शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाने मागविले तीन प्रकल्पांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:03 IST

पंढरी, वासनी व बोर्डी नाला हे मध्यम प्रकल्प अंदाजे १७०० कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देकामे खोळंबली : पर्यावरणाच्या मान्यतेअभावी रखडले प्रकल्प

संदीप मानकर ।लोकमत आॅनलाईनअमरावती : पंढरी, वासनी व बोर्डी नाला हे मध्यम प्रकल्प अंदाजे १७०० कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात करण्यात येत आहेत. सदर प्रकल्प पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी रखडले असून, यासंदर्भात राज्य शासनाकडून केंद्राने त्वरित प्रस्ताव मागविला आहे. पुढील महिन्यात हा मुद्या निकाली निघेल, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.तीनही प्रकल्पांचे कामे शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर १६ हजार ८१३ हेक्टर सिंचननिर्मिती होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला संरक्षित सिंचन मिळणार असून, या भागातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. पंढरी, बोर्डी नाला, वासनी या तीनही मध्यम प्रकल्पासाठी २००६ च्या कायद्यानुसार सदर मध्यम प्रकल्पांना पर्यावरण विभागाची मान्यता घेणे बंधनकारक असताना जलसंपदा विभागाने ती मान्यता घेतली नाही. त्याकारणाने कायदेभंग झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात पुन्हा शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. १४ मार्च २०१७ रोजी शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार त्या प्रकल्पांना केंद्र शासन मान्यता देईल, असे जाहीर करण्यात आलेले होते. या अधिसूचनेच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयाने स्टे दिला होता यानंतर हा स्टे उठविण्यात आला. हे तीन प्रकल्प राज्य शासनाचे असल्यामुळे व पाटबंधारे, जलसंपदा विभागाचे प्रकल्प असल्याने याची पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचत नाही. उलट यामुळे प्रर्यावरणाला फायदाच होतो यामुळे या प्रकल्पांना मान्यता मिळणे गरजेचे आहे. या तीनही प्रकल्पांचे ६० ते ७० टक्के ही कामे पूर्ण झाली आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात सिंचन निर्मिती होणार आहे.या प्रकल्पाला द्यावी मान्यताजिल्ह्यासाठी सदर तीनही मध्यम प्रकल्प हे महत्त्वाचे असल्याने केंद्राने या प्रकल्पाला त्वरित मान्याता द्यावी, अशी मागणी होत आहे. कारण जर काही महिने मान्यात मिळाली नाही, तर प्रकल्पाची किमतीसुद्धा वाढतात. ज्या शेतकºयांच्या जमिनी या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेले आहे, त्यांना व परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही, हे विशेष!अशी होणार सिंचन निर्मितीपंढरी प्रकल्पातून ८ हजार ३७० हेक्टर सिंचननिर्मिती होणार आहे, तर वासनी प्रकल्पातून ४ हजार ३१७ हेक्टर व बोर्डी नाला प्रकल्पातून ४ हजार १२६ हेक्टर सिंचन होणार आहे. असे एकूण १६ हजार ८१३ हेक्टर सिंचननिर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे.राज्य शासनाकडून केंद्राने सदर प्रस्ताव मागविला आहे. पर्यावरण विभागाची मान्यता त्वरित मिळाल्यास यामुळे हजारो हेक्टर सिंचननिर्मिती होऊन या भागातील शेतकºयांना त्याचा फायदा होणार आहे.- रमेश ढवळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग