शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

२० पटसंख्येच्या शाळा बंद करण्याला विरोध

By admin | Updated: March 19, 2016 00:07 IST

जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील २० पटसंख्येच्या ३३० शाळा बंद न करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे.

जिल्हा परिषद : आगामी सर्वसाधारण सभेत सादर होणार प्रस्ताव जितेंद्र दखनेअमरावतीजिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील २० पटसंख्येच्या ३३० शाळा बंद न करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. २० पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात मिनी मंत्रालयाच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २० पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती झेडपीच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत मागविली आहे. यानुसार पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत ही माहिती गोळा करण्यात आली असून यामध्ये अचलपूर तालुक्यातील २४, अमरावती ३०, अंजनगाव सुर्जी ३०, भातकुली ३९, चांदूरबाजार २३, चांदूररेल्वे १५, चिखलदरा २९, दर्यापूर ४७, धामणगाव रेल्वे ८, धारणी ५, मोर्शी १७, नांदगाव खंडेश्वर २७, तिवसा १८, वरूड २५ या शाळा बंद करण्याचे प्रस्तावित आहे. संघटना सरसावल्याअमरावती : शासन निर्णयानुसार लहान गावांमधील शाळेतील विद्यार्थी नजीकच्या शाळेत दाखल केले जाईल. वाहतुकीची व्यवस्था जि.प. मार्फत करण्याचे प्रस्तावित आहे. यासंदर्भात राज्य शिक्षण आयुक्तांनी शिक्षण विभागाच्यावतीने २१ फेब्रुवारी रोजी २० पटसंख्येच्या शाळांची नावे, जवळच्या मोठ्या शाळांची नाव, अंतर, उपलब्ध असलेली वाहतूक व्यवस्था आणि अंदाजे लागणारा वार्षिक खर्च आदी माहिती मागविली आहे. मात्र, शासनाच्या या धोरणाला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. आता जि.प. पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनीही या निर्णयाला विरोध केला. शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार २० पटसंख्येच्या शाळांपैकी आदिवासीबहुल आणि पर्यायी व्यवस्था नसलेल्या शाळा शासनाने बंद करून नयेत, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गरज असलेल्या शाळा बंद करून नयेत, यासाठी येत्या सर्वसाधारण सभेत विरोधाचा ठराव मांडला जाणार आहे.ज्या ठिकाणी गरज नाही व बोटावर मोजण्या इतकीच विद्यार्थी संख्या आहे. त्याला आमचा विरोध नाही मात्र दुर्गम भागातील व वीस पेक्षा थोडीफार कमी असलेल्या शाळा सुरू ठेवण्यात याव्यात अशी मागणी आहे.-मोहन सिंगवी, सदस्य, जि.प.जिल्हा परिषद शाळेत गोरगरिबांची मुले ग्रामीण भागात शिक्षण घेतात महागड्या शिक्षणामुळे सामान्य माणसाला शिक्षणाचा खर्च न झेपणारा आहे. त्यामुळे २० पटसंख्येच्या शाळा बंद होऊ नये त्यासाठी सभेत ठराव घेऊ. -सतीश उईके, अध्यक्ष जिल्हा परिषद