शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:13 IST

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात हवा तसा पाऊस न झाल्याने व धरण परिसरात अपेक्षित पाऊस न पडल्याने ९ जुलैनंतरही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेले आहेत. अनेक प्रकल्पांचा आतपर्यंत पाणीसाठा हा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने चिंता वाढली असून, धरण परिसरात व ज्या नद्यांमुळे धरणाची पातळी वाढते, त्या ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.

ठळक मुद्देधरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात हवा तसा पाऊस न झाल्याने व धरण परिसरात अपेक्षित पाऊस न पडल्याने ९ जुलैनंतरही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेले आहेत. अनेक प्रकल्पांचा आतपर्यंत पाणीसाठा हा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने चिंता वाढली असून, धरण परिसरात व ज्या नद्यांमुळे धरणाची पातळी वाढते, त्या ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.मध्यम प्रकल्पांमध्ये आतापर्यंत शहानूर मध्यम प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ३१.३९ टक्के दलघमी उपयुक्त पाणीसाठा हा धरणात शिल्लक आहे, तर चंद्रभागा मध्यम प्रकल्पात ३२.७३ टक्के, पूर्णा प्रकल्पात ३१.३२ टक्के, सपन प्रकल्पात ३१.९४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अमरावती शहराची तहान भागविणारा ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात सद्यस्थितीत ३५ .८५ उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे शंभर टक्के धरण भरण्याची प्रशासनाला व नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे. हीच परिस्थिती विभागातील अनेक जिल्ह्यातील प्रकल्पाची आहे. विदर्भ पाटबंधारे विभागाच्या अधिकृत विवरण पत्रात ६ जुलैपर्यंतची सदर माहिती असून, अप्पर वर्धा धरण परिसरात १ जूनपासून आतापर्यंत २४१.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १२४.० मिमी पाऊस झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत चांगल्या पावसाची नोंद झाली असली तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.९ जुलैपर्यंत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी थोडा चांगला पाऊस पडला. पण, धरण परिसरात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. काही दिवसांत जलसाठ्याची पातळी वाढण्याचा विश्वास आहे.- रमेश ढवळेअधीक्षक अभियंता.