शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या दादा चव्हाण यांना आश्रमाने का केले हद्दपार ?

By admin | Updated: September 26, 2016 00:32 IST

शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमाचा कधीकाळी महत्त्वाचा आधार राहिलेल्या पुण्याच्या दादा चव्हाण यांना आश्रमातून हद्दपार का करण्यात आले,

अमरावती : शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमाचा कधीकाळी महत्त्वाचा आधार राहिलेल्या पुण्याच्या दादा चव्हाण यांना आश्रमातून हद्दपार का करण्यात आले, हा प्रश्न पोलीस तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नरबळी प्रकरणाचे वादळ उठल्यानंतर आश्रम पदाधिकाऱ्यांकडून चव्हाण कुटुंबियांचे नाव समोर आणले गेले. नरबळी प्रकरणाचा तपास सुरू असताना आश्रमाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून चव्हाण कुटुंबियांचा जाहीर नामोल्लेख होणे, ही बाब चव्हाणांच्या कृत्यांबाबत दाट संशय निर्माण करणारी आहे. दादा चव्हाण हे पिंपळखुट्याच्या आश्रमाचे एकेकाळी कारभारी होते. महाराजांच्या इशाऱ्यावर ते कार्य करीत असे. म्हणूनच ते महाराजांच्या जवळचे होते. मग नेमके असे काय घडले की, दादा चव्हाण यांनी आश्रमात राहूच नये, पुन्हा पायही ठेवू नये, असा निर्णय दोन-तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला? दादा चव्हाणांना हुसकावून लावेपर्यंतची वेळ का आली? आश्रमाला त्यांच्या वास्तव्यादरम्यान, त्यांच्या उपस्थितीदरम्यान नेमके काय खटकले? दादा चव्हाणांचे कुठले कृत्य आश्रमाला अडचणीत आणू शकणारे होते? दादा चव्हाणांनी केलेले कुठले असे आक्षेपार्ह कृत्य आश्रमाच्या नजरेत आले की, त्यामुळे त्यांना आश्रमातून केवळ हद्दपार करणेच योग्य ठरणार होते? कधीकाळी आसनाजवळ स्थान देणारे शंकर महाराजही चव्हाणांबाबत इतके कठोर का झाले होते? असा टोकाचा निर्णय का घेण्यात आला होता, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुद्दा नरबळीसारख्या महत्त्वपूर्ण गुन्ह्यांशी संबंधित असल्यामुळे सर्वच गूढ प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे. आश्रमात दादा चव्हाण यांचे ज्या काळात वास्तव्य होते, त्याकाळात आश्रमात काय-काय घडले? जुने अपमृत्यू प्रकाशात आले, त्याकाळी आश्रमात दादा चव्हाण यांचे वास्तव्य होते काय? असेल तर त्याकाळी त्यांचे अधिकार काय होते? प्रभावी व्यक्ती या नात्याने त्यांनी आश्रमात घडलेल्या संशयास्पद प्रकरणांबाबत, अपमृत्यूबाबत काय भूमिका वठविली? कायद्याचा त्यांनी सन्मान करून कर्तव्य निभावले की कायदा वाकविण्यासाठी आश्रमाच्या प्रभावाचा वापर केला? चव्हाण या अडनावाभोवती निर्माण झालेले गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी या प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे झाले आहे. आश्रमात आढळलेल्या वनखात्याच्या मालकीच्या अपसंपदेबाबतचा गुन्हा काही वर्षांपूर्वी वनविभागाने दाखल केला होता. या अवैध कार्यात त्यावेळी या चव्हाणांची भूमिका 'दादा' नावाला शोभणारी होती काय? नेमके काय घडले होते आश्रमात? या मुद्यांचा तळ गाठून पोलिसांना चव्हाण नावाभोवतीचे गूढ छेदता येईल.