शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:13 IST

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात हवा तसा पाऊस न झाल्याने व धरण परिसरात अपेक्षित पाऊस न पडल्याने ९ जुलैनंतरही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेले आहेत. अनेक प्रकल्पांचा आतपर्यंत पाणीसाठा हा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने चिंता वाढली असून, धरण परिसरात व ज्या नद्यांमुळे धरणाची पातळी वाढते, त्या ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.

ठळक मुद्देधरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात हवा तसा पाऊस न झाल्याने व धरण परिसरात अपेक्षित पाऊस न पडल्याने ९ जुलैनंतरही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेले आहेत. अनेक प्रकल्पांचा आतपर्यंत पाणीसाठा हा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने चिंता वाढली असून, धरण परिसरात व ज्या नद्यांमुळे धरणाची पातळी वाढते, त्या ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.मध्यम प्रकल्पांमध्ये आतापर्यंत शहानूर मध्यम प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ३१.३९ टक्के दलघमी उपयुक्त पाणीसाठा हा धरणात शिल्लक आहे, तर चंद्रभागा मध्यम प्रकल्पात ३२.७३ टक्के, पूर्णा प्रकल्पात ३१.३२ टक्के, सपन प्रकल्पात ३१.९४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अमरावती शहराची तहान भागविणारा ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात सद्यस्थितीत ३५ .८५ उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे शंभर टक्के धरण भरण्याची प्रशासनाला व नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे. हीच परिस्थिती विभागातील अनेक जिल्ह्यातील प्रकल्पाची आहे. विदर्भ पाटबंधारे विभागाच्या अधिकृत विवरण पत्रात ६ जुलैपर्यंतची सदर माहिती असून, अप्पर वर्धा धरण परिसरात १ जूनपासून आतापर्यंत २४१.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १२४.० मिमी पाऊस झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत चांगल्या पावसाची नोंद झाली असली तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.९ जुलैपर्यंत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी थोडा चांगला पाऊस पडला. पण, धरण परिसरात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. काही दिवसांत जलसाठ्याची पातळी वाढण्याचा विश्वास आहे.- रमेश ढवळेअधीक्षक अभियंता.