शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
5
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
6
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
7
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
8
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
9
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
10
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
11
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
12
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
13
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
14
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
15
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
16
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
17
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
18
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
19
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
20
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल

सुकळीच्या शहानूर नदीवर बांधणार संरक्षण भिंत

By admin | Updated: May 16, 2016 00:12 IST

दर्यापूर तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होऊन १८ घरे दोन वर्षात जमीनदोस्त झालेले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी : नदीचे पात्रही वळविणार दर्यापूर : दर्यापूर तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होऊन १८ घरे दोन वर्षात जमीनदोस्त झालेले आहेत. यांचे गावाच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आले असून शहानूर नदीच्या तीरावर असलेल्या सुकळी वासियांना भूस्खलनाचा धोका असल्याने संरक्षण भिंत बांधण्यात येणार असून नदीचे पात्र गावापासून वळविल्या जाणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी सोमवारी पाहणी करुन आढावा घेतला. वडनेर गंगाई येथील जलयुक्त शिवार योजना अभियानांतर्गत गाव तलावाचे खोलीकरणचा शुभारंभाच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वडनेर गंगाई का आले होते. सुकळीचा भूस्खलनाचा प्रश्न गंभीर असल्याने आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुकळी येथे भेट देण्याची विनंती केली. याठिकाणी आमदार रमेश बुंदिले, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, तहसीलदार राहुल तायडे व सर्व विभागाचे अधिकारी अभियंते उपस्थित होते. सुकळी हे गाव शहानूर नदीच्या तीरावर वसले असून या ठिकाणी २१८ कुटुंब राहतात, गावाची लोकसंख्या ८०० एवढी आहे परंतु शासनाच्या योजनेचा लाभ त्वरित मिळत नसल्याने संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्यास लोकांनी प्रशासनाला नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत टप्प्या-टप्प्याने भूस्खलन झाल्याने १८ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली. यामध्ये काही नागरिक किरकोळ जखमी झाले. मात्र कुठलीही जिवीत हानी झाली नाही. यापूर्वीही जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी सुकळी येथे भेट देऊन पाहणी केली होती. भूवैज्ञानिकांनीही पाहणी करून याचा अहवाल प्रशासनाला सादर केला होता. (प्रतिनिधी)४२ लक्ष रुपयांच्या निधीतून बांधणार संरक्षण भिंत४२ लक्ष रुपयांच्या निधीतून सुकळी या गावात शहानूर नदीच्या तिरावर संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे. या गावाला भूस्खलनाचा नदीच्या तिराचा धोका असल्यामुळे या ठिकाणी प्रशासन संरक्षण भिंत बांधणार आहे व या ठिकाणचा नदीचा प्रवाह दुसऱ्या दिशेला वळविल्या जाणार असल्याचेही विचाराधीन आहे. ‘लोकमत’ने केला होता पाठपुरावा!भूस्खलनाचा पहिला प्रश्न निकाली निघावा यासाठी ‘लोकमत’ने अनेक वेळा वृत्त प्रकाशित करून हा प्रश्न लोकदरबारात मांडला. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे होऊन हा प्रश्न प्रशासन स्तरावर मार्गी लागला आहे. प्रकाश भारसाकळे यांनी दिले निर्देशसुकळी येथील भूस्खलनामुळे गावाला धोका असल्यामुळे संरक्षण भिंत बांधण्याची प्रक्रिया त्वरित करावी, असे निर्देश आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनीही याची दखल घेऊन हे काम लवकर सुरू करावे, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.