शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

बोगस आदिवासींची घुसखोरी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:18 IST

आदिवासी समाजाला संवैधानिक हक्क मिळालेले नाहीत, तर बोगस आदिवासी घुसखोरी करीत आहेत. ही घुसखोरी रोखण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या नेतृत्वात सोमवारी आदिवासी अधिकार महामोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त कार्यालयावर धडक : आदिवासी अधिकार महामोर्चाने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आदिवासी समाजाला संवैधानिक हक्क मिळालेले नाहीत, तर बोगस आदिवासी घुसखोरी करीत आहेत. ही घुसखोरी रोखण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या नेतृत्वात सोमवारी आदिवासी अधिकार महामोर्चा काढण्यात आला.स्थानिक सायन्स कोअर मैदान ते मालटेकडी रोड, गर्ल्स हायस्कूल चौक, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे हा मोर्चा विभागीय कार्यालयावर धडकला. यावेळी शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनानुसार, आदिवासी समाजाला संवैधानिक अधिकार बहाल करण्यात आले आहेत. तथापि, गैरआदिवासींनाही अनुसूचित जमातीच्या आरक्षण सूचीमध्ये समावेश करण्याचे कटकारस्थान तसेच कास्ट व्हॅलिडिटी समिती गुंडाळण्याचा घाट सुनियोजितपणे रचला जात आहे. बनावट कागदपत्रे सादर करून व्हॅलिडिटी मिळवण्याचा गोरखधंदा सुरू झाला असून, एकाही प्रकरणात येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयात दाद मागावयास गेले नाही. अशाप्रकारे बोगस आदिवासीला अभय दिले जात आहे. आदिवासी समाजातील अंधश्रद्धा, दारिद्र्याचा फायदा घेत त्यांच्या योजना, शैक्षणिक लाभ भलत्यांनीच लाटल्या. यात प्रशासकीय यंत्रणा सहभागी आहे.पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना बंद करून त्याऐवजी पूर्वीप्रमाणेच शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात यावी. आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती विहित मुदतीत मिळावी. एसटी आरक्षण सूचीमध्ये अन्य कोणालाही समाविष्ट करू नये. आदिवासींना विविध योजना, लाभ आणि शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात याव्यात आदी ३६ प्रकारच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मधुकर उईके, राजे, वासुदेवशहा टेकाम, एम.एम. आत्राम, दिलीप मडावी, विठ्ठल मरापे, दीपक राठोड, संजय मडावी, सुरेश कन्नाके, रमेश मवासी, जानकीराम डाखोेरे, जगदेव डांबे, मतीन भोसले, विजय कोकोडे, एम.बी. डाखोेरे, अजय घोडाम, रामेश्र्वर युवनाते, महानंदा टेकाम, हेमराज राऊत, एम.के. कोडापे, फकीरा जुमनाके, निनाद सुरपाम, शिवराम तोटे, आनंद पवार, राजेश टारपे, मन्ना दारसिंबे यांच्यासह विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात गगनभेदी नारे देत आदिवासींनी त्यांच्या मागण्या, प्रश्नांकडे लक्ष वेधले. या महामोर्चात एकूण ३२ आदिवासी संघटना सहभागी झाल्या होत्या.गुल्लरघाट प्रकरणात दोषींवर कारवाई करापुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्याऐवजी मेळघाटच्या गुल्लरघाट येथील २२ जानेवारी रोजी निष्पाप विस्थापीत आदिवासींवर अश्रुधुराचा अमानुष मारा करण्यात आला. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदविले गेले. व्याघ्र प्रकल्प आणि पोलीस विभागाने दाखल झालेले फौजदारी गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. विस्थापित आदिवासींना सुविधा उपलब्ध करण्यात प्रशासन अपयशी ठरले. यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीदेखील निवेदनातून करण्यात आली.