शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पायी रॅलीतून ‘स्मार्ट सिटी’बाबत जनजागृती

By admin | Updated: November 30, 2015 00:26 IST

महानगरपालिकेद्वारे स्वच्छ भारत, पर्यावरण जागरुकता, ‘स्मार्ट सिटी’बाबत सामान्य जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी पायी रॅली (वॉकेथॉन) रविवारी काढण्यात आली.

जिल्हा क्रीडा संकुलात सांगता : विशेष प्रयत्न करण्याचे आयुक्तांचे आवाहन अमरावती : महानगरपालिकेद्वारे स्वच्छ भारत, पर्यावरण जागरुकता, ‘स्मार्ट सिटी’बाबत सामान्य जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी पायी रॅली (वॉकेथॉन) रविवारी काढण्यात आली. जिल्हाधिकारी किरण गीत्ते, आ. रवी राणा, आ. सुनील देशमुख, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले आदींनी हिरवी झेंडी दाखविली. ही रॅली महापालिका मुख्य कार्यालयापासून राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन चौक), जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीत पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता प्रकाश बनसोड, अविनाश मार्डीकर, उपआयुक्त विनायक औघड, चंदन पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. प्रास्ताविक करताना महापालिका आयुक्तांनी ‘ग्रीन सिटी’ अमरावतीला ‘क्लीन सिटी’ बनवायचे आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. या दिशेने प्रयत्न करणाऱ्या काही गणमान्यांचा गौरव करण्यात येईल, असेही यावेळी बोलताना महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले. हागणदारीमुक्तीचे ध्येय अमरावती : अमरावती शहर हागणदारीमुक्तीचा मानस त्यांनी व्यक्त केला. मनपातर्फे शासनाच्या सहकार्याने शौचालय बांधणीसाठी आर्थिक मदत केली जात आहे. शहरात ज्या कुटुंबाकडे शौचालय नसेल त्यांना शौचालय बांधण्यासाठी १७ हजार रुपये दिले जाणार आहेत. या कार्यक्रमात शहरातील निसर्ग प्रेम मधु घारड, प्रेमकुमार गुप्ता, शंकर कुटारिया, पुरुषोत्तम कुमरे दत्ता धर्माळे, लप्पीसेठ जाजोदिया, नंदकिशोर गांधी, मानवेंद्र देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील स्वच्छतेसाठी भागीरथ ढेणवाल, तारा गोहर, अनिल धनस्कर, इंदु चव्हाण, श्रीहरी महिला बचतगट, स्वतंत्र सफाई कामगार नागरिक सेवा सहकारी संस्था यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी प्रत्येक नागरिकांनी स्मार्ट होणे आवश्यक आहे. नागरिक स्मार्ट झाले की शहरही स्मार्ट होण्यास वेळ लागणार नाही. अमरावती शहराला स्मार्ट सिटी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शहर चांगले राहण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर आपल्या शहराची नाव झाले आहे. मनपा प्रशासनाला जिल्हा प्रशासनाच नेहमीच सहकार्य राहणार, असे ते म्हणाले. आमदार रवी राणा यांनी अमरावती शहर हे स्मार्ट सिटी बनविण्यासाठी सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. मनपा प्रशासनाने सर्व नागरिकांना यात समाविष्ठ करून घ्यावे. मॅरेथॉन, सायकल रॅली यासारखे उपक्रम राबवावे. शहरातील विविध सामाजिक संघटनेला यात समाविष्ट करावे, अमरावतीतील नागरिकांनी यात सहभाग घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. आमदार सुनील देशमुख यांनी यावेळी ही रॅली आयोजित केल्याबद्दल मनपा प्रशासनाचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी अनेक प्रशासकीय अधिकारी अमरावती शहरात बदली झाल्यास अमरावती शहरात येण्यास उत्सुक नसतात. पण ते जेव्हा येतात तेव्हा त्यांचा समज हा दूर होऊन जातो. अमरावती शहर हे सुंदर शहर आहे. अनेक शहरापेक्षा जास्त विकास अमरावतीचा झाला आहे. प्रत्येकाने अमरावती माझी आहे ही भावना ठेवली पाहिजे. अमरावती शहर हे स्मार्ट सिटी बनविण्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. अमरावती मनपाला शासन स्तरावर सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. नितीन गडकरी यांनी अमरावती शहरातील मुख्य रस्ते काँक्रीटीकरणाचे करण्यासाठी मंजुरी दिली आहे. संचालन मदन तांबेकर यांनी तर आभार प्रदर्शन स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांनी केले. या रॅलीत पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, झोन सभापती मिलिंद बांबल, शहर सुधार समिती सभापती भूषण बनसोड, महिला व बालकल्याण समिती सभापती संगिता वाघ, नगरसेवक दिनेश बुब, सुनील काळे, हमीद शद्दा, राजू मसराम, नीलिमा काळे, सुजाता झाडे, स्वप्ना ठाकूर, नूतन भुजाडे, राजेंद्र महल्ले, जावेद मेमन तसेच संजय तिरथकर, प्रणय कुळकर्णी, पंजाबराव तायवाडे उपस्थित होते. या रॅलीत एचव्हीपीएमचे विद्यार्थी, होलीक्रॉस शाळेचे विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, अनेक शाळेचे विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी, शिक्षक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)