शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:08 IST

इंटरनेट क्रांती जनतेच्या फायद्याची असली तरी सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देसायबर जागृती कार्यक्रम : राज्यभरात ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत जनजागृती

आॅनलाईन लोकमतअमरावती : इंटरनेट क्रांती जनतेच्या फायद्याची असली तरी सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. सायबर गुन्हे टाळण्यासाठी केवळ प्रतिबंधात्मक एकच उपाय असल्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभरात 'ट्रान्सफार्मिंग महाराष्ट्र' प्रकल्पांतर्गत जनजागृती केली जात आहे. मंगळवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी या प्रकल्पांतर्गत पोलीस आयुक्तालायत 'सायबर जाणीव जागृती कार्यक्रम' घेण्यात आला असून त्यामध्ये सायबर गुन्ह्यांविषयक माहिती देऊन त्यावरील उपाययोजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.सायबर जाणीव जागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सायबर गुन्ह्याविषयक माहिती देऊन जनजागृतीवर भर देण्याचे आवाहन प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना केले. यावेळी पोलीस उपायुक्त प्रदीप पवार, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे, पीएसआय कान्होपात्रा बन्सा, पोलीस कर्मचारी संग्राम भोजने उपस्थित होते. पोलीस आयुक्त मंडलीक यांनी ट्रान्सफार्मिंग महाराष्ट्र प्रकल्पाच्या उद्देशावर प्रकाश टाकला, ते म्हणाले, आजच्या युगात इंटरनेट मानवाचा अविभाज्य घटकच बनला आहे.इंटरनेटचा वापर करताना सावधगिरी बाळगली, तर सायबर गुन्हे टाळण्यास मोठी मदत मिळू शकते. सायबर गुन्हेगार नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करतात. त्यात सामान्य नागरिक बळी पडून आर्थिक व सामाजिक नुकसान होते. सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक झाली असून त्या अनुषंगाने शासनातर्फे राज्यभरात ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गंत कार्यक्रम राबविले जात आहे. एपीआय कांचन पांडे यांनी सायबर गुन्ह्याविषयक माहिती देत त्यावरील उपाययोजना सुचवित प्रतिबंधात्मक उपाय सायबर गुन्हे रोखू शकते, असे मत व्यक्त केले. सायबर गुन्ह्यातील फिशींग, हॅकिंग, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणे, विवाहविषयक फसवणूक, वैयक्तिक ओळख चोरी, बँकविषयक फसवणूक, एटीएमविषयक फसवणूक, विमा विषयक फसवणूक, समाजमाध्यमांद्वारे होणारे गुन्हे, आॅनलाईन खरेदीतील फसवणूक अशा आदी गुन्ह्यांवर पांडे यांनी प्रकाश टाकत त्यावर उपाय सुचविले. या गुन्ह्यांविषयक थोडीसी माहिती इंटरनेटचा वापर करणाºयास असल्यास हे गुन्हे टाळले जाऊ शकतात, असे मत कांचन पांडे यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले. तसेच सायबर गुन्हेगार कशाप्रकारे गुन्हे करतात. त्यानुसार इंटरनेट हाताळताना नागरिकांनी कशी काळजी घ्यावी, यावर उपाय त्यांनी सांगत प्रसार माध्यमांना जनजागृती करण्याचे आवाहन केले.