शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

पुण्याच्या दादा चव्हाण यांना आश्रमाने का केले हद्दपार ?

By admin | Updated: September 26, 2016 00:32 IST

शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमाचा कधीकाळी महत्त्वाचा आधार राहिलेल्या पुण्याच्या दादा चव्हाण यांना आश्रमातून हद्दपार का करण्यात आले,

अमरावती : शंकर महाराज यांच्या पिंपळखुटा येथील आश्रमाचा कधीकाळी महत्त्वाचा आधार राहिलेल्या पुण्याच्या दादा चव्हाण यांना आश्रमातून हद्दपार का करण्यात आले, हा प्रश्न पोलीस तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नरबळी प्रकरणाचे वादळ उठल्यानंतर आश्रम पदाधिकाऱ्यांकडून चव्हाण कुटुंबियांचे नाव समोर आणले गेले. नरबळी प्रकरणाचा तपास सुरू असताना आश्रमाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून चव्हाण कुटुंबियांचा जाहीर नामोल्लेख होणे, ही बाब चव्हाणांच्या कृत्यांबाबत दाट संशय निर्माण करणारी आहे. दादा चव्हाण हे पिंपळखुट्याच्या आश्रमाचे एकेकाळी कारभारी होते. महाराजांच्या इशाऱ्यावर ते कार्य करीत असे. म्हणूनच ते महाराजांच्या जवळचे होते. मग नेमके असे काय घडले की, दादा चव्हाण यांनी आश्रमात राहूच नये, पुन्हा पायही ठेवू नये, असा निर्णय दोन-तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला? दादा चव्हाणांना हुसकावून लावेपर्यंतची वेळ का आली? आश्रमाला त्यांच्या वास्तव्यादरम्यान, त्यांच्या उपस्थितीदरम्यान नेमके काय खटकले? दादा चव्हाणांचे कुठले कृत्य आश्रमाला अडचणीत आणू शकणारे होते? दादा चव्हाणांनी केलेले कुठले असे आक्षेपार्ह कृत्य आश्रमाच्या नजरेत आले की, त्यामुळे त्यांना आश्रमातून केवळ हद्दपार करणेच योग्य ठरणार होते? कधीकाळी आसनाजवळ स्थान देणारे शंकर महाराजही चव्हाणांबाबत इतके कठोर का झाले होते? असा टोकाचा निर्णय का घेण्यात आला होता, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुद्दा नरबळीसारख्या महत्त्वपूर्ण गुन्ह्यांशी संबंधित असल्यामुळे सर्वच गूढ प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे. आश्रमात दादा चव्हाण यांचे ज्या काळात वास्तव्य होते, त्याकाळात आश्रमात काय-काय घडले? जुने अपमृत्यू प्रकाशात आले, त्याकाळी आश्रमात दादा चव्हाण यांचे वास्तव्य होते काय? असेल तर त्याकाळी त्यांचे अधिकार काय होते? प्रभावी व्यक्ती या नात्याने त्यांनी आश्रमात घडलेल्या संशयास्पद प्रकरणांबाबत, अपमृत्यूबाबत काय भूमिका वठविली? कायद्याचा त्यांनी सन्मान करून कर्तव्य निभावले की कायदा वाकविण्यासाठी आश्रमाच्या प्रभावाचा वापर केला? चव्हाण या अडनावाभोवती निर्माण झालेले गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी या प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे झाले आहे. आश्रमात आढळलेल्या वनखात्याच्या मालकीच्या अपसंपदेबाबतचा गुन्हा काही वर्षांपूर्वी वनविभागाने दाखल केला होता. या अवैध कार्यात त्यावेळी या चव्हाणांची भूमिका 'दादा' नावाला शोभणारी होती काय? नेमके काय घडले होते आश्रमात? या मुद्यांचा तळ गाठून पोलिसांना चव्हाण नावाभोवतीचे गूढ छेदता येईल.