शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

नुकसानभरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:15 IST

अमरावती : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना मदत मिळण्यासाठी शासनाकडे तत्काळ त्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर ...

अमरावती : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना मदत मिळण्यासाठी शासनाकडे तत्काळ त्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिले. तिवसा तालुक्यातील शिवणगावकडे येणाऱ्या सूर्यगंगा नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी त्यांनी केली.

तिवसा तहसीलदार वैभव फरतारे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, गटविकास अधिकारी चेतन जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तिवसा मंडळ कृषी अधिकारी अरुण गजभिये, मार्डी मंडळ कृषी अधिकारी विलास केचे आदी उपस्थित होते.

शिवणगाव येथील पावसाने पडझड झालेल्या घरांची पाहणी त्यांनी यावेळी केली. तेथील २१८ पंचनामे झाले असून, ९०४ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याचे वैभव फरतारे यांनी सांगितले. सूर्यगंगा नदीवरील पुलामुळे अतिवृष्टीत अनेकदा गावाशी संपर्क तुटतो. या पुलाची उंची वाढविण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे तत्काळ सादर करण्याचे निर्देश ना. यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहीद गणेश नेमाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या स्मारक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

------------------

भिवापूरच्या पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करावे

भिवापूर येथे पावसामुळे नाल्याकाठची जमीन खरडली आहे. यावरील १३० हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती व अंदाजे १५ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती वैभव फरतारे यांनी ना. ठाकूर यांना दिली. एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले.

तिवसा तालुक्यातील भिवापूर येथे मुसळधार पावसामुळे धरणातील अतिरिक्त पाणी भिवापूरकडे जाणाऱ्या पुलावरून वाहते. त्यामुळे खचलेल्या या पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ना. ठाकूर यांनी दिले. यासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे, असे कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य यांना सांगितले.

पावसामुळे रस्ते व वाहतूक बंद होऊ नये, तसेच गावाचा संपर्क तुटू नये, यासाठी कुऱ्हा ते बोर्डा मार्गाचे खोलीकरण योग्य पद्धतीने करावे. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी या मार्गावरील तीन विद्युत खांबावरील रोहित्राची उंची वाढविण्याचे निर्देश महावितरणचे राजेश पाटील यांना देण्यात आले. मौजा चेनुष्टा व बोर्डा येथे अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे झाले. त्याची पाहणी ना. ठाकूर यांनी केली. येथील नुकसानीच्या संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर झालेल्या नुकसानीबाबत तपशीलवार नोंदणी करून तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश ना. ठाकूर यांनी संबंधितांना दिले.