शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

१५ आॅगस्टपासून केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीत धान्यपुरवठा

By admin | Updated: August 14, 2015 00:57 IST

विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ होऊ नये यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये ज्या कुटुंबांना लाभ मिळत नाही, ...

सचिवांचे निर्देश : पालकमंत्र्यांच्या हस्ते धान्य वाटपाचा शुभारंभअमरावती : विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ होऊ नये यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये ज्या कुटुंबांना लाभ मिळत नाही, अशा केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना तांदूळ ३ रुपये व गहू २ रुपये प्रतिकिलो या दराने वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ आॅगस्टपासून हे वाटप स्ुरू करण्यात येणार आहे, असे पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी पुरवठा सचिव कपूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपायुक्त (पुरवठा) मावसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के.वानखडे तसेच अमरावती विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. कपूर म्हणाले की, अमरावती विभागातील अमरावती, वाशीम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा या सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांप्रमाणे प्रतीमाह प्रतीव्यक्ती ५ किलो या परिमाणात अन्न धान्याचा लाभ देण्याकरिता केंद्र शासनाकडून (इकॉनॉमिक कॉस्ट)ने 'अ' दर्जाचे तांदूळ व गहू खरेदी करून सदर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. अतिरिक्त धान्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करावा. या योजनेअंतर्गत धान्य वाटपाचे स्वतंत्रपणे नोंदवही ठेवावी. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी दौऱ्यावर असताना त्याची तपासणी करावी. ज्या-ज्या ठिकाणी संभ्रम निर्माण होईल किंवा अडचण येतील येथे संबंधित शेतकऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र घेऊन धान्य वाटप करावे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यावेळी अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत धान्याची उचल, अन्त्योदय योजना, साखर, केरोसीनचे वितरण, गोडाऊन परिस्थिती, कल्याणकारी संस्थांना धान्याचे वाटप, ग्राहक मंचाकडील प्रलंबित प्रकरणे, वजनमापे विभागातर्फे झालेली कार्यवाही याबाबत तपशीलवार आढावा घेतला. जिल्ह्यात २ लाख २३ हजार ७०५ केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. यापैकी २ लाख १ हजार ३३४ केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या संख्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. (प्रतिनिधी)