शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

अवकाळीचा १७.५२ कोटींचा निधी उपलब्ध

By admin | Updated: March 22, 2016 00:30 IST

जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत गारपीट व अवराळी पावसामुळे शेती व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले.

मे ते आॅक्टोबर २०१४ मधील नुकसान : शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा अमरावती : जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत गारपीट व अवराळी पावसामुळे शेती व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रचलित दरापेक्षा अधिक दराने विशेष पॅकेजअंतर्गत शासनाने १७ कोटी ५२ लाखांचा निधी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला वितरित केला आहे. हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ९३७ शेतकऱ्यांच्या ३६ हजार ८४६ हेक्टर क्षेत्रामधील शेतीपिके व फळपिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये ७० हेक्टरमधील भात, ५ हजार ८०६ हेक्टरमधील कपाशी, १० हजार ४१ हेक्टरमधील सोयाबीन, १६ हजार ५४२ हेक्टरमधील तूर, ३ हजार १४५ हेक्टरमधील मूग व उडीद, ६५.४९ हेक्टरमधील ज्वारी व १८६ हेक्टर मधील इतर पिके बाधित झाली, असे एकूण ३५ हजार ८२८ हेक्टरमधील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. तसेच फळपिकांमध्ये ५१७ हेक्टर संत्रा, ५०० हेक्टर केळी, असे १ हजार ११७ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले होते. यासाठी शासनाद्वारा प्रचलित दरापेक्षा अधिक दराने विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)यंदाच्या एप्रिल ते जून मधील नुकसानीसाठी मदतयंदा एप्रिल ते जून महिन्यात वादळी पाऊस व गारपीटमुळे जिल्ह्यातील थोड्या प्रमाणात शेती पिके व फळपिके यांचे नुकसान झाले होते. यामध्ये ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाने शुक्रवारी ३ लाख ३८ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यास उपलब्ध केला आहे. लवकरच तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मिळणार दिलासासन २०१४-१५ मधील अवकाळी पावसाने ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. यंदाही शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस व गारपिटीने घाला घातला आहे. त्यामुळे पार मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हा निधी आधार देणारा ठरेल. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच हा निधी जमा होईल.