शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

सुकळीच्या शहानूर नदीवर बांधणार संरक्षण भिंत

By admin | Updated: May 16, 2016 00:12 IST

दर्यापूर तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होऊन १८ घरे दोन वर्षात जमीनदोस्त झालेले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी : नदीचे पात्रही वळविणार दर्यापूर : दर्यापूर तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होऊन १८ घरे दोन वर्षात जमीनदोस्त झालेले आहेत. यांचे गावाच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आले असून शहानूर नदीच्या तीरावर असलेल्या सुकळी वासियांना भूस्खलनाचा धोका असल्याने संरक्षण भिंत बांधण्यात येणार असून नदीचे पात्र गावापासून वळविल्या जाणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी सोमवारी पाहणी करुन आढावा घेतला. वडनेर गंगाई येथील जलयुक्त शिवार योजना अभियानांतर्गत गाव तलावाचे खोलीकरणचा शुभारंभाच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वडनेर गंगाई का आले होते. सुकळीचा भूस्खलनाचा प्रश्न गंभीर असल्याने आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुकळी येथे भेट देण्याची विनंती केली. याठिकाणी आमदार रमेश बुंदिले, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, तहसीलदार राहुल तायडे व सर्व विभागाचे अधिकारी अभियंते उपस्थित होते. सुकळी हे गाव शहानूर नदीच्या तीरावर वसले असून या ठिकाणी २१८ कुटुंब राहतात, गावाची लोकसंख्या ८०० एवढी आहे परंतु शासनाच्या योजनेचा लाभ त्वरित मिळत नसल्याने संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्यास लोकांनी प्रशासनाला नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत टप्प्या-टप्प्याने भूस्खलन झाल्याने १८ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली. यामध्ये काही नागरिक किरकोळ जखमी झाले. मात्र कुठलीही जिवीत हानी झाली नाही. यापूर्वीही जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी सुकळी येथे भेट देऊन पाहणी केली होती. भूवैज्ञानिकांनीही पाहणी करून याचा अहवाल प्रशासनाला सादर केला होता. (प्रतिनिधी)४२ लक्ष रुपयांच्या निधीतून बांधणार संरक्षण भिंत४२ लक्ष रुपयांच्या निधीतून सुकळी या गावात शहानूर नदीच्या तिरावर संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे. या गावाला भूस्खलनाचा नदीच्या तिराचा धोका असल्यामुळे या ठिकाणी प्रशासन संरक्षण भिंत बांधणार आहे व या ठिकाणचा नदीचा प्रवाह दुसऱ्या दिशेला वळविल्या जाणार असल्याचेही विचाराधीन आहे. ‘लोकमत’ने केला होता पाठपुरावा!भूस्खलनाचा पहिला प्रश्न निकाली निघावा यासाठी ‘लोकमत’ने अनेक वेळा वृत्त प्रकाशित करून हा प्रश्न लोकदरबारात मांडला. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे होऊन हा प्रश्न प्रशासन स्तरावर मार्गी लागला आहे. प्रकाश भारसाकळे यांनी दिले निर्देशसुकळी येथील भूस्खलनामुळे गावाला धोका असल्यामुळे संरक्षण भिंत बांधण्याची प्रक्रिया त्वरित करावी, असे निर्देश आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनीही याची दखल घेऊन हे काम लवकर सुरू करावे, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.