शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

वृक्षलागवडीच्या खड्डे मोहिमेला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 21:54 IST

राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात २६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २२ लाख खड्डे तयार झाले असून, २१ लाख १७ हजार ९५० खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात २६ लाखांचे लक्ष्य : जिल्हाधिकाऱ्यांची जंबो बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात २६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २२ लाख खड्डे तयार झाले असून, २१ लाख १७ हजार ९५० खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे. जून महिन्यापर्यंत २६ लाख खड्डे तयार करून सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.जिल्हाधिकारी बांगर यांनी मंगळवारी एकूण ३० यंत्रणांच्या प्रमुखांची १३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने बैठक घेतली. यात वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवनसंरक्षक हेमंत मिणा, सामाजिक वनीकरणचे उपवनसंरक्षक प्रदीप मसरामसह अनेक अधिकारी हजर होते. यावेळी जिल्हाधिकारी बांगर यांनी राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या धर्तीवर ‘वनयुक्त शिवार’ योजना हाती घेतली आहे. त्याअंतर्गत जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थावर विशेषत: जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी अधिकारी, कर्मचाºयांना करून दिली. १ जुलैपासून होणारी वृक्षलागवड ही ‘फोटोसेशन’ पुरती असू नये, यासाठी नियम, निकषाचा आधार राहणार आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरणाकडे वृक्ष लागवड कार्यक्रमांची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी तर उपवनसंरक्षक हे प्रमुख म्हणून धुरा सांभाळतील.३५ लाख रोपांची निर्मिती१ ते ३१ जुलै या कालावधीत वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या १५ नर्सरींमध्ये २० लाख रोपांची निर्मिती झाल्याची माहिती येथील सामाजिक वनीकरणचे उपवनसंरक्षक प्रदीप मसराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. वनविभागाकडे १५ लाखांवर रोपे आहेत. वृक्षलागवडीसाठी पुरेशी रोपे असून, त्यांची कमतरता भासणार नाही, असा विश्वास प्रदीप मसराम यांनी व्यक्त केला आहे.१३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने कोणत्याही उणिवा असू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. शासकीय, निमशासकीय व अन्य सामाजिक संघटनांना वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी, अमरावती.