शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दोष सिद्धीचे प्रमाण आठ टक्क्यांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:37 IST

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यातंर्गंत घडलेल्या तीन वर्षांतील विविध गुन्हेविषयक खटल्यांपैकी १ हजार ९५६ प्रकरणांमधील आरोपींचे दोष सिध्द झाले आहे. गेल्या २०१७ या वर्षांच्या तुलनेत यंदा दोष सिध्दीचे प्रमाण ८.५० टक्यांनी वाढ झाल्याची नोंद कोर्ट मॉनिटरींग सेलने नोंदविली आहे.

ठळक मुद्देपोलिसांची यशस्वी वाटचाल : तीन वर्षांत १,९५६ प्रकरणांत आरोपींना शिक्षा

वैभव बाबरेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यातंर्गंत घडलेल्या तीन वर्षांतील विविध गुन्हेविषयक खटल्यांपैकी १ हजार ९५६ प्रकरणांमधील आरोपींचे दोष सिध्द झाले आहे. गेल्या २०१७ या वर्षांच्या तुलनेत यंदा दोष सिध्दीचे प्रमाण ८.५० टक्यांनी वाढ झाल्याची नोंद कोर्ट मॉनिटरींग सेलने नोंदविली आहे.पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दोष सिध्दीचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस आयुक्तासह त्याच्या अधिनस्त यंत्रणा प्रयत्न करतात. गेल्या तीन वर्षांचा लेखाजोखा पाहता शहर पोलिसांच्या प्रयत्नाना यश आल्याने दिसून येत आहे. २०१६ मध्ये कनिष्ठ स्तर न्यायालयात चाललेल्या १ हजार ७६२ प्रकरणांमध्ये सुनावणी झाली. यात ४३८ प्रकरणांमध्ये दोष सिध्द झाले तर, १ हजार ३१४ प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे. ही टक्केवारी २४.८५ आहे. त्या तुलनेत २०१७ मध्ये दोषसिध्दीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. २०१७ मध्ये १ हजार ९६५ प्रकरणांची सुनावणी झाली. त्यात ६३९ प्रकरणांत दोष सिध्द झालेत, तर १ हजार ३२६ प्रकरणात आरोपी निर्दोष झाले. ही टक्केवारी ३२.५१ इतकी आहे. २०१८ मध्ये १ हजार ८३६ प्रकरणांच्या सुनावणीनंतर ८३६ प्रकरणांमध्ये दोष सिध्द झाले, तर २ हजार प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. ही टक्केवारी ४४.१५ आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत २०१८ मधील ही टक्केवारी ८.५० ने वाढल्याचे आढळून आले आहे. ही वाढती टक्केवारी पोलीस विभागाची यशस्वी वाटचाल आहे.उत्कृष्ठ अधिकाऱ्यांमुळे हे यश : पोलीस आयुक्तसीएमसीत उत्कृष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून सर्व ठाणेदारांना सूचना दिल्या. मुख्यमंत्री यांनी कन्व्हेक्शन रेषो वाढविण्यासाठी जे मापदंड व नियम घालून दिले. त्याची तंतोतंत अमलंबजावणी कशी होईल, याला प्राधान्य देण्यात आले. ते सुध्दा दैनदिन कामाव्यक्तीरिक्त. या यशाचे श्रेय कोर्टात काम करणारे पैरवी अधिकारी व ठाण्यातील पोलिसांना जाते. याशिवाय तिन्ही पोलीस उपायुक्तांकडे मॉनिटरींग सेलचे काम सोपविले होते. त्यांनी आपआपल्या ठाण्याच्या पोलिसांना वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रोत्साहन केले. त्यामुळेच हे यश मिळाले, असे पोलीस आयुक्त संजयकुमार बावीस्कर म्हणाले.जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रकरणेजिल्हा व सत्र न्यायालयात (शेषन कोर्ट) चाललेल्या गंभीर गुन्ह्याच्या खटल्यांमध्ये २०१६ साली १२४ प्रकरणे सुनावणीसाठी होते. त्यापैकी १२ प्रकरणांमध्ये दोष सिध्द झाले असून, ११२ दोषमुक्त झाले. ही टक्केवारी ९.६७ आहे. सन २०१७ मधील १५४ प्रकरणामध्ये १९ मध्ये दोष सिध्द तर १३५ प्रकरणांत दोष मुक्त झाले. ही टक्केवारी १२.३३ आहे. सन २०१८ मध्ये १५२ प्रकरणांच्या सुनावणीत १२ दोष सिध्द झाले असून, १४० निर्दोष मुक्त झाले आहे. ही टक्केवारी ९ टक्के आहे.कोर्ट मॉनिटरींग सेलची जबाबदारीपोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गु्न्ह्यांमध्ये दोष सिध्दीचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येते. त्यानुसार पोलीस विविध गुन्ह्यांच्या तपासात ठोस पुरावे गोळा करतात व दोषारोपत्र मजबूत बनविण्याचे प्रयत्न करतात. न्यायालयात खटल्यांवर लक्ष ठेऊन पाठपुरावा करण्यासाठी कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी नियुक्त आहे. समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन आहे. पोलीस आयुक्तालयात कोर्ट मॉनिटरींग सेल न्यायालयातील खटल्यावर लक्ष ठेऊन आहे.