शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: जरांगे सांगत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही; हायकोर्ट निर्देशांनंतरही मराठा आंदोलक ठाम
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
6
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
7
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
8
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
9
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
10
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
11
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
12
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
13
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
14
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
15
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
16
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
17
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
18
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
19
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
20
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)

१५ आॅगस्टपासून केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीत धान्यपुरवठा

By admin | Updated: August 14, 2015 00:57 IST

विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ होऊ नये यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये ज्या कुटुंबांना लाभ मिळत नाही, ...

सचिवांचे निर्देश : पालकमंत्र्यांच्या हस्ते धान्य वाटपाचा शुभारंभअमरावती : विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ होऊ नये यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये ज्या कुटुंबांना लाभ मिळत नाही, अशा केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना तांदूळ ३ रुपये व गहू २ रुपये प्रतिकिलो या दराने वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ आॅगस्टपासून हे वाटप स्ुरू करण्यात येणार आहे, असे पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी पुरवठा सचिव कपूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपायुक्त (पुरवठा) मावसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के.वानखडे तसेच अमरावती विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. कपूर म्हणाले की, अमरावती विभागातील अमरावती, वाशीम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा या सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांप्रमाणे प्रतीमाह प्रतीव्यक्ती ५ किलो या परिमाणात अन्न धान्याचा लाभ देण्याकरिता केंद्र शासनाकडून (इकॉनॉमिक कॉस्ट)ने 'अ' दर्जाचे तांदूळ व गहू खरेदी करून सदर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. अतिरिक्त धान्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करावा. या योजनेअंतर्गत धान्य वाटपाचे स्वतंत्रपणे नोंदवही ठेवावी. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी दौऱ्यावर असताना त्याची तपासणी करावी. ज्या-ज्या ठिकाणी संभ्रम निर्माण होईल किंवा अडचण येतील येथे संबंधित शेतकऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र घेऊन धान्य वाटप करावे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यावेळी अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत धान्याची उचल, अन्त्योदय योजना, साखर, केरोसीनचे वितरण, गोडाऊन परिस्थिती, कल्याणकारी संस्थांना धान्याचे वाटप, ग्राहक मंचाकडील प्रलंबित प्रकरणे, वजनमापे विभागातर्फे झालेली कार्यवाही याबाबत तपशीलवार आढावा घेतला. जिल्ह्यात २ लाख २३ हजार ७०५ केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. यापैकी २ लाख १ हजार ३३४ केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या संख्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. (प्रतिनिधी)