शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात लोकसहभागातून कैद्यांना मिळाला दिलासा

By admin | Updated: September 3, 2016 00:03 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना किरकोळ कारणांमुळे शिक्षेतून मुक्ती मिळत नाही.

अनिल बोंडेचा पुढाकार : अभिवचन, संचित रजा व सुटकाअमरावती : न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना किरकोळ कारणांमुळे शिक्षेतून मुक्ती मिळत नाही. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त जीवन जगतात. मात्र आता लोकसहभागातून कैद्यांना दिलासा देण्यासाठी कारागृह प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. याअनुषंगाने शुक्रवारी अभिवचन, संचित व शिक्षा पूर्ण झालेल्या तीन कैद्यांना दिलासा मिळाला आहे.संत गाडगेबाबा प्रार्थना सभागृहात आयोजित कार्यक्रमाला आ. अनिल बोंडे, वसुधा बोंडे, रोटरी क्लब मेनचे अध्यक्ष अशोक आसोरीया, राम ठोंबरे, के. एम. अंबाडेकर, संजय छांगाणी, बालकिशन पांडे, कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, वरिष्ठ तुंगाधिकारी अशोक जाधव, तुरुंगाधिकारी प्रवीण मोडकर, शरद माळशिखरे, अवेर संस्थेचे अमित सहारकर, वऱ्हाड संस्थेचे धनानंद नागदिवे, प्रमोद मेश्राम, वैद्यकीय अधिकारी संजय गणोरकर, भूषण कांबळे, आर. के. कानडे आदी उपस्थित होते. यावेळी आ.अनिल बोंडे, कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी कैद्यांशी संवाद साधताना त्यांचे प्रश्न, व्यथा जाणून घेतल्यात. यात कैद्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षेचा कालावधी पूर्ण केला असताना केवळ दंडाची रक्कम भरली नसल्याने ते कारागृहातून बाहेर जाऊ शकत नाही, या व्यथा मांडल्या. अभिवचन, संचित रजेसाठी पोलीस अहवाल सतत ‘निगेटिव्ह’ येत असल्याने अनेकांना कारागृहातच रहावे लागते. कैदीदेखील अखेर माणूसच आहे. त्याच्या हातून कळत, नकळत चुका झाल्यात. मात्र त्याला मानवाधिकारानुसार जगू द्या, चुका सुधारण्याची संधी देण्याची मागणी बहुतांश कैद्यांनी केली. दरम्यान रोटरी क्लबच्या पुढाकाराने तीन कैद्यांना दिलासा मिळाला. अटी, शर्थीच्या अधीन राहून तीन कैद्यांची दंडात्मक रक्कम भरण्यात आली. यात राजीव धुर्वे याची कायम सुटका करण्यात आली आहे. धुर्वे याची शिक्षा पूर्ण होऊनही त्याच्याकडे अडीच हजार रुपये दंड भरण्याची सोय नसल्यामुळे बाहेर जाऊ शकत नव्हते. मात्र शुक्रवारी अ‍ॅड. अशोक गायकवाड यांनी अडीच हजार रुपये भरुन धुर्वे यांची सुटका करुन माणुसकीचा परिचय दिला. जन्मठेपेचा आरोपी त्र्यंबक भागाजी गायकवाड (७८) याची संचित रजा आणि रवींद्र गणेश बांगर याला अभिवचन रजा मंजूर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)अर्धांगवायू कैद्याच्या सुटीसाठी धडपडजन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले त्र्यंबक भागाजी गायकवाड (७८, रा. देवळे हातगाव पो. धनसांवगी, जि. जालना) हे येथील मध्यवर्ती कारागृहात १४ डिंसेबर २०१३ रोजी दाखल झाले. मात्र चार महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूने ग्रासले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाला. त्यानंतर कारागृहाच्या दवाखान्यात उपचार सुरुच आहे. वयोवृद्ध त्र्यंबकरावांची प्रकृती बघून त्यांना संचित रजा मिळावी, यासाठी कारागृह प्रशासनाने धडपड केली. आ. अनिल बोंडे यांनी पुढाकार घेतला. अटी, शर्थीनुसार त्यांना शुक्रवारी घरी पाठविण्यात आले आहे. ते महिनाभरानंतर कारागृहात परतणार आहेत. कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी मोलाची कामगिरी केली.