शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

प्रतिकात्मक तेरवी करून शासनाचा निषेध

By admin | Updated: June 14, 2016 00:02 IST

गत १३ दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे.

शिक्षकांचे बेमुदत उपोषण: शिक्षण उपसंचालकांना जेवणअमरावती : गत १३ दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षकांनी सोमवारी राज्य शासनाची प्रतिकात्मक तेरवी साजरी करून संतप्त भावना व्यक्त केल्यात. येथील शिक्षण उपसंचालकांसह अन्य कर्मचाऱ्यांना तेरवीचे जेवण देण्यात आले.काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर, राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे विभागीय अध्यक्ष एस. के. वाहुरवाघ, राज्य संघटक पुंडलिक रहाटे, कार्याध्यक्ष सुरेश सिरसाट, सचिव दीपक देशमुख, सनघटक बाळकृष्ण गावंडे आदींच्या नेतृत्वात शासनाची प्रतिकात्मक तेरवी साजरी करण्यात आली.यावेळी शिक्षण उपसंचालक कुळकर्णी यांच्या दालनात उपोषणकर्त्या शिक्षकांनी जाऊन त्यांना जेवणाचे ताट देत शासनाची तेरवी करीत असल्याची नारेबाजी दिली. दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वेळकाढू धोरणाबद्दल घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाला रयत संघटनेचे राहुल कडू, शिक्षक आघाडीचे झुडपे सर, उर्दू टिचर्स असोशिएशनचे गाजी जहरोश, आर. जी. पठाण, सुनील देशमुख, गोपाल चव्हाण, विष्णू सालपे, मनोज कडू, अनिल पंजाबी, मोहन ढोके, नितीन टाले, संदीप भटकर, जीवन सोनखासकर, दिलीप उगले, मोहन पांडे आदी शिक्षक उपस्थित होते.शासनरुपी प्रतिकात्मक हनुमानद्वारे आंदोलनएकिकडे तेरवी साजरी करून शासनाचा निषेध नोंदवीत असताना शिक्षकांनी शासनरुपी प्रतिकात्मक हनुमानद्वारे आंदोलन करून लक्ष वेधले. शासनाने कामकाज हनुमानाच्या शेपटी प्रमाणे लांबत जाणारे असल्याचे या अभिनव आंदोलनद्वारे मांडण्यात आले. शैक्षणिक कार्यालये ही कुचकामी असल्याचे गगनभेटी नारेबाजी देण्यात आली.मंगळवारपासून आंदोलनाची तीव्रता - संजय खोडकेगत १३ दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे बेमुदत आंदोनल सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे हे गांभीर्याने घेत नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी केला. मंगळवारी १४ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थासमोर शिक्षकांचे धरणे आंदोलन होणार आहे. तसेच विभागस्तरावर आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल, ही बाब संजय खोडके यांनी स्पष्ट केली.शिक्षकांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही- शेखर भोयरविनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसाठी शासनाने बळी घेतलेल्या गजानन खरात यांचे बलिदान कदापीही वाया जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी घेतली आहे. शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आता त्यांचे कुटुंब रस्त्यावर उतरतील, असा इशारा भोयर यांनी दिला.