शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

कारागृहात वीज,पाणी बचतीचा संकल्प

By admin | Updated: September 22, 2016 00:24 IST

हातून कळत, नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रुपात प्रायश्चित करीत असलेल्या बंदीजनांनी मध्यवर्ती कारागृहात ...

अधीक्षक दालनात बैठक : बराक प्रमुखांनी स्वीकारली जबाबदारीअमरावती : हातून कळत, नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रुपात प्रायश्चित करीत असलेल्या बंदीजनांनी मध्यवर्ती कारागृहात आता वीज, पाणी बचतीचा संकल्प सोडला आहे. कारागृह अधीक्षक दालनात झालेल्या बैठकीत सर्व बॅरेक प्रमुखांनी वीज, पाणी बचत करण्याची शपथ घेतली.कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्या पुढाकाराने कैद्यांसाठी सुधारणा व पुनर्वसन विविध उपक्रम राबविले जात आहे. या उपक्रमांमुळे बंदीजनांच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण होऊन समाज निर्मितीसाठी काही तरी वेगळे करण्याची उमेद जागे झाले आहे. परिणामी कारागृह अधीक्षकांनी अनावश्यक वीज, पाणी वापर टाळण्यासाठी बंदीजनांनी पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव ठेवला असता त्याला उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. बॅरेक अथवा कारागृह परिसरात अनावश्यक वीज, पाणी वापर टाळून राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करण्याची शपथ बंदीजनांनी घेतली. उर्जा बचतीसाठी बॅरेक जबाबदारांनी स्वत: पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. संजय धुर्वे, संतोष नरोटे, अशोक इंगळे, रवि रोकङे,कृष्णा नरोटे, राजू पवार, रमेश गोंडाने, श्रीकृष्ण बंधे, राजू देवडे, सुरेश घुलक्षे, जगदेव मोरे, संजय वर, संजय मोरे, मोतीराम लठाड या बॅरेक प्रमुख तसेच जनरल सुभेदार विक्रम तिवसकर, रक्षक सुरेश गुळवे यांनी उर्जा, पाणी बचतीचा संकल्प घेतला. कारागृह अधीक्षक, वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट दिली तर बराकीत अनावश्यक वीज, पाणी वापर दिसणार नाही, अशी सामुहिकपणे शपथ घेण्यात आली. या नवीन उपक्रमामुळे कारागृहात ३० टक्के वीज, पाण्याची बचत होईल, असा दावा बॅरेक प्रमुखांनी कारागृह अधीक्षक ढोले यांना दिला. शासन तिजोरीवर पडणारा भार देखील कमी होईल. पर्यावरणाच्या अनुषंगाने वीज, पाणी बचत ही भविष्यासाठी अतिशय आवश्यक बाब असल्याने कारागृहात सुरु झालेल्या या उपक्रमामुळे कारागृह खरेच बंदीशाळा म्हणून नावारुपास येत असल्याचे चित्र आहे.कैद्यांनाही त्यांच्या जबाबदारीचे भान देणारा हा उपक्रम आहे. राष्ट्राच्या प्रगतीकरिता वीज आणि पाण्याची बचत अनिवार्य ठरते. कैद्यांनी वीज आणि पाणी बचतीची शपथ घेतल्याने या उपक्रमाची जोरदार चर्चा होती. कारागृहात हा उपक्रम राबविला जात असल्याने याबद्दल बरीच उत्सुकता आहे. पाण्याचा अनावश्यक वापर व विजेचा अपव्यय टाळल्यास उद्या या नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी वणवण भटकण्याची वेळ येणार नाही, असा सूर उमटला राष्ट्रनिर्मितीत सगळ्यांचाच सहभाग आवश्यक आहे. वीज, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचा वापर योग्य रुपात व्हावा, ही भावना आहे. बंदीजनांना वीज, पाण्याचे महत्त्व पटवून दिले. १४ वॉर्डन, वॉचमन यांच्यावर ११०९ बंदीजन सांभाळण्याची जबाबदारी असताना वीज, पाण्याची बचत देखील करावी लागणार आहे.- भाईदास ढोलेअधीक्षक, मध्यवर्ती कारागृह