शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव बारगळला

By admin | Updated: May 25, 2015 00:01 IST

बडनेरा, अमरावती आणि नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे ....

खासदारांच्या पत्राला उत्तर नाही : सुरक्षा आयुक्तांची टोलवाटोलवीअमरावती : बडनेरा, अमरावती आणि नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव बारगळला आहे. मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या आयुक्तांनी यासंदर्भात प्रस्ताव पाठविला नसल्याने खासदारांना निधी उपलब्ध करुन देता आला नाही. त्यामुळे तीनही रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविता आले नाही, अशी माहिती आहे.खा. आनंदराव अडसूळ यांनी अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर साडेअकरा लाख रुपयांची स्टेनलेस स्टिलची आसन व्यवस्था करुन देताना सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सुविधा पुरविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अनेक महिने लोटल्यानंतरही सीसीटीव्ही कॅमेरे रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या स्थळी लावण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. विशेषत: रेल्वे सुरक्षा बलाच्या आयुक्तांना खासदार अडसूळ यांनी पत्र पाठवून देखील सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने मागणी करु नये, हे कळू शकले नाही. बडनेरा, अमरावती व नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर वाढत्या चोऱ्या, तिकिटांचा काळाबाजार, स्वच्छतेचा बोजवारा, रेल्वे संपत्तीची चोरी, अनधिकृत वेंडर्स, तृतीयपंथीयांचा हैदोस या कॅमेऱ्यात कैैद करुन रेल्वे सुरक्षा बलाला कारवाई करणे सोयीचे जावे, हा सीसीटीव्ही लावण्यामागे खासदारांचा उद्देश होता. परंतु रेल्वे सुरक्षा बलाने अद्यापही प्रस्ताव पाठविला नाही, हे वास्तव आहे. रेल्वे आरक्षण खिडक्यांवर तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी दर्शनी भागात कॅमेरे लावल्यास हा काळाबाजार थांबविता येणे शक्य आहे. एवढेच नव्हे तर प्लॅटफार्मवर अवैध वेंडर्स, खाद्यपदार्थांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नजर ठेवता येणे सोयीचे होईल. असा प्रकार उघडकीस आल्यास त्यावर कारवाई करून घडणारे गुन्ह्याचे प्रमाण कमी होऊ शकते. सर्वच विभागात सुरक्षा यंत्रणा हाताळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जात असताना रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष का बरं चालविले हा संशोधनाचा विषय ठरत आहे.बडनेरा प्लॅटफार्म सफाईचा कंत्राट ७० लाखांचाबडनेरा रेल्वे स्थानकावर सफाईचा कंत्राट वर्षाकाठी ७० लाख रुपयांना सोपविण्यात आला आहे. संबंधित कंत्राटदारांचे कर्मचारी सफाई करीत नसल्याची ओरड असताना त्याची देयके काढली जात असल्याचे बोलले जात आहे. रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही. परिणामी सफाईसंदर्भात अंकुश लावता येत नाही. मात्र सीसीटीव्हीअभावी सुरक्षा यंत्रणेसह नियमबाह्य बाबींवर अंकुश कसे लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.सीसीटीव्ही लावण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यास दिरंगाई करणाऱ्या सुरक्षा आयुक्तांना जाब विचारला जाईल. प्रवाशांच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सुविधा आवश्यक असून त्या लवकरच सुरु होतील.- आनंदराव अडसूळ,खासदार, अमरावती.