शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

१ मार्चपासून प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:14 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात नियमानुसार सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. ग्रामीण भागाची वस्तुस्थिती बघता प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याचे हे संकेत मानले जात आहे. दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी पावले उचलल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे शिक्षणाधिकाºयांना पत्र : प्राथमिक शिक्षक संघटना सरसावली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात नियमानुसार सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. ग्रामीण भागाची वस्तुस्थिती बघता प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याचे हे संकेत मानले जात आहे. दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी पावले उचलल्याची माहिती मिळाली आहे.प्राथमिक शिक्षक संघटनेने सकाळच्या सत्रात शाळा सुरू करावी, या आशयाच्या मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या पत्रात ग्रामीण भागाची वस्तुस्थिती विशद करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपासून उन्हाळ्याची चाहूल लागली असून, मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढपण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमिवर शहरी भागातील शाळांमध्ये असलेल्या सोईसुविधा ग्रामीण भागातील शाळांमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना असह्य वेदना झेलत उन्हाळ्यात शिक्षण घ्यावे लागते. अशातच ग्रामीण भागात दुष्काळ, पाणीटंचाई आणि शाळांमध्ये पंखे, हवेशिर वर्गखोल्यांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. रखखरत्या उन्हात दिवसभर विद्यार्थ्यांना वर्गात बसवून ठेवणे संयुक्तिक होणार नाही, असे पत्रात नमूद आहे. धारणी तालुका वगळता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात. त्याअनुषंगाने शिक्षणाधिकाºयांंना अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा लागणार आहे. शैक्षणिक बाबी परिपूर्ण करूनच प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू होतील, त्यानुसार कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले.शिक्षण विभाग लागला कामालाजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे पत्र धडकताच संपूर्ण विभाग कामाला लागल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात प्राथमिकच्या सुमारे १५०० शाळा आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने चाचपणी चालविली आहे. १ मार्चपासून सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचे पत्र याच आठवड्यात मुख्याध्यापकांना पोहचेल, असे संकेत मिळत आहे.