शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे

By admin | Updated: July 4, 2016 00:07 IST

देशातील ९८ शहरांची स्मार्ट सिटीसाठी मागील वर्षी निवड झाली, त्यामध्ये अमरावतीचा सहभाग आहे. केंद्र शासन ....

२,२६८ कोटींचा प्रस्ताव : विविध बाबींचा समावेशअमरावती : देशातील ९८ शहरांची स्मार्ट सिटीसाठी मागील वर्षी निवड झाली, त्यामध्ये अमरावतीचा सहभाग आहे. केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील संभाव्य प्रवेशासाठी अमरावती महानगरपालिकेने फेर प्रस्ताव बनविला. हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.सदर प्रस्तावात पहिल्या फेरीत ग्रीणफिल्डमध्ये छत्रीतलावजवळ अंदाजे ३५० एकर जागा घेण्यात आली होती. दुसऱ्या फेरीमध्ये केंद्र शासनाकडून आयोजित कार्यशाळेत स्मार्ट सिटी प्रकल्पात सुधारणा सुचविण्यात आल्या. त्यानुसार रेट्रोफिटिंगमध्ये यशोदानगर ते दस्तुरनगरची अंदाजे ७०० एकर जागा झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत २५ एकर जागा तसेच पॅन सिटी इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आलेला होता. त्यानंतर शासनाच्या तज्ज्ञ समितीसोबत झालेल्या कार्यशाळेत चर्चेच्या अनुषंगाने शहराच्या जुना विकास व नवीन विकास याबद्दल चर्चा करण्यात आली. चर्चादरम्यान रेट्रोफिटिंगच्या अंतर्गत मॉडेल टाऊनचा विकास करणे अपेक्षित होते. त्या अनुषंगाने प्रस्तावात फेरबदल सुचविण्यात आले. त्या प्रमाणे शहरातील मागच्या २० वर्षामध्ये विकसित झालेला ३३६ एकर जागा यशोदानगर ते दस्तुरनगर व शहरातील ५० वर्षांमध्ये विकसित झालेला ३१९ एकर जागा रेल्वे लाईन ते शिवटेकडी (मालटेकडी) मधील व अमरावती बसस्थानक रोड ते दक्षिणेकडील अंबा नाला यामधील परिसर समाविष्ट करण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावर शहराचा स्मार्ट सिटी विकास मॉडेल बनवताना जुन्या शहराचा स्मार्ट सिटी मॉडेल व नव्याने विकसित झालेल्या क्षेत्राचा स्मार्ट सिटी मॉडेल अशा प्रकारच्या दोन संकल्पना सादर करण्यात आल्या. झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत २५ एकर जागा तशी ठेवण्यात आली. या प्रकल्पात पॅन सिटी अंतर्गत संपूर्ण शहराचा विकास स्मार्ट सोल्युशन व नवीन तंत्रज्ञान यांचा वापर करून होणे अपेक्षित आहे. पॅन सिटी अंतर्गत २४ तास पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा, ट्रान्सपोर्ट व मोबिलिटी, सिसिटिव्ही सुपरव्हिजन, कमांड अ‍ॅन्ड कन्ट्रोल सेंटर अशा अनेक अत्याधुनिक सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवून अमरावती शहराचा विकास करण्यात येणार आहे. सदर प्रस्तावाचे सादरीकरण ३० जून रोजी विशेष उच्चाधिकार समिती, मंत्रालय, मुंबई यांच्यासमोर करण्यात आले व सदर समितीने मान्यता दिल्यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे ३० जून रोजी सादर करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)