शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

पूरग्रस्त भागात हवी संरक्षण भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 00:14 IST

दरवर्षी येणाऱ्या पुराने तीन तालुक्यांतील हजारो कुटुंब बेघर होतात़ या भागात पूर सरंक्षण भिंत,...

वीरेंद्र जगताप : पुरवणी विनियोजन विधेयकात मांडले २७ मुद्दे अमरावती : दरवर्षी येणाऱ्या पुराने तीन तालुक्यांतील हजारो कुटुंब बेघर होतात़ या भागात पूर सरंक्षण भिंत, जळगाव आर्वी येथील पूरग्रस्त कुटूंबाना कायमचे जमीन पट्टे देण्यासोबतच पुरवणी विनियोजन विधेयकात २७ मुद्दे आ़वीरेंद्र जगताप यांनी मांडले आहेत़ दरम्यान या पावसाळी विधीमंडळ अधिवेशनात धामणगाव मतदार संघातील विवीध समस्यांच्या ४७ लक्षवेधी सूचना राजपटलासमोर मांडल्या आहेत़धामणगाव विधानसभा मतदार संघाचे तिसऱ्यांदा आ़वीरेंद्र जगताप नेतृत्व करीत असतांना आजपर्यंत कोट्यवधी रूपयांची विकासकामे करून त्यांनी या मतदार संघाचा चेहरा -मोहरा बदलविला आहे़ सध्या राज्यात भाजपाचे शासन असलेतरी या अधिवेशनात धामणगाव, चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर तिन्ही तालुक्यातील सर्वांगीन समस्या पुरवणी विनीयोजन विधेयकाद्वारे मांडल्या आहेत़ (प्रतिनिधी) पूरग्रस्तांना मिळावा आधारमागील अनेक वर्षांपासून तीनही तालुक्यांतील नदी, नाल्या काठावरील कुटुंबांना येणाऱ्या पुराचा मोठा फटका बसतो. रात्रीला आलेल्या पुरामुळे घरातील अन्नधान्य व कपडे ओले होतात. अनेकांना बेघर व्हावे लागते. त्यामुळे नदी व नाल्याकाठावर सरंक्षण भिंत बाधण्याकरीता निधी द्यावा तसेच जळगाव आर्वी येथील सन १९९४ च्या महापूरामुळे पुनर्वसित झालेले जळगाव आर्वी येथील या कुटुंबांना कायमस्वरूपी मालकीची पट्टे देण्याची मागणी आ़वीरेंद्र जगताप यांनी केली आहे़पोलीस ठाण्यांच्या इमारती जीर्णचांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, दत्तापूर, येथील पोलीस ठाण्याच्या इमारती शिकस्त झाल्या आहे़ तर नव्याने निर्माण झालेल्या मंगरूळ चव्हाळा येथील पोलीस ठाण्याला इमारत नाही, चांदूररेल्वे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाची इमारत जीर्ण झाल्या आहेत़ त्याकरिता शासनाने अधिक निधी द्यावा, असे पुरवणी विनियोजन विधेयकाच्या समाविष्ट मुद्यांकरिता आ़वीरेंद्र जगताप यांनी विधिमंडळाला पत्र दिले आहे़हुतात्मा स्मारकांना हवा निधीधामणगाव मतदारसंघातील चांदूररेल्वे व सातेफळ हुतात्मा स्मारक आहे़ या स्मारकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे़ चांदूररेल्वे येथील स्मारकाकरिता एक कोटी कोटी २५ लाख तर सातेफळ येथील स्मारकाच्या दुरूस्तीसाठी पंन्नास लक्ष रूपयांची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे़दत्तक गावांना द्यावा विकासासाठी निधी लोकप्रतिनीधी गाव दत्तक योजनेअंतर्गत काळमजापूर, उसळगव्हाण, मोखड ही आदर्श गावे निर्माण करण्यासाठी दत्तक घेतले आहे़ परंतु शासनाने या गावांसाठी अद्यापावेतो निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे या गावांचा सर्वांगीण विकास खुंटला आहे. तातडीने विकास व्हावा याकरिता निधीची मागणी आ. जगताप यांनी केली आहे़पुरवणी विनियोजन विधेयकात २७ मुद्यांसह बगाजी व कृष्णाजी सागर च्या विकासासाठी निधीची मागणी केली आहे़मतदार संघाच्या विकासाकरिता निधी न मिळाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही़- वीरेंद्र जगताप,आमदार, धामणगाव रेल्वे