शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पायी रॅलीतून ‘स्मार्ट सिटी’बाबत जनजागृती

By admin | Updated: November 30, 2015 00:26 IST

महानगरपालिकेद्वारे स्वच्छ भारत, पर्यावरण जागरुकता, ‘स्मार्ट सिटी’बाबत सामान्य जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी पायी रॅली (वॉकेथॉन) रविवारी काढण्यात आली.

जिल्हा क्रीडा संकुलात सांगता : विशेष प्रयत्न करण्याचे आयुक्तांचे आवाहन अमरावती : महानगरपालिकेद्वारे स्वच्छ भारत, पर्यावरण जागरुकता, ‘स्मार्ट सिटी’बाबत सामान्य जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी पायी रॅली (वॉकेथॉन) रविवारी काढण्यात आली. जिल्हाधिकारी किरण गीत्ते, आ. रवी राणा, आ. सुनील देशमुख, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले आदींनी हिरवी झेंडी दाखविली. ही रॅली महापालिका मुख्य कार्यालयापासून राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन चौक), जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीत पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता प्रकाश बनसोड, अविनाश मार्डीकर, उपआयुक्त विनायक औघड, चंदन पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. प्रास्ताविक करताना महापालिका आयुक्तांनी ‘ग्रीन सिटी’ अमरावतीला ‘क्लीन सिटी’ बनवायचे आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. या दिशेने प्रयत्न करणाऱ्या काही गणमान्यांचा गौरव करण्यात येईल, असेही यावेळी बोलताना महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले. हागणदारीमुक्तीचे ध्येय अमरावती : अमरावती शहर हागणदारीमुक्तीचा मानस त्यांनी व्यक्त केला. मनपातर्फे शासनाच्या सहकार्याने शौचालय बांधणीसाठी आर्थिक मदत केली जात आहे. शहरात ज्या कुटुंबाकडे शौचालय नसेल त्यांना शौचालय बांधण्यासाठी १७ हजार रुपये दिले जाणार आहेत. या कार्यक्रमात शहरातील निसर्ग प्रेम मधु घारड, प्रेमकुमार गुप्ता, शंकर कुटारिया, पुरुषोत्तम कुमरे दत्ता धर्माळे, लप्पीसेठ जाजोदिया, नंदकिशोर गांधी, मानवेंद्र देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील स्वच्छतेसाठी भागीरथ ढेणवाल, तारा गोहर, अनिल धनस्कर, इंदु चव्हाण, श्रीहरी महिला बचतगट, स्वतंत्र सफाई कामगार नागरिक सेवा सहकारी संस्था यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी प्रत्येक नागरिकांनी स्मार्ट होणे आवश्यक आहे. नागरिक स्मार्ट झाले की शहरही स्मार्ट होण्यास वेळ लागणार नाही. अमरावती शहराला स्मार्ट सिटी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शहर चांगले राहण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर आपल्या शहराची नाव झाले आहे. मनपा प्रशासनाला जिल्हा प्रशासनाच नेहमीच सहकार्य राहणार, असे ते म्हणाले. आमदार रवी राणा यांनी अमरावती शहर हे स्मार्ट सिटी बनविण्यासाठी सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. मनपा प्रशासनाने सर्व नागरिकांना यात समाविष्ठ करून घ्यावे. मॅरेथॉन, सायकल रॅली यासारखे उपक्रम राबवावे. शहरातील विविध सामाजिक संघटनेला यात समाविष्ट करावे, अमरावतीतील नागरिकांनी यात सहभाग घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. आमदार सुनील देशमुख यांनी यावेळी ही रॅली आयोजित केल्याबद्दल मनपा प्रशासनाचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी अनेक प्रशासकीय अधिकारी अमरावती शहरात बदली झाल्यास अमरावती शहरात येण्यास उत्सुक नसतात. पण ते जेव्हा येतात तेव्हा त्यांचा समज हा दूर होऊन जातो. अमरावती शहर हे सुंदर शहर आहे. अनेक शहरापेक्षा जास्त विकास अमरावतीचा झाला आहे. प्रत्येकाने अमरावती माझी आहे ही भावना ठेवली पाहिजे. अमरावती शहर हे स्मार्ट सिटी बनविण्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. अमरावती मनपाला शासन स्तरावर सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. नितीन गडकरी यांनी अमरावती शहरातील मुख्य रस्ते काँक्रीटीकरणाचे करण्यासाठी मंजुरी दिली आहे. संचालन मदन तांबेकर यांनी तर आभार प्रदर्शन स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांनी केले. या रॅलीत पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, झोन सभापती मिलिंद बांबल, शहर सुधार समिती सभापती भूषण बनसोड, महिला व बालकल्याण समिती सभापती संगिता वाघ, नगरसेवक दिनेश बुब, सुनील काळे, हमीद शद्दा, राजू मसराम, नीलिमा काळे, सुजाता झाडे, स्वप्ना ठाकूर, नूतन भुजाडे, राजेंद्र महल्ले, जावेद मेमन तसेच संजय तिरथकर, प्रणय कुळकर्णी, पंजाबराव तायवाडे उपस्थित होते. या रॅलीत एचव्हीपीएमचे विद्यार्थी, होलीक्रॉस शाळेचे विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, अनेक शाळेचे विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी, शिक्षक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)