शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

पेढी प्रकल्पग्रस्तांना मिळणार भाववाढ

By admin | Updated: January 18, 2015 22:30 IST

तालुक्यातील पेढी नदीवर होणाऱ्या प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आता एकरी १० लाख रूपयांची भाववाढ देण्यात येणार आहे.

भातकुली : तालुक्यातील पेढी नदीवर होणाऱ्या प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आता एकरी १० लाख रूपयांची भाववाढ देण्यात येणार आहे.भातकुली तालुक्यातील पेढी नदीवर होत असलेल्या पेढी प्रकल्पाचे बांधकाम प्रगतिपथावर असून या प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील कामुंजा, सावरखेड, कुंड, वजरखेड, वासेवाडी, अळणगाव, भातकुली, हातुर्णा, गौरखेडा या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित झाल्या. त्यांना जमिनीचा वाढीव मिळण्यासाठी आ. रवी राणा यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठक बोलावली होती. यामध्ये ६०० शेतकरी उपस्थित होते. बैठकीत आ. रवी राणा यांनी सुरुवातीपासूनच पेढी प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा व त्यांच्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर सविस्तर मांडल्यात. जोपर्यंत पेढी प्रकल्पग्रस्तांचे समाधान होणार नाही व त्यांच्या मागण्यांवर शासन तथा प्रशासन यथायोग्य कार्यवाही करणार नाही तोपर्यंत पेढी प्रकल्पाचे काम थांबविण्यात यावे, असा पवित्रा त्यांनी बैठकीमध्ये घेतला. आ. राणांच्या मागणीला ६०० शेतकऱ्यांनी समर्थन देत सभागृहात एकच मागणी रेटून धरली. त्यावर जिल्हाधिकारी किरणकुमार गित्ते यांनी २२ जानेवारीपर्यंत पेढी प्रकल्पावर कुठलीच कामे होणार नाही, असा निर्णय देऊन स्थगिती दिली आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे चारपट भाववाढ देण्याबाबत निकष व व्याख्या पेढी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समक्ष स्पष्ट करून साधारणत: प्रत्येकी एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला एकरी १० लक्ष रूपये भाववाढ मिळणार असल्याचे सांगितले. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने समाधानकारक निर्णय झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आ. राणा यांनी बैठक आयोजित करून शेतकऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी यशस्वीपणे मांडल्याबद्दल सर्व उपस्थित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या महत्त्वपूर्ण बैठकीला सुनील राणा, स्वीय सहाय्यक उमेश ढोणे, रामदासजी मानकर, वसंतराव मानकर, प्रशांत रोकडे, ज्ञानेश्वर कळसकर, विकास मानकर, अविनाश सनके, विनोद जायलवाल, गोवर्धन मानकर, बबलू दुर्गे इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते तसेच शासनातर्फे उपजिल्हाधिकारी राम सिद्धभट्टी, विनोद शिरभाते, मोहन पातूरकर, कार्यकारी अभियंता राठी, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे भातकुली, प्रवीण ठाकरे उपविभागीय अधिकारी अमरावती, भातकुलीचे तहसीलदार येडे, अमरावतीचे तहसीलदार सुरेश बागडे, भातकुली गटविकास अधिकारी चौधरी, अमरावती गटविकास अधिकारी काकडे, भूमी अभिलेख अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)