शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

२० पटसंख्येच्या शाळा बंद करण्याला विरोध

By admin | Updated: March 19, 2016 00:07 IST

जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील २० पटसंख्येच्या ३३० शाळा बंद न करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे.

जिल्हा परिषद : आगामी सर्वसाधारण सभेत सादर होणार प्रस्ताव जितेंद्र दखनेअमरावतीजिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील २० पटसंख्येच्या ३३० शाळा बंद न करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. २० पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात मिनी मंत्रालयाच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २० पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती झेडपीच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत मागविली आहे. यानुसार पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत ही माहिती गोळा करण्यात आली असून यामध्ये अचलपूर तालुक्यातील २४, अमरावती ३०, अंजनगाव सुर्जी ३०, भातकुली ३९, चांदूरबाजार २३, चांदूररेल्वे १५, चिखलदरा २९, दर्यापूर ४७, धामणगाव रेल्वे ८, धारणी ५, मोर्शी १७, नांदगाव खंडेश्वर २७, तिवसा १८, वरूड २५ या शाळा बंद करण्याचे प्रस्तावित आहे. संघटना सरसावल्याअमरावती : शासन निर्णयानुसार लहान गावांमधील शाळेतील विद्यार्थी नजीकच्या शाळेत दाखल केले जाईल. वाहतुकीची व्यवस्था जि.प. मार्फत करण्याचे प्रस्तावित आहे. यासंदर्भात राज्य शिक्षण आयुक्तांनी शिक्षण विभागाच्यावतीने २१ फेब्रुवारी रोजी २० पटसंख्येच्या शाळांची नावे, जवळच्या मोठ्या शाळांची नाव, अंतर, उपलब्ध असलेली वाहतूक व्यवस्था आणि अंदाजे लागणारा वार्षिक खर्च आदी माहिती मागविली आहे. मात्र, शासनाच्या या धोरणाला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. आता जि.प. पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनीही या निर्णयाला विरोध केला. शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार २० पटसंख्येच्या शाळांपैकी आदिवासीबहुल आणि पर्यायी व्यवस्था नसलेल्या शाळा शासनाने बंद करून नयेत, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गरज असलेल्या शाळा बंद करून नयेत, यासाठी येत्या सर्वसाधारण सभेत विरोधाचा ठराव मांडला जाणार आहे.ज्या ठिकाणी गरज नाही व बोटावर मोजण्या इतकीच विद्यार्थी संख्या आहे. त्याला आमचा विरोध नाही मात्र दुर्गम भागातील व वीस पेक्षा थोडीफार कमी असलेल्या शाळा सुरू ठेवण्यात याव्यात अशी मागणी आहे.-मोहन सिंगवी, सदस्य, जि.प.जिल्हा परिषद शाळेत गोरगरिबांची मुले ग्रामीण भागात शिक्षण घेतात महागड्या शिक्षणामुळे सामान्य माणसाला शिक्षणाचा खर्च न झेपणारा आहे. त्यामुळे २० पटसंख्येच्या शाळा बंद होऊ नये त्यासाठी सभेत ठराव घेऊ. -सतीश उईके, अध्यक्ष जिल्हा परिषद