शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम गावे निश्चितीची प्रक्रिया लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:12 IST

अमरावती : शिक्षकांच्या बदलीच्या नव्या धोरणानुसार जिल्ह्यातील सुगम व दुर्गम गावे निश्चित करण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने ...

अमरावती : शिक्षकांच्या बदलीच्या नव्या धोरणानुसार जिल्ह्यातील सुगम व दुर्गम गावे निश्चित करण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर २८ एप्रिल रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षण, बांधकाम, परिवहन महामंडळ, वनविभाग, नियोजन विभाग, बीएसएनएल आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अवघड क्षेत्रातील गावे ठरण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात सीईओंनीच्या सूचनेनुसार संबंधितांकडून अहवाल प्राप्त होताच येत्या काही दिवसांत दुर्गम क्षेत्रातील गावे निश्चित करण्यात येणार आहेत. त्यानुसार शासनाने नियुक्त केलेल्या समितीकडे ती मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहेत. शिक्षक बदलीचे अधिकार पूर्वी जिल्हा परिषदेकडे होते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिक्षक बदलीच्या धोरणात बदल करण्यात आले आहे. सर्व जिल्हा परिषदांतील प्राथमिक शिक्षण विभागाकडून बदलीपात्र शिक्षकांकडून माहिती ऑनलाइन भरून घेतली जायची. यामध्ये सुगम व दुर्गम गावांची वर्गीकरण करण्यात आले. दुर्गम भागातील लोक दुर्गम भागातच राहायचे. शहरालगत असणाऱ्या जवळच्या किंवा सोईच्या गावांमध्ये काही ठराविक शिक्षकच वशिल्याने वर्षानुवर्षे ठाण मांडायचे. याला आळा घालण्यासाठी शासनाने सुगम व दुर्गम असे गावांचे वर्गीकरण करण्याचे ठरविले. शासनाने महिनाभरापूर्वी शिक्षक बदली धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सुगम व दुर्गम भागातील गावांची यादी तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गटशिक्षणाधिकारी ही गावे निश्चित करताहेत सुगम व दुर्गम गावे निश्चित झाल्यानंतर त्यांच्या मान्यतेसाठी सहा जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी निवडणूक, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक आदींचा समावेश आहे.

कोट

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे दूर्गम गावे निश्चित करण्यासाठी परिवहन महामंडळ, बीएसएनएल, वनविभाग, नियोजन विभाग आणि पीडब्युडी आदी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत व्हिसीव्दारे बैठक घेतली. बैठकीतील चर्चेनुसार दुर्गम गावांची माहिती मागविली आहे. ही माहिती उपलब्ध होताच दुर्गम गावे निश्चित केली जातील.

- अविश्यांत पंडा,

मुख्यकार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद