शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

राज्यात १०० आंतरराष्ट्रीय शाळानिर्मितीचा प्रस्ताव गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 19:54 IST

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ रद्द : दोन अभ्यास मंडळे, दोन शिक्षण मंडळे नको

अमरावती : राज्यात १०० आंतरराष्ट्रीय शाळांच्या निर्मितीचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला आहे. राज्यात दोन अभ्यास मंडळे किंवा शिक्षण मंडळे नको, असा प्रस्ताव पुढे करून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. 

शासनाने १४ डिसेंबर २०१७ रोजीच्या निर्णयानुसार, राज्यात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी पहिल्या टप्प्यात १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांच्या निर्मितीचा निर्णय घेतला होता. त्याकरिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशिवाय आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापनेचा निर्णयसुद्धा झाला. तथापि, एकाच राज्यात दोन अभ्यास मंडळे, दोन शिक्षण मंडळे नको, असा प्रस्ताव मान्य करून आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ रद्द करण्याचा ंिनर्णय ३० मार्च रोजी झाला आहे. स्वंयअर्थसाहाय्यित तत्त्वावर आंतरराष्ट्रीय शाळांची निर्मिती होणार होती. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा निर्णय झाला आहे.

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करताना मोठ्या प्रमाणात सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण घेणार होता. मात्र, आता राज्य शिक्षण मंडळाला बळकट करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळात प्रतिनियुक्तीवरील अधिकारी, कर्मचारी यांना मूळ आस्थापनेवर पाठविण्यात येत असल्याचे अवर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी ३० मार्च २०२० रोजी आदेशान्वये स्पष्ट केले आहे.