शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

केंद्र शासनाने मागविले तीन प्रकल्पांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:03 IST

पंढरी, वासनी व बोर्डी नाला हे मध्यम प्रकल्प अंदाजे १७०० कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देकामे खोळंबली : पर्यावरणाच्या मान्यतेअभावी रखडले प्रकल्प

संदीप मानकर ।लोकमत आॅनलाईनअमरावती : पंढरी, वासनी व बोर्डी नाला हे मध्यम प्रकल्प अंदाजे १७०० कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात करण्यात येत आहेत. सदर प्रकल्प पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी रखडले असून, यासंदर्भात राज्य शासनाकडून केंद्राने त्वरित प्रस्ताव मागविला आहे. पुढील महिन्यात हा मुद्या निकाली निघेल, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.तीनही प्रकल्पांचे कामे शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर १६ हजार ८१३ हेक्टर सिंचननिर्मिती होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला संरक्षित सिंचन मिळणार असून, या भागातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. पंढरी, बोर्डी नाला, वासनी या तीनही मध्यम प्रकल्पासाठी २००६ च्या कायद्यानुसार सदर मध्यम प्रकल्पांना पर्यावरण विभागाची मान्यता घेणे बंधनकारक असताना जलसंपदा विभागाने ती मान्यता घेतली नाही. त्याकारणाने कायदेभंग झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात पुन्हा शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. १४ मार्च २०१७ रोजी शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार त्या प्रकल्पांना केंद्र शासन मान्यता देईल, असे जाहीर करण्यात आलेले होते. या अधिसूचनेच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयाने स्टे दिला होता यानंतर हा स्टे उठविण्यात आला. हे तीन प्रकल्प राज्य शासनाचे असल्यामुळे व पाटबंधारे, जलसंपदा विभागाचे प्रकल्प असल्याने याची पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचत नाही. उलट यामुळे प्रर्यावरणाला फायदाच होतो यामुळे या प्रकल्पांना मान्यता मिळणे गरजेचे आहे. या तीनही प्रकल्पांचे ६० ते ७० टक्के ही कामे पूर्ण झाली आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात सिंचन निर्मिती होणार आहे.या प्रकल्पाला द्यावी मान्यताजिल्ह्यासाठी सदर तीनही मध्यम प्रकल्प हे महत्त्वाचे असल्याने केंद्राने या प्रकल्पाला त्वरित मान्याता द्यावी, अशी मागणी होत आहे. कारण जर काही महिने मान्यात मिळाली नाही, तर प्रकल्पाची किमतीसुद्धा वाढतात. ज्या शेतकºयांच्या जमिनी या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेले आहे, त्यांना व परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही, हे विशेष!अशी होणार सिंचन निर्मितीपंढरी प्रकल्पातून ८ हजार ३७० हेक्टर सिंचननिर्मिती होणार आहे, तर वासनी प्रकल्पातून ४ हजार ३१७ हेक्टर व बोर्डी नाला प्रकल्पातून ४ हजार १२६ हेक्टर सिंचन होणार आहे. असे एकूण १६ हजार ८१३ हेक्टर सिंचननिर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे.राज्य शासनाकडून केंद्राने सदर प्रस्ताव मागविला आहे. पर्यावरण विभागाची मान्यता त्वरित मिळाल्यास यामुळे हजारो हेक्टर सिंचननिर्मिती होऊन या भागातील शेतकºयांना त्याचा फायदा होणार आहे.- रमेश ढवळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग