शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

महिला रोजगाराला प्राधान्य, दोन कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 01:27 IST

शेतकरी विधवा, परित्यक्ता व कुटुंबातून दुरावलेल्या एकल महिलांचे प्रश्न सरकारला कळावेत, वंचित-शोषित या वर्गासाठी शासनाने धोरण ठरवावे, या मुद्द्यावर अमरावती येथे एकल महिला किसान संघटनच्यावतीने रविवारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देविजया रहाटकर : एकल महिला परिषद, धोरण ठरविण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकरी विधवा, परित्यक्ता व कुटुंबातून दुरावलेल्या एकल महिलांचे प्रश्न सरकारला कळावेत, वंचित-शोषित या वर्गासाठी शासनाने धोरण ठरवावे, या मुद्द्यावर अमरावती येथे एकल महिला किसान संघटनच्यावतीने रविवारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित परिषदेला मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, गोव्यासह मराठवाड्यातील दोन जिल्हे आणि विदर्भातील सात जिल्ह्यांतील एकल महिला उपस्थित होत्या.मुंबई येथील अ‍ॅक्शन एड या संस्थेच्या निरजा भटनाकर व यवतमाळला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन वैशाली येडे यांनी परिषदेचे उद्घाटन केले. खासदार नवनीत राणा, आमदार यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू, कमर फातिमा (मध्य प्रदेश), सीमा कुलकर्णी, किसान मित्रच्या डॉ. उपमा दिवाण, अपेक्षा होमिओ सोसायटीच्या डॉ. मधुकर गुबळे, संजीवनी पवार, मारोती चवरे, सुनील धनविजय, दीपाली शर्मा, भावना हस्तक, विलास लोखंडे उपस्थित होते.याप्रसंगी महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी संबोधित केले. राज्यातील ४० लाख महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने दोन कोटींची तरतूद केली आहे. येत्या रक्षाबंधनाच्या पर्वावर त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष रहाटकर यांनी दिली.यावेळी आमदार बच्चू कडू व आमदार यशोमती ठाकूर यांनी एकल महिलांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या सभागृहात महिलांच्या समस्या विधिमंडळात मांडण्याचे आश्वासन दिले. खासदार नवनीत रवि राणा यांनीसुद्धा महिलांना धीर देत संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. राज्यातील ४० लाख महिलांचे पती कर्जापायी, आर्थिक संकटाचा सामना करू न शकल्याने मृत्यू पावले. त्यानंतर त्यांच्या परिवाराचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी या अर्धांगिनींवर आपसुकच आली. त्यामुळे विविध संकटांचा सामना करताना महिलांची वाताहत होत असल्याचा सूर परिषदेत निघाला.