शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

कारागृहात वीज,पाणी बचतीचा संकल्प

By admin | Updated: September 22, 2016 00:24 IST

हातून कळत, नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रुपात प्रायश्चित करीत असलेल्या बंदीजनांनी मध्यवर्ती कारागृहात ...

अधीक्षक दालनात बैठक : बराक प्रमुखांनी स्वीकारली जबाबदारीअमरावती : हातून कळत, नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रुपात प्रायश्चित करीत असलेल्या बंदीजनांनी मध्यवर्ती कारागृहात आता वीज, पाणी बचतीचा संकल्प सोडला आहे. कारागृह अधीक्षक दालनात झालेल्या बैठकीत सर्व बॅरेक प्रमुखांनी वीज, पाणी बचत करण्याची शपथ घेतली.कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्या पुढाकाराने कैद्यांसाठी सुधारणा व पुनर्वसन विविध उपक्रम राबविले जात आहे. या उपक्रमांमुळे बंदीजनांच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण होऊन समाज निर्मितीसाठी काही तरी वेगळे करण्याची उमेद जागे झाले आहे. परिणामी कारागृह अधीक्षकांनी अनावश्यक वीज, पाणी वापर टाळण्यासाठी बंदीजनांनी पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव ठेवला असता त्याला उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. बॅरेक अथवा कारागृह परिसरात अनावश्यक वीज, पाणी वापर टाळून राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करण्याची शपथ बंदीजनांनी घेतली. उर्जा बचतीसाठी बॅरेक जबाबदारांनी स्वत: पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. संजय धुर्वे, संतोष नरोटे, अशोक इंगळे, रवि रोकङे,कृष्णा नरोटे, राजू पवार, रमेश गोंडाने, श्रीकृष्ण बंधे, राजू देवडे, सुरेश घुलक्षे, जगदेव मोरे, संजय वर, संजय मोरे, मोतीराम लठाड या बॅरेक प्रमुख तसेच जनरल सुभेदार विक्रम तिवसकर, रक्षक सुरेश गुळवे यांनी उर्जा, पाणी बचतीचा संकल्प घेतला. कारागृह अधीक्षक, वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट दिली तर बराकीत अनावश्यक वीज, पाणी वापर दिसणार नाही, अशी सामुहिकपणे शपथ घेण्यात आली. या नवीन उपक्रमामुळे कारागृहात ३० टक्के वीज, पाण्याची बचत होईल, असा दावा बॅरेक प्रमुखांनी कारागृह अधीक्षक ढोले यांना दिला. शासन तिजोरीवर पडणारा भार देखील कमी होईल. पर्यावरणाच्या अनुषंगाने वीज, पाणी बचत ही भविष्यासाठी अतिशय आवश्यक बाब असल्याने कारागृहात सुरु झालेल्या या उपक्रमामुळे कारागृह खरेच बंदीशाळा म्हणून नावारुपास येत असल्याचे चित्र आहे.कैद्यांनाही त्यांच्या जबाबदारीचे भान देणारा हा उपक्रम आहे. राष्ट्राच्या प्रगतीकरिता वीज आणि पाण्याची बचत अनिवार्य ठरते. कैद्यांनी वीज आणि पाणी बचतीची शपथ घेतल्याने या उपक्रमाची जोरदार चर्चा होती. कारागृहात हा उपक्रम राबविला जात असल्याने याबद्दल बरीच उत्सुकता आहे. पाण्याचा अनावश्यक वापर व विजेचा अपव्यय टाळल्यास उद्या या नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी वणवण भटकण्याची वेळ येणार नाही, असा सूर उमटला राष्ट्रनिर्मितीत सगळ्यांचाच सहभाग आवश्यक आहे. वीज, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचा वापर योग्य रुपात व्हावा, ही भावना आहे. बंदीजनांना वीज, पाण्याचे महत्त्व पटवून दिले. १४ वॉर्डन, वॉचमन यांच्यावर ११०९ बंदीजन सांभाळण्याची जबाबदारी असताना वीज, पाण्याची बचत देखील करावी लागणार आहे.- भाईदास ढोलेअधीक्षक, मध्यवर्ती कारागृह