शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीतच झाला त्यांच्या उमेदवारीला विरोध

By admin | Updated: July 14, 2014 00:50 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचलपूर

बाहेरचा लादलेला उमेदवार नकोच : भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सूरसुरेश सवळे चांदूरबाजारविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचलपूर मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बाहेरचा व लादलेला उमेदवार विधानसभा निवडणुकीत नको, असा सूर या बैठकीचा होता. या बैठकीत अचलपूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांचे नाव न घेता काही वर्षांपूर्वी भाजपात पदार्पण केलेल्या व बाहेरचा लादलेला उमेदवार मतदारसंघात सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडून तसा ठरावच प्रदेशाध्यक्षांकडे पाठविल्यामुळे ही बैठक अख्या मतदारसंघात चांगलीच चर्चिली जात आहे.शुक्रवारी अचलपूर मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक बैठक स्थानिक आनंद सभागृहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भारसाकळे हे होते. मनोहर सुने, प्रमोद कोरडे, अशोक बनसोड, रूपेश ढेपे, गजानन कोल्हे, चक्रधर घुलक्षे, रवी पवार यांच्यासह अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक आघाडी व तालुक्यातील सर्व बुथ प्रमुख उपस्थित होते.सुरुवातीला या बैठकीत गुणवंत विद्यार्थ्यांचा व डॉ. आंबेडकर पुरस्कार प्राप्त बापूसाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या चर्चेत मतदारसंघातील उमेदवारीचा मुद्दा चांगलाच गाजला. या बैठकीत वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्याचा ठराव संमत करण्यात आला. तसेच अचलपूर मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ असताना मागील विधानसभा निवडणुकीत हा शिवसेनेला देण्यात आला. मात्र त्यावेळी सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला देण्यात यावा, असा ठराव संमत करण्यात आला.यानंतर झालेल्या चर्चेत गजानन कोल्हे यांनी उमेदवारीचा प्रश्न उचलून धरला. पक्षाला ‘अच्छे दिन’ आल्याचा उल्लेख करून पक्षात इतर पक्षातून आलेल्यांची रांग लागली आहे. त्यामुळे जुन्या व पक्षात एकनिष्ठ कार्यकर्त्यांची गोची होणार आहे. या आधीही काही नेते पक्षात आले आणि ते आता उमेदवारीची मागणी करीत आहेत. आताही अनेक जण पक्षाच्या दारात उभे आहेत. अशीच अवस्था राहिली व त्यांना उमेदवारी मिळाली तर सुसंस्कृत पक्षाला काँग्रेसचे स्वरूप येईल, अशी भूमिका स्पष्ट करून मतदारसंघाच्या बाहेरचा व लादलेला उमेदवार मतदारसंघातील कार्यकर्ते कदापिही सहन करणार नाही, असा इशाराच दिला. सदर ठराव संमत करून प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यात आला आहे. सभाध्यक्ष भारसाकळे यांनी लोकसभेतील यशाचे श्रेय मोदींना देऊन मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केल्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी किती प्रमाणात काम केले हे तपासून पाहण्याची आवश्यकता व्यक्त करून अप्रत्यक्षपणे कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. याबाबत कार्यकर्त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केल्याने ही बैठक वादळी ठरली.