शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

टंचाईग्रस्त गावांसाठी ५६ पूरक नळ योजनांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यात उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ...

अमरावती : जिल्ह्यात उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील वाड्यांसाठी ५६ तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा राबविण्यात येणार आहे. यावर २ कोटी ६३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. कितीही पाऊस पडला तरी जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ बसते. दरवर्षी मेळघाटसह गैरआदिवासी भागातील काही टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो तसेच विंधन विहिरी, नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येतात. गतवर्षी एका बाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाच दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणीटंचाईला लोकांना सामोरे जावे लागले होते. टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, दुर्गम भागातील अनेक वाड्या-वस्त्यांपर्यंत पाण्याचे टँकर पोहचविण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे लोकांची पाण्यासाठी कसरत सुरू होती.

दरम्यान, दरवर्षी टंचाईवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. शेकडो पाणीपुरवठ्याच्या योजना दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र, यावर पुढील वर्षी खर्चाचा आकडा वाढताच असतो. दरम्यान यंदाच्या टंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यात गावांमध्ये तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहेत. टंचाईच्या कालावधीत या योजना राबविण्यात येणार आहेत. टंचाईग्रस्त नवीन पूरक नळ योजनांमुळे पाणी समस्या सोडविण्यासाठी दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बॉक्स

भटकंती थांबावी

जिल्ह्यातील दुर्गम भागात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्रपणे जाणवत असता, यात मेळघाटातील काही गावातील पाण्याचे जलस्रोत आटू लागले की, महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. उन्हाळ्यात त्या काळात पाणीटंचाईचा दाह कमी होण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पूरक नळ पाणीपुरवठा योजना हाती घेतल्या जातात.