शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

सुतळीला गाठी मारून ‘त्यांनी’ दिला कामाचा पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:00 IST

अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींवर मध्यस्थ दलालच अन्याय करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील बामादेही येथील ग्रामसभेत उघडकीस आला.

ठळक मुद्देमग्रारोहयोतील अपहार : काम करूनही रखडले दाम्पत्याचे वेतन

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींवर मध्यस्थ दलालच अन्याय करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील बामादेही येथील ग्रामसभेत उघडकीस आला. चार महिन्यांपासून मग्रारोहयोच्या कामाचे वेतन अप्राप्त असलेल्या आदिवासीने पती-पत्नीच्या कामाचा पुरावा म्हणून घरातील एका सुतळीला गाठी मारून कामावर हजर असल्याचा पारंपारिक पुरावाच ग्रामसभेत सादर केला. यामुळे उपस्थितांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आणि आदिवासींची व्यथा देखील त्यांच्या मनाला जाऊन भिडली. यानंतर उपस्थित अनेक आदिवासी ग्रामस्थांनी याबाबत संबंधितांकडे तक्रार केली. मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात आजही शिक्षणाचा अभाव आहे. येथील आदिवासी निरक्षर आहेत.ग्रामसभेत कामांच्या दिवसांवर वादचिखलदरा : त्यांना लिहिता-वाचता येत नाही. परिणामी सोयीनुसार सरळसोट व पारंपारिक पद्धतींचाच उपयोग केला जातो. बामदेही ग्रामपंचायतींतर्गत येणाºया बागदरी येथील बिरजू लाभलाल उईके आणि त्याची पत्नी कुंदिया बिरजू उईके यांनी बागदरीसह आसपासच्या परिसरात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सीसीटी पांदण रस्त्याचे काम केले. मागील चार महिन्यांपासून हे दाम्पत्य काम करीत आहे. असे असताना सुद्धा त्यांना वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटूंबावर उपासमारीच वेळ आली आहे. त्यांनी ही व्यथा बामदेही येथील ग्रामसभेत मांडली. यादाम्पत्याने किती दिवस काम केले, यावर चांगलाच वाद झाला. अनेक मजुरांचे वेतन न मिळाल्याने ग्रामसभेत प्रश्नांचा भडीमार करण्यात आला.इतर अनेक मजुरांचे वेतन रखडले, शासनाकडे तक्रारग्रामसभेत बिरजू उईकेने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात तब्बल १६ आठवडे काम केल्याचा पुरावा म्हणून गाठी मारलेली सुतळी सादर केली. बिरजू उईकेची तक्रार रास्त असून त्याच्यासह इतरही मजुरांचे वेतन रखडल्याची तक्रार संबंधितांकडे करण्यात आल्याची माहिती बामदेहीचे उपसरपंच मिश्रीलाल झाडखंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बिरजू उईकेने सादर केलेला सुतळीच्या पुराव्याची परिसरात चर्चा होेती.सरपंचासह गावकºयांनी पुरावा धरला ग्राह्य१६ आठवडे सपत्नीक मग्रारोहयोची कामे केल्याचा पुरावा असल्याचे बिरजू उईके या मजुराने ग्रामसभेपुढे सांगितले. बिरजू उईके यांच्याकडे लेखी पुरावा असल्याचा संशय गावकºयांना होता. मात्र, त्याने त्याच्या बांडीसच्या खिशातून ग्रामसभेपुढे सादर केलेला पुरावा पाहून सगळ्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. लिहिता-वाचता न येणाºया बिरजूने त्याच्या व त्याच्या पत्नीच्या हजेरीची नोंद एका सुतळीला गाठी मारून करून ठेवली होेती. त्याने त्या सुतळीवर एकूण बत्तीस गाठी मारल्या होत्या. सरपंच मुन्नी कास्देकर, उपसरपंच मिश्रीलाल झाडखंडे, ग्रापं सदस्य व गावकºयांनी देखील त्याची ही बाब ग्राह्य धरून त्याच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार संबंधित अधिकाºयांकडे केली आहे. विज्ञान युगातील हा सुतळीचा पुरावा मेळघाटात चर्चेचा विषय ठरला असला तरी निरक्षर बिरजू याने न्यायाची केलेली मागणी रास्तच आहे.