शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

सुतळीला गाठी मारून ‘त्यांनी’ दिला कामाचा पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:00 IST

अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींवर मध्यस्थ दलालच अन्याय करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील बामादेही येथील ग्रामसभेत उघडकीस आला.

ठळक मुद्देमग्रारोहयोतील अपहार : काम करूनही रखडले दाम्पत्याचे वेतन

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींवर मध्यस्थ दलालच अन्याय करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील बामादेही येथील ग्रामसभेत उघडकीस आला. चार महिन्यांपासून मग्रारोहयोच्या कामाचे वेतन अप्राप्त असलेल्या आदिवासीने पती-पत्नीच्या कामाचा पुरावा म्हणून घरातील एका सुतळीला गाठी मारून कामावर हजर असल्याचा पारंपारिक पुरावाच ग्रामसभेत सादर केला. यामुळे उपस्थितांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आणि आदिवासींची व्यथा देखील त्यांच्या मनाला जाऊन भिडली. यानंतर उपस्थित अनेक आदिवासी ग्रामस्थांनी याबाबत संबंधितांकडे तक्रार केली. मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात आजही शिक्षणाचा अभाव आहे. येथील आदिवासी निरक्षर आहेत.ग्रामसभेत कामांच्या दिवसांवर वादचिखलदरा : त्यांना लिहिता-वाचता येत नाही. परिणामी सोयीनुसार सरळसोट व पारंपारिक पद्धतींचाच उपयोग केला जातो. बामदेही ग्रामपंचायतींतर्गत येणाºया बागदरी येथील बिरजू लाभलाल उईके आणि त्याची पत्नी कुंदिया बिरजू उईके यांनी बागदरीसह आसपासच्या परिसरात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सीसीटी पांदण रस्त्याचे काम केले. मागील चार महिन्यांपासून हे दाम्पत्य काम करीत आहे. असे असताना सुद्धा त्यांना वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटूंबावर उपासमारीच वेळ आली आहे. त्यांनी ही व्यथा बामदेही येथील ग्रामसभेत मांडली. यादाम्पत्याने किती दिवस काम केले, यावर चांगलाच वाद झाला. अनेक मजुरांचे वेतन न मिळाल्याने ग्रामसभेत प्रश्नांचा भडीमार करण्यात आला.इतर अनेक मजुरांचे वेतन रखडले, शासनाकडे तक्रारग्रामसभेत बिरजू उईकेने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात तब्बल १६ आठवडे काम केल्याचा पुरावा म्हणून गाठी मारलेली सुतळी सादर केली. बिरजू उईकेची तक्रार रास्त असून त्याच्यासह इतरही मजुरांचे वेतन रखडल्याची तक्रार संबंधितांकडे करण्यात आल्याची माहिती बामदेहीचे उपसरपंच मिश्रीलाल झाडखंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बिरजू उईकेने सादर केलेला सुतळीच्या पुराव्याची परिसरात चर्चा होेती.सरपंचासह गावकºयांनी पुरावा धरला ग्राह्य१६ आठवडे सपत्नीक मग्रारोहयोची कामे केल्याचा पुरावा असल्याचे बिरजू उईके या मजुराने ग्रामसभेपुढे सांगितले. बिरजू उईके यांच्याकडे लेखी पुरावा असल्याचा संशय गावकºयांना होता. मात्र, त्याने त्याच्या बांडीसच्या खिशातून ग्रामसभेपुढे सादर केलेला पुरावा पाहून सगळ्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. लिहिता-वाचता न येणाºया बिरजूने त्याच्या व त्याच्या पत्नीच्या हजेरीची नोंद एका सुतळीला गाठी मारून करून ठेवली होेती. त्याने त्या सुतळीवर एकूण बत्तीस गाठी मारल्या होत्या. सरपंच मुन्नी कास्देकर, उपसरपंच मिश्रीलाल झाडखंडे, ग्रापं सदस्य व गावकºयांनी देखील त्याची ही बाब ग्राह्य धरून त्याच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार संबंधित अधिकाºयांकडे केली आहे. विज्ञान युगातील हा सुतळीचा पुरावा मेळघाटात चर्चेचा विषय ठरला असला तरी निरक्षर बिरजू याने न्यायाची केलेली मागणी रास्तच आहे.