शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

दुर्गम गावे निश्चितीची प्रक्रिया लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:12 IST

अमरावती : शिक्षकांच्या बदलीच्या नव्या धोरणानुसार जिल्ह्यातील सुगम व दुर्गम गावे निश्चित करण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने ...

अमरावती : शिक्षकांच्या बदलीच्या नव्या धोरणानुसार जिल्ह्यातील सुगम व दुर्गम गावे निश्चित करण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर २८ एप्रिल रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षण, बांधकाम, परिवहन महामंडळ, वनविभाग, नियोजन विभाग, बीएसएनएल आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अवघड क्षेत्रातील गावे ठरण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात सीईओंनीच्या सूचनेनुसार संबंधितांकडून अहवाल प्राप्त होताच येत्या काही दिवसांत दुर्गम क्षेत्रातील गावे निश्चित करण्यात येणार आहेत. त्यानुसार शासनाने नियुक्त केलेल्या समितीकडे ती मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहेत. शिक्षक बदलीचे अधिकार पूर्वी जिल्हा परिषदेकडे होते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिक्षक बदलीच्या धोरणात बदल करण्यात आले आहे. सर्व जिल्हा परिषदांतील प्राथमिक शिक्षण विभागाकडून बदलीपात्र शिक्षकांकडून माहिती ऑनलाइन भरून घेतली जायची. यामध्ये सुगम व दुर्गम गावांची वर्गीकरण करण्यात आले. दुर्गम भागातील लोक दुर्गम भागातच राहायचे. शहरालगत असणाऱ्या जवळच्या किंवा सोईच्या गावांमध्ये काही ठराविक शिक्षकच वशिल्याने वर्षानुवर्षे ठाण मांडायचे. याला आळा घालण्यासाठी शासनाने सुगम व दुर्गम असे गावांचे वर्गीकरण करण्याचे ठरविले. शासनाने महिनाभरापूर्वी शिक्षक बदली धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सुगम व दुर्गम भागातील गावांची यादी तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गटशिक्षणाधिकारी ही गावे निश्चित करताहेत सुगम व दुर्गम गावे निश्चित झाल्यानंतर त्यांच्या मान्यतेसाठी सहा जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी निवडणूक, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक आदींचा समावेश आहे.

कोट

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे दूर्गम गावे निश्चित करण्यासाठी परिवहन महामंडळ, बीएसएनएल, वनविभाग, नियोजन विभाग आणि पीडब्युडी आदी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत व्हिसीव्दारे बैठक घेतली. बैठकीतील चर्चेनुसार दुर्गम गावांची माहिती मागविली आहे. ही माहिती उपलब्ध होताच दुर्गम गावे निश्चित केली जातील.

- अविश्यांत पंडा,

मुख्यकार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद