शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

टंचाईग्रस्त गावांसाठी ५६ पूरक नळ योजनांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यात उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ...

अमरावती : जिल्ह्यात उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील वाड्यांसाठी ५६ तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा राबविण्यात येणार आहे. यावर २ कोटी ६३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. कितीही पाऊस पडला तरी जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ बसते. दरवर्षी मेळघाटसह गैरआदिवासी भागातील काही टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो तसेच विंधन विहिरी, नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येतात. गतवर्षी एका बाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाच दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणीटंचाईला लोकांना सामोरे जावे लागले होते. टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, दुर्गम भागातील अनेक वाड्या-वस्त्यांपर्यंत पाण्याचे टँकर पोहचविण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे लोकांची पाण्यासाठी कसरत सुरू होती.

दरम्यान, दरवर्षी टंचाईवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. शेकडो पाणीपुरवठ्याच्या योजना दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र, यावर पुढील वर्षी खर्चाचा आकडा वाढताच असतो. दरम्यान यंदाच्या टंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यात गावांमध्ये तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहेत. टंचाईच्या कालावधीत या योजना राबविण्यात येणार आहेत. टंचाईग्रस्त नवीन पूरक नळ योजनांमुळे पाणी समस्या सोडविण्यासाठी दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बॉक्स

भटकंती थांबावी

जिल्ह्यातील दुर्गम भागात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्रपणे जाणवत असता, यात मेळघाटातील काही गावातील पाण्याचे जलस्रोत आटू लागले की, महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. उन्हाळ्यात त्या काळात पाणीटंचाईचा दाह कमी होण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पूरक नळ पाणीपुरवठा योजना हाती घेतल्या जातात.