शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

देशातील दिव्यांगांच्या १८ वर्षांवरील पुनर्वसन कायद्यासाठी अमरावतीतून प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:16 IST

लोकमत विशेष नरेंद्र जावरे अमरावती : देशात दरवर्षी १८ वर्षांवरील साठ हजारांपेक्षा अधिक बेवारस दिव्यांग मुले सुधारगृहातून जातात कोठे, ...

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे

अमरावती : देशात दरवर्षी १८ वर्षांवरील साठ हजारांपेक्षा अधिक बेवारस दिव्यांग मुले सुधारगृहातून जातात कोठे, याचा पत्ता नाही. त्यांच्या पुनर्वसनाचा कायदा झाला पाहिजे. यासाठी मागील २९ वर्षांपासून सव्वाशे दिव्यांग मुलांचा सांभाळ करणारे अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांची ही लढाई सुरू आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी यासंदर्भात सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्ही.सी.द्वारे बैठक घेतली. दिव्यांगांसाठी पुनर्वसन कायदा झाल्यास देशभरातील दिव्यांग बेवारस मुलांसाठी वझ्झर मॉडेल जीवनदायी ठरणार आहे. आता त्याचा प्रस्ताव अमरावती जिल्ह्यातून सादर केला जाणार आहे.

अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी गत महिन्यात वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य गतिमंद बालसुधारगृहाला भेट दिली. त्यावेळी शंकरबाबांनी १८ वर्षांवरील दिव्यांग मुलांच्या पुनर्वसन कायद्यासंदर्भात कौर यांच्याशी चर्चा केली. त्यावरून सोमवारी व्हीसीद्वारे बैठक झाली. त्यामध्ये

पुणे येथील आयुक्त (अपंग) ओमप्रकाश देशमुख, जिल्हाधिकारी पवनीत कौर, शंकरबाबा पापळकर यांनी चर्चा केली, तर अचलपूरचे एसडीओ संदीपकुमार अपार, समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधव व अधिकारी उपस्थित होते.

अंध, अपंग, दिव्यांग, गतिमंद मूल जन्माला आले की, उकिरड्यावर, बसस्थानक, मंदिरात बेवारस टाकून निघून जातात. त्या चिमुकल्याला त्याचे जीवन सामाजिक संस्था, शासनाच्या बालसुधारगृहात कंठीत करावे लागते; परंतु वयाची १८ वर्षे झाल्यानंतर बालसुधारगृहात असूनसुद्धा त्यांना काढून टाकले जाते. दरवर्षी देशभरातील विविध बालसुधारगृहांत ६० हजारांपेक्षा जास्त मुले बाहेर काढली जातात. ती अखेर जातात तरी कुठे, याचा पत्ता नाही. याच मुलांसाठी १८ वर्षांनंतर पुनर्वसन कायदा करावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांची एकाकी लढाई सुरू आहे.

बॉक्स

पंधरा दिवसांत प्रस्ताव

वझ्झर मॉडेल ठरणार

दिव्यांग पुनर्वसन कायद्यासाठी वझर मॉडेलप्रमाणे हा प्रस्ताव पंधरा दिवसांत राज्य शासनाकडे सादर करून केंद्र शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे अपंग आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी या बैठकीत सांगितले. शंकरबाबा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की केंद्र शासनाने कायदा केल्यास देशभरातील दिव्यांगांसाठी वझ्झर मॉडेल जीवनदायी ठरणार आहे.

बॉक्स

देशात साठ हजारांवर मुले बाहेर पडतात

बालसुधारगृहातून देशभरातून वर्षभरात ६० हजारांहून अधिक मुले-मुली १८ वर्षे वय झाल्याने बाहेर पडतात. त्यांचा कुठेच पत्ता नाही. नियमाने त्यांना सुधारगृहात ठेवता येत नाही. कारण तसा कायदा नाही. ठेवले तर त्याच्यावर होणारा शासनाचा खर्च येत नाही, असे शंकरबाबा पापळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बॉक्स

कुठे जातात नोंदच नाही

शंकरबाबा पापळकर यांनी देशभरातील बंगलोर, हैदराबाद, चेन्नई, बिहार, अमृतसर, भोपाळ, मध्यप्रदेश, दिल्ली, तेलंगणा, रायपूर, छत्तीसगढ येथे जाऊन तेथील रिमांड होमचा अभ्यास केला. अठरा वर्षांनंतर मुले कुठे गेली याची शासकीय नोंद नसल्याचे व त्यावर कुणीही उत्तर द्यायलाच आढळून आले नसल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.

कोट

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी जिल्हाधिकारी, अपंग आयुक्त यांच्याशी चर्चा झाली. पंधरा दिवसांत शासनाला प्रस्ताव सादर करून तो केंद्र शासनाकडे कायद्यासाठी पाठविला जाणार आहे. वझ्झर मॉडेलप्रमाणे देशभरातील इतर अपंग मुलांना न्याय मिळावा यासाठी आपली ही २६ वर्षांपासूनची लढाई सुरू आहे. त्यावर पहिल्यांदा चर्चा झाली. आपण खूप आनंदी आहोत.

शंकरबाबा पापळकर,

ज्येष्ठ समाजसेवक

वझ्झर अचलपूर

कोट

पवनीत कौर

जिल्हाधिकारी

अमरावती