शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

प्रतिकात्मक तेरवी करून शासनाचा निषेध

By admin | Updated: June 14, 2016 00:02 IST

गत १३ दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे.

शिक्षकांचे बेमुदत उपोषण: शिक्षण उपसंचालकांना जेवणअमरावती : गत १३ दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षकांनी सोमवारी राज्य शासनाची प्रतिकात्मक तेरवी साजरी करून संतप्त भावना व्यक्त केल्यात. येथील शिक्षण उपसंचालकांसह अन्य कर्मचाऱ्यांना तेरवीचे जेवण देण्यात आले.काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर, राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे विभागीय अध्यक्ष एस. के. वाहुरवाघ, राज्य संघटक पुंडलिक रहाटे, कार्याध्यक्ष सुरेश सिरसाट, सचिव दीपक देशमुख, सनघटक बाळकृष्ण गावंडे आदींच्या नेतृत्वात शासनाची प्रतिकात्मक तेरवी साजरी करण्यात आली.यावेळी शिक्षण उपसंचालक कुळकर्णी यांच्या दालनात उपोषणकर्त्या शिक्षकांनी जाऊन त्यांना जेवणाचे ताट देत शासनाची तेरवी करीत असल्याची नारेबाजी दिली. दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वेळकाढू धोरणाबद्दल घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाला रयत संघटनेचे राहुल कडू, शिक्षक आघाडीचे झुडपे सर, उर्दू टिचर्स असोशिएशनचे गाजी जहरोश, आर. जी. पठाण, सुनील देशमुख, गोपाल चव्हाण, विष्णू सालपे, मनोज कडू, अनिल पंजाबी, मोहन ढोके, नितीन टाले, संदीप भटकर, जीवन सोनखासकर, दिलीप उगले, मोहन पांडे आदी शिक्षक उपस्थित होते.शासनरुपी प्रतिकात्मक हनुमानद्वारे आंदोलनएकिकडे तेरवी साजरी करून शासनाचा निषेध नोंदवीत असताना शिक्षकांनी शासनरुपी प्रतिकात्मक हनुमानद्वारे आंदोलन करून लक्ष वेधले. शासनाने कामकाज हनुमानाच्या शेपटी प्रमाणे लांबत जाणारे असल्याचे या अभिनव आंदोलनद्वारे मांडण्यात आले. शैक्षणिक कार्यालये ही कुचकामी असल्याचे गगनभेटी नारेबाजी देण्यात आली.मंगळवारपासून आंदोलनाची तीव्रता - संजय खोडकेगत १३ दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे बेमुदत आंदोनल सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे हे गांभीर्याने घेत नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी केला. मंगळवारी १४ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थासमोर शिक्षकांचे धरणे आंदोलन होणार आहे. तसेच विभागस्तरावर आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल, ही बाब संजय खोडके यांनी स्पष्ट केली.शिक्षकांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही- शेखर भोयरविनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसाठी शासनाने बळी घेतलेल्या गजानन खरात यांचे बलिदान कदापीही वाया जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी घेतली आहे. शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आता त्यांचे कुटुंब रस्त्यावर उतरतील, असा इशारा भोयर यांनी दिला.