शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

ग्रामपंचायत इमारतीसाठी १६ कोटींचा प्रस्ताव बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:11 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १४ पंचायत समितींमधील काही ग्रामपंचायतींच्या जुन्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे क्षतिग्रस्त व इमारत नसलेल्या ठिकाणी नव्याने इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने मे २०१६ रोजी १६ कोटी ६८ हजार रूपयांचा निधी देण्यात यावा, यासाठी ठराव पारित केला आहे. हा ठराव राज्य शासनाकडे पाठविला ...

ठळक मुद्देजिल्हा परिषद : आमसभेतील ठरावाची अंमलबजावणी केव्हा?

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १४ पंचायत समितींमधील काही ग्रामपंचायतींच्या जुन्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे क्षतिग्रस्त व इमारत नसलेल्या ठिकाणी नव्याने इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने मे २०१६ रोजी १६ कोटी ६८ हजार रूपयांचा निधी देण्यात यावा, यासाठी ठराव पारित केला आहे. हा ठराव राज्य शासनाकडे पाठविला आहे. मात्र, तेव्हापासून यावर दोन वर्ष उलटून गेल्यावरही कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे याला मूर्तस्वरूप केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यातील १४ पंचायत समितींच्या हद्दीतील एकूण ८३९ ग्रामपंचायतीं पैकी ६८ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे अद्यापही या ग्रामपंचायतीींचा कारभार भाड्याच्या घरात सुरू आहे. ग्रामविकासाचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायतींना हक्काच्या इमारती नसल्याने गावाचा विकास कसा होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत मिळावी, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाकडे इमारतीचा प्रस्ताव पाठविला आहे. याशिवाय जिल्हाभरातील ७१ ग्रामपंचायतींच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या इमारती धोकादायक ठरत आहेत. जुन्या इमारतीतून ग्रामपंचायतींचा कारभार ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतींचे शिलेदारांना चालवावा लागत आहे. इमारत क्षतिग्रस्त झाल्या असल्याने जिल्ह्यातील ७१ ग्रामपंचायतींना नव्याने इमारत बांधणे आवश्यक आहे. यासाठी निधीची गरज आहे.राज्य शासना मार्फत जनसुविधा करिता ग्रामपंचायतींना विशेष अनुदान योजनांअंतर्गत ग्रामपंचायत इमारत बांधकाम योजनाही आहे. मात्र यामध्ये जिल्ह्या करिता मिळणारे अनुदान अतिशय कमी आहे.यापोटी दरवर्षी जिल्हा परिषदेला केवळ ३ कोटी सरासरी अनुदान मिळते यामध्ये शिकस्त इमारत दुरूस्ती व इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना नवीन इमारत बांधकाम करणे अशक्य आहे. त्यामळे विशेष बाब म्हणून राज्य शासनाने जादाचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करणारा ठराव सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला आहे. या ठरावास जिल्हा परिषद सभागृहाने एकमताने मंजूरी देऊन सुमारे १६ कोटी ६८ हजार रूपयाचा हा प्रस्ताव राज्य शासनाकडे जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. परंतु त्यानंतरही यावर काहीच निर्णय अद्यापपर्यंत झाली नसल्याची माहिती आहे.ग्रामस्तरावर महत्त्वाची संस्था असलेल्या ग्रामपंचायतींना हक्काची इमारत असावी आणि क्षतिग्रस्त इमारती नव्याने बांधण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, त्यावर काहीच निर्णय न झाल्याने शासनाने यासाठी विशेष निधी द्यावा, १४ व्या वित्त आयोगातून ही कामे करणे शक्य नाही.- नितीन गोंडाणे, अध्यक्ष, जिल्हा परिषद