शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीतच झाला त्यांच्या उमेदवारीला विरोध

By admin | Updated: July 14, 2014 00:50 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचलपूर

बाहेरचा लादलेला उमेदवार नकोच : भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सूरसुरेश सवळे चांदूरबाजारविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचलपूर मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बाहेरचा व लादलेला उमेदवार विधानसभा निवडणुकीत नको, असा सूर या बैठकीचा होता. या बैठकीत अचलपूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांचे नाव न घेता काही वर्षांपूर्वी भाजपात पदार्पण केलेल्या व बाहेरचा लादलेला उमेदवार मतदारसंघात सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडून तसा ठरावच प्रदेशाध्यक्षांकडे पाठविल्यामुळे ही बैठक अख्या मतदारसंघात चांगलीच चर्चिली जात आहे.शुक्रवारी अचलपूर मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक बैठक स्थानिक आनंद सभागृहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भारसाकळे हे होते. मनोहर सुने, प्रमोद कोरडे, अशोक बनसोड, रूपेश ढेपे, गजानन कोल्हे, चक्रधर घुलक्षे, रवी पवार यांच्यासह अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक आघाडी व तालुक्यातील सर्व बुथ प्रमुख उपस्थित होते.सुरुवातीला या बैठकीत गुणवंत विद्यार्थ्यांचा व डॉ. आंबेडकर पुरस्कार प्राप्त बापूसाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या चर्चेत मतदारसंघातील उमेदवारीचा मुद्दा चांगलाच गाजला. या बैठकीत वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्याचा ठराव संमत करण्यात आला. तसेच अचलपूर मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ असताना मागील विधानसभा निवडणुकीत हा शिवसेनेला देण्यात आला. मात्र त्यावेळी सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला देण्यात यावा, असा ठराव संमत करण्यात आला.यानंतर झालेल्या चर्चेत गजानन कोल्हे यांनी उमेदवारीचा प्रश्न उचलून धरला. पक्षाला ‘अच्छे दिन’ आल्याचा उल्लेख करून पक्षात इतर पक्षातून आलेल्यांची रांग लागली आहे. त्यामुळे जुन्या व पक्षात एकनिष्ठ कार्यकर्त्यांची गोची होणार आहे. या आधीही काही नेते पक्षात आले आणि ते आता उमेदवारीची मागणी करीत आहेत. आताही अनेक जण पक्षाच्या दारात उभे आहेत. अशीच अवस्था राहिली व त्यांना उमेदवारी मिळाली तर सुसंस्कृत पक्षाला काँग्रेसचे स्वरूप येईल, अशी भूमिका स्पष्ट करून मतदारसंघाच्या बाहेरचा व लादलेला उमेदवार मतदारसंघातील कार्यकर्ते कदापिही सहन करणार नाही, असा इशाराच दिला. सदर ठराव संमत करून प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यात आला आहे. सभाध्यक्ष भारसाकळे यांनी लोकसभेतील यशाचे श्रेय मोदींना देऊन मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केल्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी किती प्रमाणात काम केले हे तपासून पाहण्याची आवश्यकता व्यक्त करून अप्रत्यक्षपणे कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. याबाबत कार्यकर्त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केल्याने ही बैठक वादळी ठरली.