शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

बोगस आदिवासींची घुसखोरी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:18 IST

आदिवासी समाजाला संवैधानिक हक्क मिळालेले नाहीत, तर बोगस आदिवासी घुसखोरी करीत आहेत. ही घुसखोरी रोखण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या नेतृत्वात सोमवारी आदिवासी अधिकार महामोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त कार्यालयावर धडक : आदिवासी अधिकार महामोर्चाने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आदिवासी समाजाला संवैधानिक हक्क मिळालेले नाहीत, तर बोगस आदिवासी घुसखोरी करीत आहेत. ही घुसखोरी रोखण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या नेतृत्वात सोमवारी आदिवासी अधिकार महामोर्चा काढण्यात आला.स्थानिक सायन्स कोअर मैदान ते मालटेकडी रोड, गर्ल्स हायस्कूल चौक, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे हा मोर्चा विभागीय कार्यालयावर धडकला. यावेळी शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनानुसार, आदिवासी समाजाला संवैधानिक अधिकार बहाल करण्यात आले आहेत. तथापि, गैरआदिवासींनाही अनुसूचित जमातीच्या आरक्षण सूचीमध्ये समावेश करण्याचे कटकारस्थान तसेच कास्ट व्हॅलिडिटी समिती गुंडाळण्याचा घाट सुनियोजितपणे रचला जात आहे. बनावट कागदपत्रे सादर करून व्हॅलिडिटी मिळवण्याचा गोरखधंदा सुरू झाला असून, एकाही प्रकरणात येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयात दाद मागावयास गेले नाही. अशाप्रकारे बोगस आदिवासीला अभय दिले जात आहे. आदिवासी समाजातील अंधश्रद्धा, दारिद्र्याचा फायदा घेत त्यांच्या योजना, शैक्षणिक लाभ भलत्यांनीच लाटल्या. यात प्रशासकीय यंत्रणा सहभागी आहे.पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना बंद करून त्याऐवजी पूर्वीप्रमाणेच शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात यावी. आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती विहित मुदतीत मिळावी. एसटी आरक्षण सूचीमध्ये अन्य कोणालाही समाविष्ट करू नये. आदिवासींना विविध योजना, लाभ आणि शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात याव्यात आदी ३६ प्रकारच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मधुकर उईके, राजे, वासुदेवशहा टेकाम, एम.एम. आत्राम, दिलीप मडावी, विठ्ठल मरापे, दीपक राठोड, संजय मडावी, सुरेश कन्नाके, रमेश मवासी, जानकीराम डाखोेरे, जगदेव डांबे, मतीन भोसले, विजय कोकोडे, एम.बी. डाखोेरे, अजय घोडाम, रामेश्र्वर युवनाते, महानंदा टेकाम, हेमराज राऊत, एम.के. कोडापे, फकीरा जुमनाके, निनाद सुरपाम, शिवराम तोटे, आनंद पवार, राजेश टारपे, मन्ना दारसिंबे यांच्यासह विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात गगनभेदी नारे देत आदिवासींनी त्यांच्या मागण्या, प्रश्नांकडे लक्ष वेधले. या महामोर्चात एकूण ३२ आदिवासी संघटना सहभागी झाल्या होत्या.गुल्लरघाट प्रकरणात दोषींवर कारवाई करापुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्याऐवजी मेळघाटच्या गुल्लरघाट येथील २२ जानेवारी रोजी निष्पाप विस्थापीत आदिवासींवर अश्रुधुराचा अमानुष मारा करण्यात आला. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदविले गेले. व्याघ्र प्रकल्प आणि पोलीस विभागाने दाखल झालेले फौजदारी गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. विस्थापित आदिवासींना सुविधा उपलब्ध करण्यात प्रशासन अपयशी ठरले. यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीदेखील निवेदनातून करण्यात आली.