शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

वृक्षलागवडीच्या खड्डे मोहिमेला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 21:54 IST

राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात २६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २२ लाख खड्डे तयार झाले असून, २१ लाख १७ हजार ९५० खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात २६ लाखांचे लक्ष्य : जिल्हाधिकाऱ्यांची जंबो बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात २६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २२ लाख खड्डे तयार झाले असून, २१ लाख १७ हजार ९५० खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे. जून महिन्यापर्यंत २६ लाख खड्डे तयार करून सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.जिल्हाधिकारी बांगर यांनी मंगळवारी एकूण ३० यंत्रणांच्या प्रमुखांची १३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने बैठक घेतली. यात वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवनसंरक्षक हेमंत मिणा, सामाजिक वनीकरणचे उपवनसंरक्षक प्रदीप मसरामसह अनेक अधिकारी हजर होते. यावेळी जिल्हाधिकारी बांगर यांनी राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या धर्तीवर ‘वनयुक्त शिवार’ योजना हाती घेतली आहे. त्याअंतर्गत जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थावर विशेषत: जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी अधिकारी, कर्मचाºयांना करून दिली. १ जुलैपासून होणारी वृक्षलागवड ही ‘फोटोसेशन’ पुरती असू नये, यासाठी नियम, निकषाचा आधार राहणार आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरणाकडे वृक्ष लागवड कार्यक्रमांची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी तर उपवनसंरक्षक हे प्रमुख म्हणून धुरा सांभाळतील.३५ लाख रोपांची निर्मिती१ ते ३१ जुलै या कालावधीत वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या १५ नर्सरींमध्ये २० लाख रोपांची निर्मिती झाल्याची माहिती येथील सामाजिक वनीकरणचे उपवनसंरक्षक प्रदीप मसराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. वनविभागाकडे १५ लाखांवर रोपे आहेत. वृक्षलागवडीसाठी पुरेशी रोपे असून, त्यांची कमतरता भासणार नाही, असा विश्वास प्रदीप मसराम यांनी व्यक्त केला आहे.१३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने कोणत्याही उणिवा असू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. शासकीय, निमशासकीय व अन्य सामाजिक संघटनांना वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी, अमरावती.