शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीच्या खड्डे मोहिमेला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 21:54 IST

राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात २६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २२ लाख खड्डे तयार झाले असून, २१ लाख १७ हजार ९५० खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात २६ लाखांचे लक्ष्य : जिल्हाधिकाऱ्यांची जंबो बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात २६ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २२ लाख खड्डे तयार झाले असून, २१ लाख १७ हजार ९५० खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे. जून महिन्यापर्यंत २६ लाख खड्डे तयार करून सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.जिल्हाधिकारी बांगर यांनी मंगळवारी एकूण ३० यंत्रणांच्या प्रमुखांची १३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने बैठक घेतली. यात वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवनसंरक्षक हेमंत मिणा, सामाजिक वनीकरणचे उपवनसंरक्षक प्रदीप मसरामसह अनेक अधिकारी हजर होते. यावेळी जिल्हाधिकारी बांगर यांनी राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या धर्तीवर ‘वनयुक्त शिवार’ योजना हाती घेतली आहे. त्याअंतर्गत जुलै महिन्यात १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थावर विशेषत: जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी अधिकारी, कर्मचाºयांना करून दिली. १ जुलैपासून होणारी वृक्षलागवड ही ‘फोटोसेशन’ पुरती असू नये, यासाठी नियम, निकषाचा आधार राहणार आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरणाकडे वृक्ष लागवड कार्यक्रमांची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी तर उपवनसंरक्षक हे प्रमुख म्हणून धुरा सांभाळतील.३५ लाख रोपांची निर्मिती१ ते ३१ जुलै या कालावधीत वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या १५ नर्सरींमध्ये २० लाख रोपांची निर्मिती झाल्याची माहिती येथील सामाजिक वनीकरणचे उपवनसंरक्षक प्रदीप मसराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. वनविभागाकडे १५ लाखांवर रोपे आहेत. वृक्षलागवडीसाठी पुरेशी रोपे असून, त्यांची कमतरता भासणार नाही, असा विश्वास प्रदीप मसराम यांनी व्यक्त केला आहे.१३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने कोणत्याही उणिवा असू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. शासकीय, निमशासकीय व अन्य सामाजिक संघटनांना वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी, अमरावती.