शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
5
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
6
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
7
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
8
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
9
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
10
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
11
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
12
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
13
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
14
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
15
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
16
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
17
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
18
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
19
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
20
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी

सुकळीच्या शहानूर नदीवर बांधणार संरक्षण भिंत

By admin | Updated: May 16, 2016 00:12 IST

दर्यापूर तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होऊन १८ घरे दोन वर्षात जमीनदोस्त झालेले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी : नदीचे पात्रही वळविणार दर्यापूर : दर्यापूर तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होऊन १८ घरे दोन वर्षात जमीनदोस्त झालेले आहेत. यांचे गावाच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आले असून शहानूर नदीच्या तीरावर असलेल्या सुकळी वासियांना भूस्खलनाचा धोका असल्याने संरक्षण भिंत बांधण्यात येणार असून नदीचे पात्र गावापासून वळविल्या जाणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी सोमवारी पाहणी करुन आढावा घेतला. वडनेर गंगाई येथील जलयुक्त शिवार योजना अभियानांतर्गत गाव तलावाचे खोलीकरणचा शुभारंभाच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वडनेर गंगाई का आले होते. सुकळीचा भूस्खलनाचा प्रश्न गंभीर असल्याने आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुकळी येथे भेट देण्याची विनंती केली. याठिकाणी आमदार रमेश बुंदिले, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, तहसीलदार राहुल तायडे व सर्व विभागाचे अधिकारी अभियंते उपस्थित होते. सुकळी हे गाव शहानूर नदीच्या तीरावर वसले असून या ठिकाणी २१८ कुटुंब राहतात, गावाची लोकसंख्या ८०० एवढी आहे परंतु शासनाच्या योजनेचा लाभ त्वरित मिळत नसल्याने संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्यास लोकांनी प्रशासनाला नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत टप्प्या-टप्प्याने भूस्खलन झाल्याने १८ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली. यामध्ये काही नागरिक किरकोळ जखमी झाले. मात्र कुठलीही जिवीत हानी झाली नाही. यापूर्वीही जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी सुकळी येथे भेट देऊन पाहणी केली होती. भूवैज्ञानिकांनीही पाहणी करून याचा अहवाल प्रशासनाला सादर केला होता. (प्रतिनिधी)४२ लक्ष रुपयांच्या निधीतून बांधणार संरक्षण भिंत४२ लक्ष रुपयांच्या निधीतून सुकळी या गावात शहानूर नदीच्या तिरावर संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे. या गावाला भूस्खलनाचा नदीच्या तिराचा धोका असल्यामुळे या ठिकाणी प्रशासन संरक्षण भिंत बांधणार आहे व या ठिकाणचा नदीचा प्रवाह दुसऱ्या दिशेला वळविल्या जाणार असल्याचेही विचाराधीन आहे. ‘लोकमत’ने केला होता पाठपुरावा!भूस्खलनाचा पहिला प्रश्न निकाली निघावा यासाठी ‘लोकमत’ने अनेक वेळा वृत्त प्रकाशित करून हा प्रश्न लोकदरबारात मांडला. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे होऊन हा प्रश्न प्रशासन स्तरावर मार्गी लागला आहे. प्रकाश भारसाकळे यांनी दिले निर्देशसुकळी येथील भूस्खलनामुळे गावाला धोका असल्यामुळे संरक्षण भिंत बांधण्याची प्रक्रिया त्वरित करावी, असे निर्देश आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनीही याची दखल घेऊन हे काम लवकर सुरू करावे, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.