशा १६ गावांसाठी वरदान ठरणार आहे. मात्र, प्रकल्पाचे काम असमाधानकारक असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रकल्पाच्या कंत्राटदाराविरुद्ध दंडात्मक कारवाईचे स्पष्ट निर्देश शनिवारी दिले.

जलसंपदा राज्यमंत्री कडू यांनी बोर्डी नाला प्रकल्पातील सांडवा, धरण, घळभरणी, धरणात झालेल्या अंशतः जलसाठ्याची पाहणी केली. या पाहणीदरम्यान बोरगाव मोहना, तुळजापूर गढी रस्त्यावरील पुच्छ कालव्याच्या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापही अपूर्ण असल्याबद्दल राज्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. कंत्राटदाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. या कंत्राटदाराविरुद्ध दंडात्मक कारवाई तात्काळ करावी, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले. या पाहणीदरम्यान जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अभियंता सुनील राठी, सार्वजनिक बांधकाम अचलपूर उपविभागाचे कार्यकारी अभियंता सी.यू. मेहेत्रे, उपअभियंता एम.पी. भेंडे, सहायक अभियंता श्रेणी-१ निरज माळवे, प्रहारचे पदाधिकारी दीपक भोंगाडे आदी उपस्थित होते.

तुळजापूर गढी येथे शेतीसाठी तत्काळ रस्ता द्यावा

तुळजापूर गढी शिवारात जाण्यासाठीचा रस्ता बंद करण्यात आला, अशी शेतकरी बांधवांची तक्रार होती. त्याचे गांभीर्य जाणून राज्यमंत्री कडू यांनी प्रत्यक्ष रस्ता व पांदण रस्त्यांची पाहणी केली. तुळजापूर गढी गावातील शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ताच शिल्लक ठेवलेला नाही. त्यामुळे सुमारे ३०० एकर जमीन पिकांपासून वंचित राहून नुकसान शेतकऱ्यांनाच परिणाम भोगावे लागणार आहे. त्याबद्दल राज्यमंत्री कडू यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतकरी बांधवांना तात्काळ रस्ता उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

असा आहे प्रकल्प

प्रकल्पाची क्षमता १८.४९ दलघमी इतकी आहे. जून २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर ४ हजार १२६ हेक्टर जमिनीला थेट सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन हे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. ते तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले.