शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

संत्र्याचा भाव अवघा २० रुपये किलो; शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 07:00 IST

Orange, Farmer, Amravati News संत्र्याला भाव नसल्याने, संत्रा उत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ५० रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ २० रुपये प्रतिकिलोवर आला आहे.

ठळक मुद्देभाव कोसळलेबागांमध्ये फळांचा सडा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निसर्गाच्या प्रकोपामुळे जुलै-ऑगस्टमध्ये बागांमधील संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली, तर उर्वरित फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकवून ठेवले. मात्र, आता संत्र्याला भाव नसल्याने, संत्रा उत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ५० रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ २० रुपये प्रतिकिलोवर आला आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या या तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्री उत्पादित होतात. मुबलक पाणी असल्याने पूर्णा नदीच्या दोन्ही काठांवर मोठ्या प्रमाणात संत्राबागा आहेत. मात्र, यावर्षीच्या सुरुवातीला लॉकडाऊनमुळे सर्वत्र वाहतूक बंद होती. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात संत्री असूनदेखील खरेदीसाठी व्यापारी न आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने संत्र्याच्या आंबिया बहराची फूट चांगली झाली होती. मात्र, जुलै ते ऑगस्ट महिन्यात संत्राबागांमध्ये मोठ्या प्रमाणात गळ झाली. ३५ ते ५० टक्के संत्री गळून पडली होती.

मध्यंतरी अतिपावसामुळे फळांवर काळे व पिवळे डाग पडून फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली होती. त्यातून वाचलेल्या संत्र्यालाही भाव नसल्याने संत्रा बागायतदारांची कोंडी झाली आहे. १५०० ते दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याचे बोलले जात आहे. परराज्यातील बाजारपेठांमध्ये संत्र्याला उठाव नसल्याचे व्यापारी शेतकऱ्यांना सांगत आहेत. या दरावरही पाहिजे त्या प्रमाणात व्यापारी आले नसल्याने संत्राउत्पादक पुन्हा अडचणीत सापडला आहे.संत्रा उत्पादन कुठे?चांदूर बाजार तालुक्यात घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, करजगाव, देऊरवाडा, काजळी, कोदोरी, माधान, सोनोरी, नानोरी, थुगाव पिंपरी

पूर्वी संत्री खरेदी करण्याकरिता व्यापारी वर्ग उत्पादकांच्या घरी चकरा घालत होते. यावर्षी उत्पादकांना व्यापाऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. संत्र्याला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.- अण्णा खापरेसंत्राउत्पादक शेतकरी

टॅग्स :agricultureशेती